शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

विधानसभा निवडणुकीवर देऊरकरांचा बहिष्कार

By admin | Updated: October 6, 2014 22:41 IST

२५वर्षे रखडलेल्या देऊर-बनवडी रस्त्याचा प्रश्न कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून सुटत नाही.

वाठार स्टेशन : गेली २५ वर्षे रखडलेल्या देऊर-बनवडी रस्त्याचा प्रश्न कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून सुटत नाही. या रस्त्यामुळे ग्रामस्थ, शाळकरी मुलांचे हाल होत आहे. त्यामुळे हा रस्ता होत नाही तोपर्यंत सर्वच निवडणुकांवर मतदान न करण्याचा निर्धार देऊर, भांडेवाडी ग्रामस्थांनी घेतला असून, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही मतदान न करण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी दिले आहे.देऊर-बनवडी गावांना जोडणारा हा रस्ता तत्कालीन माजी आमदार शंकरराव जगताप यांनी २५ वर्षांपूर्वी खडीकरणातून पूर्ण केला होता. त्यानंतरच्या लोकप्रतिनिधी माजी महसूलमंत्री शालिनीताई पाटील यांनी देऊरकडून एक किलोमीटर हा रस्ता डांबरीकरण केला होता; परंतु आता हे डांबरीकरणही नाहीसे झाले असून, असणारा संपूर्ण खडीचा रस्ता जागोजागी खड्ड्यांमुळे खराब झाला आहे.देऊरकडून वसना नदी पुलावरून बनवडी, आसनगाव, अरबवाडी, दुधनवाडी, भांडेवाडी या गावांसाठी हा रस्ता महत्त्वपूर्ण असतानाही या रस्त्याचे काम होत नाही. यास जबाबदार असलेल्या लोकप्रतिनिधींनी याबाबत लक्ष न दिल्यानेच हा रस्ता मोडकळीस आला आहे. याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास येणाऱ्या विधानसभेपासून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार या ग्रामस्थांनी केला आहे. या निवेदनावर रामचंद्र कदम, दिलीप कदम, बादशहा इनामदार यांच्यासह ५०० लोकांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)