शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

देसाई कारखान्याच्या निवडणुकीचा ‘बॉयलर’ पेटणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:40 IST

पाटण : मार्च महिन्याच्या अखेरीस तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपत असून या कारखान्याच्या ...

पाटण : मार्च महिन्याच्या अखेरीस तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपत असून या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या गटाचे पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

सध्या बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची सत्ता आहे. गत अनेक वर्षांपासून देसाई घराण्याने साखर कारखान्यावरील आपली पकड कायम ठेवली आहे. असे असले तरी कारखान्याच्या कारभाराबाबत नेहमीच ताशेरे ओढून पाटणकर गटाने देसाई गटाच्या विरोधात कारखान्याची निवडणूक लढवली आहे. त्यामुळे कारखान्याची निवडणूक जाहीर होताच तालुक्यात नेहमीच चर्चा सुरू असते. यावेळची परिस्थिती वेगळी असून राज्याच्या सत्तेत महाविकास आघाडी आहे. त्यातच देसाई आणि पाटणकर गटाचे दोन्ही नेते आघाडी धर्म पाळताना दिसतायेत. त्यामुळे होऊ घातलेली साखर कारखान्याची निवडणूक मंत्री शंभूराज देसाई यांना बिनविरोध सोडायची, की विरोध करायचा, असा पेच पाटणकर गटासमोर पडला आहे. मात्र, ही निवडणूक बिनविरोध होईल, याची शाश्वती देता येत नाही. कारण माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि सत्यजित पाटणकर यांनी आपली भूमिका मवाळ केली असली तरी, तालुक्यातील इतर विरोधक किंवा असंतुष्ट सभासद हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, असे दिसते.

बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या आतापर्यंत झालेल्या निवडणुका आणि त्यांचा निकाल पाहता, मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने विरोधी पॅनेलला सरासरी दोन ते अडीच हजार मतांच्या फरकाने नेहमीच पराभूत केले आहे. तरीही विरोधक म्हणून पाटणकर गटाने नेहमीच आपली भूमिका बजावली आहे.

- चौकट

पाटणच्या राजकारणासाठी निर्णायक निवडणूक

मरळी येथील बाळासाहेब देसाई साखर कारखाना ही संस्था देसाई घराण्याचे सर्वस्व आहे. त्यामुळे मंत्री शंभूराज देसाई हे साखर कारखान्याची निवडणूक अतिशय मनावर घेतात. मात्र कारखाना ही सहकारी संस्था असून मंत्री देसाई हे पाटणकर यांचे कट्टर विरोधक आहेत. तेव्हा कारखान्याची निवडणूक लागताच पाटणकर गट शंभूराज देसाईंच्या विरोधात मैदानात उतरतो. मात्र या वेळेस महाविकास आघाडीमुळे निवडणूक लढवायची की नाही, अशी तळ्यात-मळ्यात स्थिती पाटणकर गटाची होणार आहे.

- चौकट

२५ लाखावर होतो खर्च

देसाई साखर कारखाना १ हजार २६० मेट्रिक टन ऊस गाळप क्षमतेचा छोटा कारखाना आहे. या कारखान्याच्या निवडणुकीसाठी तब्बल २५ लाखाचा खर्च येतो. तरीसुद्धा कारखान्यातील जागृत सभासद हे कारखान्याचा कारभार पारदर्शक होण्याची अपेक्षा करून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. कात्रीत पकडण्याची हीच योग्य वेळ असते. कारण निवडणूक झाली की पुढे पाच वर्षे सत्ताधारी सुसाट, तर विरोधक हतबल, असेच चित्र दिसते.