शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

धनगर आंदोलकांनी मांडली रस्त्यावर चूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 22:51 IST

फलटण : फलटण तालुक्यातील धनगर समाजबांधवांनी धनगर समाजाला राज्यघटनेत दिलेले अनुसूचित जमातीचे आरक्षण त्वरित लागू झालेच पाहिजे, यासह आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाच्या पाचव्या दिवशी सरकार विरोधात शेळ्या मेंढ्या, घोडे तसेच संपूर्ण कुटुंबासह आंदोलनस्थळी चूल मांडून आंदोलन केले.आंदोलनस्थळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. ...

फलटण : फलटण तालुक्यातील धनगर समाजबांधवांनी धनगर समाजाला राज्यघटनेत दिलेले अनुसूचित जमातीचे आरक्षण त्वरित लागू झालेच पाहिजे, यासह आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाच्या पाचव्या दिवशी सरकार विरोधात शेळ्या मेंढ्या, घोडे तसेच संपूर्ण कुटुंबासह आंदोलनस्थळी चूल मांडून आंदोलन केले.आंदोलनस्थळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. तसेच धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणी मागणीसाठी चालू असलेल्या आंदोलनास पाठिंबा दिला.यावेळी आमदार दीपक चव्हाण म्हणाले, ‘धनगर समाजाच्या पुढील काळात होणाऱ्या सर्व आंदोलनास आमचा पूर्ण पाठिंबा आहे. अजूनही सरकारकडून धनगर समाजाला देण्यात आलेले आश्वासन पाळण्यात आले नाही, हे चुकीचे आहे. आरक्षणाचे दिलेले आश्वासन तत्काळ पूर्ण करावे. यापुढे धनगर समाजाच्या प्रत्येक आंदोलनात आम्ही सहभागी होऊन धनगर समाजाच्या आंदोलनस्थळी भेट दिली.आंदोलनाच्या पाचव्या दिवशी धनगर समाजातील काही आंदोलकांनी शेळ्या, मेंढ्या, घोडे तसेच कुटुंबासह आंदोलनस्थळी चूल मांडून आंदोलन केले. यावेळी सरकारविरोधी जोरदार घोषणा देण्यात आल्या. पुढील काळात धनगर समाजाची आरक्षणाची मागणी पूर्ण झाल्यास आमदार व खासदारांच्या घरासमोर शेळ्या मेंढ्या, घोडे तसेच संपूर्ण कुटुंबासह चूल मांडून आंदोलन करणार, असे धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले. बुधवारच्या आंदोलनाच्या दिवशी नांदल ग्रामस्थांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.आघाडी सरकारच्या काळात हा प्रश्न पेटला तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस स्वत: धनगरांच्या व्यासपीठावर गेले. त्यांनी सत्तेवर आल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रश्न सोडवू, असं आश्वासन दिलं होतं. मात्र चार वर्षे झाली तरी मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनगर आरक्षणाचं घोंगडं भिजत ठेवलं आहे. सरकारने जाहीर केलेले ९३ हजार धनगडांमधील एकतरी ‘धनगड’ एका महिन्यात दाखवावा, अन्यथा परिणामाला सामोरे जावे, असा इशारा ‘धनगर’ समाजाकडून देण्यात आला आहे. धनगर आणि धनगड अशा दोन वेगळ्या जाती असल्याचा सरकारचा दावा आहे. तसं प्रतिज्ञापत्र आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी हायकोर्टात दिलं.मात्र, धनगर आणि धनगड ही फक्त प्रशासकीय चूक आहे. राज्यात एकही धनगड अस्तित्वात नाही. त्यामुळे १ सप्टेंबरच्या आत ही चूक दुरुस्त केली नाही तर राज्यातील दीड कोटी धनगर समाज रस्त्यावरउतरेल.धनगड नावाची जमात महाराष्ट्र राज्यात नाही, शिवाय धनगर आणि धनगड हे वेगळे नसून एकच असल्याचे संशोधकीय अहवाल असताना देखील धनगर समाज आदिवासींचे निकषपूर्ण करतो की नाही, यासाठी टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स मुंबई या संस्थेला ७० वर्षांनतर सर्व्हे करायला सांगणारे फडणवीससरकार धनगर समाजाचे आरक्षण घशातून काढण्याचा प्रयत्न तरी करत नाही ना, अशी शंका कोणाच्याही मनात गोंधळ निर्माण करणारीआहे, असे धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले.