शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

घना धाव रे... भिजव रान रे...!

By admin | Updated: July 10, 2017 14:19 IST

बळीराजाची आर्त हाक : पावसाअभावी माण तालुक्यातील पिके धोक्यात

आॅनलाईन लोकमतपळशी (जि. सातारा), दि. १0 : नेहमीच दुष्काळी तालुका म्हणून चर्चेत असलेल्या माण तालुक्यातील स्थिती पावसाअभावी याहीवर्षी चिंताजनकच आहे. माण तालुक्यातील पळशी, मार्डी, मोहीसह परिसरात महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. जुनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाच्या हलक्या सरी झाल्या आणि शेतकऱ्यांच्या जिवात जीव आला पण त्यानंतर पावसाने दडी मारली. दुबार पेरणीचे संकट निर्माण झाल्याने घना धाव रे.. भिजव रान रे.. अशी आर्त हाक आता बळीराजा देत आहे.पळशीसह परिसरात रिमझिम पावसाच्या आशेवरच अनेकांनी बाजरीची पेरणी केली. अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरींमुळे बाजरी उगवून आली खरी पण पावसाने ओढ दिल्याने बाजरीच्या पिकाने मान टाकली आहे. येत्या आठ ते दहा दिवसात पाऊस न झाल्यास पिके करपून जाऊन दुबार पेरणीची संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे.अनेक शेतकऱ्यांनी पावसाला सुरूवात होताच लागवड करता यावी यासाठी जमिनीची मशागत करून कांद्यासाठी सरी सोडून ठेवली आहे, पण पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा पीक दरात नेहमीच हुलकावणी देत असल्याने आता मका पीक घेण्यास पसंती दर्शवली आहे. कांद्याच्या तुलनेत मका पिकास उत्पादन खर्च कमी येत आहे तर वारंवार औषध फवारणी करावी लागत नसल्याने आणि मजुरांची फारशी गरज भासत नसल्याने मका पीक घेण्याकडे अनेकांचा कल वाढलेला आहे. त्यामुळे पळशीसह परिसरात यावर्षी कांद्याचे उत्पादन घटणार आहे. मात्र, पाऊस नसल्याने उगवून आलेला मका किती दिवस तग धरणार ? असा प्रश्नही भेडसावत आहे. परिसरातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पहात असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. पाऊस न झाल्यास केलेला खर्च वाया जाऊन दूबार पेरणीची टांगती तलवार डोक्यावर असल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत आहे.

तळी, तलाव ठणठणीत

दरवर्षी बेंदूर सणावेळी जवळपासच्या तळी व तलावात थोड्याफार प्रमाणात पावसाच्या पाण्याचा साठा होतो. मात्र, यावर्षी तळी व तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत. परिणामी बेंदूर सणाला गाईगुरांना तलावावर न धुता घरीच धुवावे लागले. बाजारपेठेतही शेतकऱ्यांनी फारशी खरेदी केली नाही. त्यामुळे पाऊस नसल्याचा परिणाम सणावर होताना दिसला.आठ-दहा दिवसात पाऊस न झाल्यास बाजरीचे पीक हातचे जाणार आहे. विहीरीतही पुरेसे पाणी उपलब्ध नाही. पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.- आनंदा कचरे, शेतकरी, माळीखोरा