शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

धरण असूनही शेतजमीन तहानलेलीच !

By admin | Updated: January 28, 2015 00:56 IST

वांग-मराठवाडीची स्थिती : लाभक्षेत्रातील जमिनींना धरणाच्या पाण्याचा थेंबही नाही; अठरा वर्षांपासून परवड

सणबूर : वांग-मराठवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात गेल्या १८ वर्षांच्या कालावधीत धरणाच्या पाण्याचा एकही थेंब पोहोचलेला नाही़ ‘धरण एकीकडे तर लाभक्षेत्र दुसरीकडे’ असल्याने ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने पुनर्वसनासाठी घेतल्या आहेत त्यांना शासन पाणी कसे देणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे़ ढेबेवाडी विभागातील मंद्रुळकोळे, मंद्रुळकोळे खुर्द व शितपवाडी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी पुनर्वसनासाठी घेतल्या आहेत़ मात्र त्यांना अद्याप भरपाई मिळालेली नाही़ अगोदर आमच्या शेतीला पाणी द्या, अन्यथा आम्ही आमच्या जमिनी देणार नाही, असा ठाम पवित्रा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी घेतला आहे़ मराठवाडी धरणातून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना नेमके कसे पाणी दिले जाणार, याबाबत कुणीही ठोसपणे सांगायला तयार नसल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला़ धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जमिनी संपादन करून १८ वर्षे झाली तरीही पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही़ शासनाने या शेतकऱ्यांना पाणी कसे देणार ते जाहिर करावे, नाही तर संपादन केलेल्या जमिनी आम्हाला परत द्याव्यात अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे़ धरणाच्या बांधकामास १९९७ पासून सुरूवात झाली़ तेव्हापासूनच हे धरण संघर्षात सापडले आहे़ कधी निधीचा तुटवडा तर कधी धरणग्रस्तांची आंदोलने यामुळे धरणाचे काम सातत्याने रखडत गेले़ सध्या धरणात काही प्रमाणात पाणी साठवण्यात आले असले तरी पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होण्यासाठी अजूनही धरणाचे बरेच काम बाकी आहे़ या धरणाच्या लाभक्षेत्रात सुरूवातीला पाटण व कऱ्हाड तालुक्यातील ४६ गावांमध्ये पुनर्वसन करण्यात येणार होते़ मात्र या दोन तालुक्यात पुनर्वसनासाठी जमिनी उपलब्ध नसल्याने ऊर्वरीत धरणग्रस्तांचे पुनर्वसन सांगली जिल्ह्यात करण्यात आले आहे़ (वार्ताहर)अठरा वर्षानंतरही कोरडच!शासनाने चार एकराचा स्लॅब येथे लागू करून त्यावरील जमिनी पुनर्वसनासाठी ताब्यात घेतल्या़ मात्र, एकत्र कुटुंब असलेल्या आणि खातेफोड न झालेल्या अनेक शेतकरी कुटुंबावर यामुळे अन्याय झाला असल्याने काही शेतकऱ्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे़ तर काहींनी आपल्या जमिनीला पाणी मिळेल या भाबड्या आशेने जमिनी दिल्या़ १८ वर्षे उलटूनही या ठिकाणी पाणी पोहोचले नाही़ त्यामुळे या शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे़ ज्याठिकाणी धरणग्रस्तांचे पुनर्वसन झाले आहे व जी गावे लाभक्षेत्रात आहेत अशा गावांना शासनाने शासकीय खर्चाने पाणी द्यावे, अशी श्रमिक मुक्ती दलाची सुरूवातीपासून मागणी आहे़ ज्याच्या जमिनी पुनर्वसनासाठी घेण्यात आल्या आहेत़ त्यांना पाणी मिळवून देण्यासाठी आमच्या संघर्ष राहणार आहे़ - जगन्नाथ विभुते, राज्य सदस्य,श्रमिक मुक्ती दल