शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

देसाई कारखान्याच्या निवडणुकीचा ‘बॉयलर’ पेटणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:40 IST

पाटण : मार्च महिन्याच्या अखेरीस तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपत असून या कारखान्याच्या ...

पाटण : मार्च महिन्याच्या अखेरीस तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपत असून या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या गटाचे पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

सध्या बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची सत्ता आहे. गत अनेक वर्षांपासून देसाई घराण्याने साखर कारखान्यावरील आपली पकड कायम ठेवली आहे. असे असले तरी कारखान्याच्या कारभाराबाबत नेहमीच ताशेरे ओढून पाटणकर गटाने देसाई गटाच्या विरोधात कारखान्याची निवडणूक लढवली आहे. त्यामुळे कारखान्याची निवडणूक जाहीर होताच तालुक्यात नेहमीच चर्चा सुरू असते. यावेळची परिस्थिती वेगळी असून राज्याच्या सत्तेत महाविकास आघाडी आहे. त्यातच देसाई आणि पाटणकर गटाचे दोन्ही नेते आघाडी धर्म पाळताना दिसतायेत. त्यामुळे होऊ घातलेली साखर कारखान्याची निवडणूक मंत्री शंभूराज देसाई यांना बिनविरोध सोडायची, की विरोध करायचा, असा पेच पाटणकर गटासमोर पडला आहे. मात्र, ही निवडणूक बिनविरोध होईल, याची शाश्वती देता येत नाही. कारण माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि सत्यजित पाटणकर यांनी आपली भूमिका मवाळ केली असली तरी, तालुक्यातील इतर विरोधक किंवा असंतुष्ट सभासद हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, असे दिसते.

बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या आतापर्यंत झालेल्या निवडणुका आणि त्यांचा निकाल पाहता, मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने विरोधी पॅनेलला सरासरी दोन ते अडीच हजार मतांच्या फरकाने नेहमीच पराभूत केले आहे. तरीही विरोधक म्हणून पाटणकर गटाने नेहमीच आपली भूमिका बजावली आहे.

- चौकट

पाटणच्या राजकारणासाठी निर्णायक निवडणूक

मरळी येथील बाळासाहेब देसाई साखर कारखाना ही संस्था देसाई घराण्याचे सर्वस्व आहे. त्यामुळे मंत्री शंभूराज देसाई हे साखर कारखान्याची निवडणूक अतिशय मनावर घेतात. मात्र कारखाना ही सहकारी संस्था असून मंत्री देसाई हे पाटणकर यांचे कट्टर विरोधक आहेत. तेव्हा कारखान्याची निवडणूक लागताच पाटणकर गट शंभूराज देसाईंच्या विरोधात मैदानात उतरतो. मात्र या वेळेस महाविकास आघाडीमुळे निवडणूक लढवायची की नाही, अशी तळ्यात-मळ्यात स्थिती पाटणकर गटाची होणार आहे.

- चौकट

२५ लाखावर होतो खर्च

देसाई साखर कारखाना १ हजार २६० मेट्रिक टन ऊस गाळप क्षमतेचा छोटा कारखाना आहे. या कारखान्याच्या निवडणुकीसाठी तब्बल २५ लाखाचा खर्च येतो. तरीसुद्धा कारखान्यातील जागृत सभासद हे कारखान्याचा कारभार पारदर्शक होण्याची अपेक्षा करून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. कात्रीत पकडण्याची हीच योग्य वेळ असते. कारण निवडणूक झाली की पुढे पाच वर्षे सत्ताधारी सुसाट, तर विरोधक हतबल, असेच चित्र दिसते.