शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
5
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
6
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
7
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
8
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
9
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
10
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
11
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
12
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
13
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
15
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
16
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
17
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
18
बोरीवलीच्या नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी ३ महिन्यांत निविदा काढणार; परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा
19
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
20
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले

देसाई गटाची सत्ता अखेर मोडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:38 IST

तारळे ग्रामपंचायतीवर मंत्री शंभुराज देसाई गटाची सत्ता होती. यावेळी राष्ट्रवादी आणि भाजपने एकत्र होऊन देसाई गटाच्या सत्तेला सुरुंग लावला. ...

तारळे ग्रामपंचायतीवर मंत्री शंभुराज देसाई गटाची सत्ता होती. यावेळी राष्ट्रवादी आणि भाजपने एकत्र होऊन देसाई गटाच्या सत्तेला सुरुंग लावला. आणि एकूण १७ जागांपैकी दहा जागा जिंकून ग्रामपंचायत आपल्याकडे खेचून घेतली. निवडणूक लढवताना राष्ट्रवादी आणि भाजपने युती केली होती. यामध्ये राष्ट्रवादीने अकरा जागा लढवल्या, तर भाजपने सहा जागा लढवल्या. अखेर निवडणूक जिंकून राष्ट्रवादी आणि भाजपचे मिळून प्रकाश जाधव, रुक्मिणी जंगम, रोहिणी जाधव, तोफिक डगरे, पूजा काटकर, प्रणील यादव, सम्राट महाडीक, अपर्णा जाधव, सुधा पवेकर, सागर सोनवले हे सदस्य निवडून आले. त्यातच सरपंच पदासाठीही खुला पुरुष प्रवर्ग आरक्षण पडल्यामुळे सरपंच कोण होणार, याकडे लक्ष लागून राहिले होते. सरपंच, उपसरपंच निवडीत कोणताही वाद न करता भाजप आणि राष्ट्रवादीने आपापसात निवडी करून सरपंचपदासाठी प्रकाश जाधव आणि उपसरपंचपदासाठी भाजपच्या सुधा कोळेकर यांचे अर्ज दाखल केले. त्यांना विरोध करीत मंत्री शंभुराज देसाई गटाच्या सदस्यांनीही सरपंचपदासाठी गौरव परदेशी आणि उपसरपंच पदासाठी शंकर साळुंखे यांचे अर्ज दाखल केले होते. मात्र, सरपंच म्हणून प्रकाश जाधव आणि उपसरपंचपदासाठी सुधा कोळेकर यांना दहा मते मिळाली. त्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

निवडी घोषित झाल्यानंतर माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि सत्यजित पाटणकर यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार केला. राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य सदाभाऊ जाधव तसेच भाजपचे रामभाऊ लाहोटी, अभिजित जाधव आदींसह प्रमुख कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष केला.