शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

घना धाव रे... भिजव रान रे...!

By admin | Updated: July 10, 2017 14:19 IST

बळीराजाची आर्त हाक : पावसाअभावी माण तालुक्यातील पिके धोक्यात

आॅनलाईन लोकमतपळशी (जि. सातारा), दि. १0 : नेहमीच दुष्काळी तालुका म्हणून चर्चेत असलेल्या माण तालुक्यातील स्थिती पावसाअभावी याहीवर्षी चिंताजनकच आहे. माण तालुक्यातील पळशी, मार्डी, मोहीसह परिसरात महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. जुनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाच्या हलक्या सरी झाल्या आणि शेतकऱ्यांच्या जिवात जीव आला पण त्यानंतर पावसाने दडी मारली. दुबार पेरणीचे संकट निर्माण झाल्याने घना धाव रे.. भिजव रान रे.. अशी आर्त हाक आता बळीराजा देत आहे.पळशीसह परिसरात रिमझिम पावसाच्या आशेवरच अनेकांनी बाजरीची पेरणी केली. अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरींमुळे बाजरी उगवून आली खरी पण पावसाने ओढ दिल्याने बाजरीच्या पिकाने मान टाकली आहे. येत्या आठ ते दहा दिवसात पाऊस न झाल्यास पिके करपून जाऊन दुबार पेरणीची संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे.अनेक शेतकऱ्यांनी पावसाला सुरूवात होताच लागवड करता यावी यासाठी जमिनीची मशागत करून कांद्यासाठी सरी सोडून ठेवली आहे, पण पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा पीक दरात नेहमीच हुलकावणी देत असल्याने आता मका पीक घेण्यास पसंती दर्शवली आहे. कांद्याच्या तुलनेत मका पिकास उत्पादन खर्च कमी येत आहे तर वारंवार औषध फवारणी करावी लागत नसल्याने आणि मजुरांची फारशी गरज भासत नसल्याने मका पीक घेण्याकडे अनेकांचा कल वाढलेला आहे. त्यामुळे पळशीसह परिसरात यावर्षी कांद्याचे उत्पादन घटणार आहे. मात्र, पाऊस नसल्याने उगवून आलेला मका किती दिवस तग धरणार ? असा प्रश्नही भेडसावत आहे. परिसरातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पहात असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. पाऊस न झाल्यास केलेला खर्च वाया जाऊन दूबार पेरणीची टांगती तलवार डोक्यावर असल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत आहे.

तळी, तलाव ठणठणीत

दरवर्षी बेंदूर सणावेळी जवळपासच्या तळी व तलावात थोड्याफार प्रमाणात पावसाच्या पाण्याचा साठा होतो. मात्र, यावर्षी तळी व तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत. परिणामी बेंदूर सणाला गाईगुरांना तलावावर न धुता घरीच धुवावे लागले. बाजारपेठेतही शेतकऱ्यांनी फारशी खरेदी केली नाही. त्यामुळे पाऊस नसल्याचा परिणाम सणावर होताना दिसला.आठ-दहा दिवसात पाऊस न झाल्यास बाजरीचे पीक हातचे जाणार आहे. विहीरीतही पुरेसे पाणी उपलब्ध नाही. पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.- आनंदा कचरे, शेतकरी, माळीखोरा