शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धनगर आंदोलकांनी मांडली रस्त्यावर चूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 22:51 IST

फलटण : फलटण तालुक्यातील धनगर समाजबांधवांनी धनगर समाजाला राज्यघटनेत दिलेले अनुसूचित जमातीचे आरक्षण त्वरित लागू झालेच पाहिजे, यासह आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाच्या पाचव्या दिवशी सरकार विरोधात शेळ्या मेंढ्या, घोडे तसेच संपूर्ण कुटुंबासह आंदोलनस्थळी चूल मांडून आंदोलन केले.आंदोलनस्थळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. ...

फलटण : फलटण तालुक्यातील धनगर समाजबांधवांनी धनगर समाजाला राज्यघटनेत दिलेले अनुसूचित जमातीचे आरक्षण त्वरित लागू झालेच पाहिजे, यासह आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाच्या पाचव्या दिवशी सरकार विरोधात शेळ्या मेंढ्या, घोडे तसेच संपूर्ण कुटुंबासह आंदोलनस्थळी चूल मांडून आंदोलन केले.आंदोलनस्थळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. तसेच धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणी मागणीसाठी चालू असलेल्या आंदोलनास पाठिंबा दिला.यावेळी आमदार दीपक चव्हाण म्हणाले, ‘धनगर समाजाच्या पुढील काळात होणाऱ्या सर्व आंदोलनास आमचा पूर्ण पाठिंबा आहे. अजूनही सरकारकडून धनगर समाजाला देण्यात आलेले आश्वासन पाळण्यात आले नाही, हे चुकीचे आहे. आरक्षणाचे दिलेले आश्वासन तत्काळ पूर्ण करावे. यापुढे धनगर समाजाच्या प्रत्येक आंदोलनात आम्ही सहभागी होऊन धनगर समाजाच्या आंदोलनस्थळी भेट दिली.आंदोलनाच्या पाचव्या दिवशी धनगर समाजातील काही आंदोलकांनी शेळ्या, मेंढ्या, घोडे तसेच कुटुंबासह आंदोलनस्थळी चूल मांडून आंदोलन केले. यावेळी सरकारविरोधी जोरदार घोषणा देण्यात आल्या. पुढील काळात धनगर समाजाची आरक्षणाची मागणी पूर्ण झाल्यास आमदार व खासदारांच्या घरासमोर शेळ्या मेंढ्या, घोडे तसेच संपूर्ण कुटुंबासह चूल मांडून आंदोलन करणार, असे धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले. बुधवारच्या आंदोलनाच्या दिवशी नांदल ग्रामस्थांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.आघाडी सरकारच्या काळात हा प्रश्न पेटला तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस स्वत: धनगरांच्या व्यासपीठावर गेले. त्यांनी सत्तेवर आल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रश्न सोडवू, असं आश्वासन दिलं होतं. मात्र चार वर्षे झाली तरी मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनगर आरक्षणाचं घोंगडं भिजत ठेवलं आहे. सरकारने जाहीर केलेले ९३ हजार धनगडांमधील एकतरी ‘धनगड’ एका महिन्यात दाखवावा, अन्यथा परिणामाला सामोरे जावे, असा इशारा ‘धनगर’ समाजाकडून देण्यात आला आहे. धनगर आणि धनगड अशा दोन वेगळ्या जाती असल्याचा सरकारचा दावा आहे. तसं प्रतिज्ञापत्र आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी हायकोर्टात दिलं.मात्र, धनगर आणि धनगड ही फक्त प्रशासकीय चूक आहे. राज्यात एकही धनगड अस्तित्वात नाही. त्यामुळे १ सप्टेंबरच्या आत ही चूक दुरुस्त केली नाही तर राज्यातील दीड कोटी धनगर समाज रस्त्यावरउतरेल.धनगड नावाची जमात महाराष्ट्र राज्यात नाही, शिवाय धनगर आणि धनगड हे वेगळे नसून एकच असल्याचे संशोधकीय अहवाल असताना देखील धनगर समाज आदिवासींचे निकषपूर्ण करतो की नाही, यासाठी टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स मुंबई या संस्थेला ७० वर्षांनतर सर्व्हे करायला सांगणारे फडणवीससरकार धनगर समाजाचे आरक्षण घशातून काढण्याचा प्रयत्न तरी करत नाही ना, अशी शंका कोणाच्याही मनात गोंधळ निर्माण करणारीआहे, असे धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले.