शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

वारीच्या अखंड परंपरेची वारकऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:27 IST

फलटण : वारीची परंपरा अखंडित सुरु ठेवावी, मंदिरे खुली करावीत, कीर्तन, प्रवचनांना परवानगी द्यावी आणि ह. भ. प. ...

फलटण : वारीची परंपरा अखंडित सुरु ठेवावी, मंदिरे खुली करावीत, कीर्तन, प्रवचनांना परवानगी द्यावी आणि ह. भ. प. बंडा महाराज कराडकर यांना नजरकैदेतून मुक्त करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांचे निवेदन फलटण वारकरी संप्रदायाच्यावतीने प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप व तहसीलदार समीर यादव यांना येथे देण्यात आले.

वारकरी संप्रदाय मंडळ, फलटण तालुका यांच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनावेळी ह. भ. प. दादासाहेब आप्पाजी शेंडे, गणपतराव बाबुराव निकम, नंदकुमार कुमठेकर महाराज, सत्त्यवान महाराज जाधव, विजय महाराज लावंड, दिगंबर गोरे, चंद्रकांत भोसले, सौरभ बिचुकले, आदी वारकरी उपस्थित होते.

गतवर्षी सन २०२०मध्ये सर्व मंदिरे बंद होती, संतांचे पायी वारी सोहळे बंद होते. मात्र, कोणीही वारकऱ्यांनी ते सुरु व्हावेत म्हणून प्रयत्न केले नाहीत, त्यासाठी हट्ट अथवा आग्रही भूमिका घेतली नाही कारण कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होता. लसीकरण व उपचार पद्धती याविषयी पूर्ण माहिती नव्हती. परंतु, चालूवर्षी सन २०२१मध्ये शासन, प्रशासनाने त्यावर पूर्णतः नियंत्रण मिळवले, उपाययोजना सुरु केल्याने पायी वारी, संतांचे सोहळे वगैरे मर्यादित स्वरुपात आणि कोरोनाचे सर्व नियम निकष सांभाळून सुरु करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली. त्याचा विचार होऊन सकारात्मक निर्णय अपेक्षित होता पण तसे घडले नसल्याबद्दल या निवेदनात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

संत तुकाराम महाराज बिजोत्सव कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाविषयक सर्व नियम, निकष सांभाळून केलेल्या सत्याग्रहाच्या निमित्ताने हे सर्व सोहळे, वारी परंपरा मर्यादित स्वरुपात सुरु करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. हवेली प्रांताधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी हे निवेदन स्वीकारुन योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र, प्रत्यक्षात कसलीही चर्चा, कार्यवाही, निर्णय झाला नसल्याचे या निवेदनात म्हणण्यात आले आहे.

त्यानंतर तेच निवेदन व मागण्या विविध ठिकाणच्या वारकरी मंडळांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, महसूल मंत्री यांना पाठविल्या. मात्र, त्याची दखल घेतली गेली नसल्याचे नमूद करत वास्तविक वारकरी मंडळींना बोलावून चर्चा केली असती तर योग्य समन्वयातून चांगला मार्ग निश्चित काढून वारीची परंपरा जपण्याबरोबर अन्य प्रश्नही चर्चेने सहज सोडविता आले असते. पण तसे केले नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.