शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

धनगर आंदोलकांनी मांडली रस्त्यावर चूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 22:51 IST

फलटण : फलटण तालुक्यातील धनगर समाजबांधवांनी धनगर समाजाला राज्यघटनेत दिलेले अनुसूचित जमातीचे आरक्षण त्वरित लागू झालेच पाहिजे, यासह आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाच्या पाचव्या दिवशी सरकार विरोधात शेळ्या मेंढ्या, घोडे तसेच संपूर्ण कुटुंबासह आंदोलनस्थळी चूल मांडून आंदोलन केले.आंदोलनस्थळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. ...

फलटण : फलटण तालुक्यातील धनगर समाजबांधवांनी धनगर समाजाला राज्यघटनेत दिलेले अनुसूचित जमातीचे आरक्षण त्वरित लागू झालेच पाहिजे, यासह आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाच्या पाचव्या दिवशी सरकार विरोधात शेळ्या मेंढ्या, घोडे तसेच संपूर्ण कुटुंबासह आंदोलनस्थळी चूल मांडून आंदोलन केले.आंदोलनस्थळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. तसेच धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणी मागणीसाठी चालू असलेल्या आंदोलनास पाठिंबा दिला.यावेळी आमदार दीपक चव्हाण म्हणाले, ‘धनगर समाजाच्या पुढील काळात होणाऱ्या सर्व आंदोलनास आमचा पूर्ण पाठिंबा आहे. अजूनही सरकारकडून धनगर समाजाला देण्यात आलेले आश्वासन पाळण्यात आले नाही, हे चुकीचे आहे. आरक्षणाचे दिलेले आश्वासन तत्काळ पूर्ण करावे. यापुढे धनगर समाजाच्या प्रत्येक आंदोलनात आम्ही सहभागी होऊन धनगर समाजाच्या आंदोलनस्थळी भेट दिली.आंदोलनाच्या पाचव्या दिवशी धनगर समाजातील काही आंदोलकांनी शेळ्या, मेंढ्या, घोडे तसेच कुटुंबासह आंदोलनस्थळी चूल मांडून आंदोलन केले. यावेळी सरकारविरोधी जोरदार घोषणा देण्यात आल्या. पुढील काळात धनगर समाजाची आरक्षणाची मागणी पूर्ण झाल्यास आमदार व खासदारांच्या घरासमोर शेळ्या मेंढ्या, घोडे तसेच संपूर्ण कुटुंबासह चूल मांडून आंदोलन करणार, असे धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले. बुधवारच्या आंदोलनाच्या दिवशी नांदल ग्रामस्थांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.आघाडी सरकारच्या काळात हा प्रश्न पेटला तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस स्वत: धनगरांच्या व्यासपीठावर गेले. त्यांनी सत्तेवर आल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रश्न सोडवू, असं आश्वासन दिलं होतं. मात्र चार वर्षे झाली तरी मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनगर आरक्षणाचं घोंगडं भिजत ठेवलं आहे. सरकारने जाहीर केलेले ९३ हजार धनगडांमधील एकतरी ‘धनगड’ एका महिन्यात दाखवावा, अन्यथा परिणामाला सामोरे जावे, असा इशारा ‘धनगर’ समाजाकडून देण्यात आला आहे. धनगर आणि धनगड अशा दोन वेगळ्या जाती असल्याचा सरकारचा दावा आहे. तसं प्रतिज्ञापत्र आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी हायकोर्टात दिलं.मात्र, धनगर आणि धनगड ही फक्त प्रशासकीय चूक आहे. राज्यात एकही धनगड अस्तित्वात नाही. त्यामुळे १ सप्टेंबरच्या आत ही चूक दुरुस्त केली नाही तर राज्यातील दीड कोटी धनगर समाज रस्त्यावरउतरेल.धनगड नावाची जमात महाराष्ट्र राज्यात नाही, शिवाय धनगर आणि धनगड हे वेगळे नसून एकच असल्याचे संशोधकीय अहवाल असताना देखील धनगर समाज आदिवासींचे निकषपूर्ण करतो की नाही, यासाठी टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स मुंबई या संस्थेला ७० वर्षांनतर सर्व्हे करायला सांगणारे फडणवीससरकार धनगर समाजाचे आरक्षण घशातून काढण्याचा प्रयत्न तरी करत नाही ना, अशी शंका कोणाच्याही मनात गोंधळ निर्माण करणारीआहे, असे धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले.