शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

धरण असूनही शेतजमीन तहानलेलीच !

By admin | Updated: January 28, 2015 00:56 IST

वांग-मराठवाडीची स्थिती : लाभक्षेत्रातील जमिनींना धरणाच्या पाण्याचा थेंबही नाही; अठरा वर्षांपासून परवड

सणबूर : वांग-मराठवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात गेल्या १८ वर्षांच्या कालावधीत धरणाच्या पाण्याचा एकही थेंब पोहोचलेला नाही़ ‘धरण एकीकडे तर लाभक्षेत्र दुसरीकडे’ असल्याने ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने पुनर्वसनासाठी घेतल्या आहेत त्यांना शासन पाणी कसे देणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे़ ढेबेवाडी विभागातील मंद्रुळकोळे, मंद्रुळकोळे खुर्द व शितपवाडी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी पुनर्वसनासाठी घेतल्या आहेत़ मात्र त्यांना अद्याप भरपाई मिळालेली नाही़ अगोदर आमच्या शेतीला पाणी द्या, अन्यथा आम्ही आमच्या जमिनी देणार नाही, असा ठाम पवित्रा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी घेतला आहे़ मराठवाडी धरणातून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना नेमके कसे पाणी दिले जाणार, याबाबत कुणीही ठोसपणे सांगायला तयार नसल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला़ धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जमिनी संपादन करून १८ वर्षे झाली तरीही पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही़ शासनाने या शेतकऱ्यांना पाणी कसे देणार ते जाहिर करावे, नाही तर संपादन केलेल्या जमिनी आम्हाला परत द्याव्यात अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे़ धरणाच्या बांधकामास १९९७ पासून सुरूवात झाली़ तेव्हापासूनच हे धरण संघर्षात सापडले आहे़ कधी निधीचा तुटवडा तर कधी धरणग्रस्तांची आंदोलने यामुळे धरणाचे काम सातत्याने रखडत गेले़ सध्या धरणात काही प्रमाणात पाणी साठवण्यात आले असले तरी पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होण्यासाठी अजूनही धरणाचे बरेच काम बाकी आहे़ या धरणाच्या लाभक्षेत्रात सुरूवातीला पाटण व कऱ्हाड तालुक्यातील ४६ गावांमध्ये पुनर्वसन करण्यात येणार होते़ मात्र या दोन तालुक्यात पुनर्वसनासाठी जमिनी उपलब्ध नसल्याने ऊर्वरीत धरणग्रस्तांचे पुनर्वसन सांगली जिल्ह्यात करण्यात आले आहे़ (वार्ताहर)अठरा वर्षानंतरही कोरडच!शासनाने चार एकराचा स्लॅब येथे लागू करून त्यावरील जमिनी पुनर्वसनासाठी ताब्यात घेतल्या़ मात्र, एकत्र कुटुंब असलेल्या आणि खातेफोड न झालेल्या अनेक शेतकरी कुटुंबावर यामुळे अन्याय झाला असल्याने काही शेतकऱ्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे़ तर काहींनी आपल्या जमिनीला पाणी मिळेल या भाबड्या आशेने जमिनी दिल्या़ १८ वर्षे उलटूनही या ठिकाणी पाणी पोहोचले नाही़ त्यामुळे या शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे़ ज्याठिकाणी धरणग्रस्तांचे पुनर्वसन झाले आहे व जी गावे लाभक्षेत्रात आहेत अशा गावांना शासनाने शासकीय खर्चाने पाणी द्यावे, अशी श्रमिक मुक्ती दलाची सुरूवातीपासून मागणी आहे़ ज्याच्या जमिनी पुनर्वसनासाठी घेण्यात आल्या आहेत़ त्यांना पाणी मिळवून देण्यासाठी आमच्या संघर्ष राहणार आहे़ - जगन्नाथ विभुते, राज्य सदस्य,श्रमिक मुक्ती दल