शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

वारीच्या अखंड परंपरेची वारकऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:27 IST

फलटण : वारीची परंपरा अखंडित सुरु ठेवावी, मंदिरे खुली करावीत, कीर्तन, प्रवचनांना परवानगी द्यावी आणि ह. भ. प. ...

फलटण : वारीची परंपरा अखंडित सुरु ठेवावी, मंदिरे खुली करावीत, कीर्तन, प्रवचनांना परवानगी द्यावी आणि ह. भ. प. बंडा महाराज कराडकर यांना नजरकैदेतून मुक्त करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांचे निवेदन फलटण वारकरी संप्रदायाच्यावतीने प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप व तहसीलदार समीर यादव यांना येथे देण्यात आले.

वारकरी संप्रदाय मंडळ, फलटण तालुका यांच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनावेळी ह. भ. प. दादासाहेब आप्पाजी शेंडे, गणपतराव बाबुराव निकम, नंदकुमार कुमठेकर महाराज, सत्त्यवान महाराज जाधव, विजय महाराज लावंड, दिगंबर गोरे, चंद्रकांत भोसले, सौरभ बिचुकले, आदी वारकरी उपस्थित होते.

गतवर्षी सन २०२०मध्ये सर्व मंदिरे बंद होती, संतांचे पायी वारी सोहळे बंद होते. मात्र, कोणीही वारकऱ्यांनी ते सुरु व्हावेत म्हणून प्रयत्न केले नाहीत, त्यासाठी हट्ट अथवा आग्रही भूमिका घेतली नाही कारण कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होता. लसीकरण व उपचार पद्धती याविषयी पूर्ण माहिती नव्हती. परंतु, चालूवर्षी सन २०२१मध्ये शासन, प्रशासनाने त्यावर पूर्णतः नियंत्रण मिळवले, उपाययोजना सुरु केल्याने पायी वारी, संतांचे सोहळे वगैरे मर्यादित स्वरुपात आणि कोरोनाचे सर्व नियम निकष सांभाळून सुरु करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली. त्याचा विचार होऊन सकारात्मक निर्णय अपेक्षित होता पण तसे घडले नसल्याबद्दल या निवेदनात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

संत तुकाराम महाराज बिजोत्सव कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाविषयक सर्व नियम, निकष सांभाळून केलेल्या सत्याग्रहाच्या निमित्ताने हे सर्व सोहळे, वारी परंपरा मर्यादित स्वरुपात सुरु करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. हवेली प्रांताधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी हे निवेदन स्वीकारुन योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र, प्रत्यक्षात कसलीही चर्चा, कार्यवाही, निर्णय झाला नसल्याचे या निवेदनात म्हणण्यात आले आहे.

त्यानंतर तेच निवेदन व मागण्या विविध ठिकाणच्या वारकरी मंडळांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, महसूल मंत्री यांना पाठविल्या. मात्र, त्याची दखल घेतली गेली नसल्याचे नमूद करत वास्तविक वारकरी मंडळींना बोलावून चर्चा केली असती तर योग्य समन्वयातून चांगला मार्ग निश्चित काढून वारीची परंपरा जपण्याबरोबर अन्य प्रश्नही चर्चेने सहज सोडविता आले असते. पण तसे केले नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.