शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

कृषी विभागाने रानभाज्यांचे महत्त्व सांगावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात कृषी विभागामार्फत रानभाज्या महोत्सव भरविण्यास सुरुवात केली आहे. या महोत्सवाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात कृषी विभागामार्फत रानभाज्या महोत्सव भरविण्यास सुरुवात केली आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून रानभाज्या आरोग्यासासाठी किती लाभदायक आहेत याचा नागरिकांमध्ये प्रचार व प्रसार करावा, असे आवाहन पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांनी केले.

येथे कृषी विभागामार्फत रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या महोत्सवास आमदार दीपक चव्हाण, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे आदी उपस्थित होते.

कोरोना संसर्गामुळे कडक निर्बंध लावण्यात आले. या निर्बंधांमध्ये शेतकऱ्यांना सूट देण्यात आली होती. ग्राहकांना लागणारा माल पिकवून लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांची चांगल्या पद्धतीने सोय केली. तरुण पिढी विविध तंत्रज्ञानाचा भर देत चांगल्या पद्धतीने शेती करीत आहे. तरुण शेतकऱ्यांना कृषी विभागाने वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांना मदत करावी. आज सेंद्रिय शेतीला फार महत्त्व आले आहे. सेंद्रिय मालाला बाजारपेठेत चांगला भावही मिळत आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करण्यावर भर द्यावा, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले.

कार्यक्रमात विविध पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करून रानभाज्यांचे महत्त्व सांगणाऱ्या पुस्तिकेचेही विमोचन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी उपसंचालक विजयकुमार राऊत यांनी केले. या कार्यक्रमास शेतकरी उपस्थित होते.

फोटो ओळ : सातारा येथे आयोजित केलेल्या रानभाज्या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांकडून रानभाज्यांची माहिती घेतली.