शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

वारीच्या अखंड परंपरेची वारकऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:27 IST

फलटण : वारीची परंपरा अखंडित सुरु ठेवावी, मंदिरे खुली करावीत, कीर्तन, प्रवचनांना परवानगी द्यावी आणि ह. भ. प. ...

फलटण : वारीची परंपरा अखंडित सुरु ठेवावी, मंदिरे खुली करावीत, कीर्तन, प्रवचनांना परवानगी द्यावी आणि ह. भ. प. बंडा महाराज कराडकर यांना नजरकैदेतून मुक्त करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांचे निवेदन फलटण वारकरी संप्रदायाच्यावतीने प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप व तहसीलदार समीर यादव यांना येथे देण्यात आले.

वारकरी संप्रदाय मंडळ, फलटण तालुका यांच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनावेळी ह. भ. प. दादासाहेब आप्पाजी शेंडे, गणपतराव बाबुराव निकम, नंदकुमार कुमठेकर महाराज, सत्त्यवान महाराज जाधव, विजय महाराज लावंड, दिगंबर गोरे, चंद्रकांत भोसले, सौरभ बिचुकले, आदी वारकरी उपस्थित होते.

गतवर्षी सन २०२०मध्ये सर्व मंदिरे बंद होती, संतांचे पायी वारी सोहळे बंद होते. मात्र, कोणीही वारकऱ्यांनी ते सुरु व्हावेत म्हणून प्रयत्न केले नाहीत, त्यासाठी हट्ट अथवा आग्रही भूमिका घेतली नाही कारण कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होता. लसीकरण व उपचार पद्धती याविषयी पूर्ण माहिती नव्हती. परंतु, चालूवर्षी सन २०२१मध्ये शासन, प्रशासनाने त्यावर पूर्णतः नियंत्रण मिळवले, उपाययोजना सुरु केल्याने पायी वारी, संतांचे सोहळे वगैरे मर्यादित स्वरुपात आणि कोरोनाचे सर्व नियम निकष सांभाळून सुरु करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली. त्याचा विचार होऊन सकारात्मक निर्णय अपेक्षित होता पण तसे घडले नसल्याबद्दल या निवेदनात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

संत तुकाराम महाराज बिजोत्सव कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाविषयक सर्व नियम, निकष सांभाळून केलेल्या सत्याग्रहाच्या निमित्ताने हे सर्व सोहळे, वारी परंपरा मर्यादित स्वरुपात सुरु करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. हवेली प्रांताधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी हे निवेदन स्वीकारुन योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र, प्रत्यक्षात कसलीही चर्चा, कार्यवाही, निर्णय झाला नसल्याचे या निवेदनात म्हणण्यात आले आहे.

त्यानंतर तेच निवेदन व मागण्या विविध ठिकाणच्या वारकरी मंडळांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, महसूल मंत्री यांना पाठविल्या. मात्र, त्याची दखल घेतली गेली नसल्याचे नमूद करत वास्तविक वारकरी मंडळींना बोलावून चर्चा केली असती तर योग्य समन्वयातून चांगला मार्ग निश्चित काढून वारीची परंपरा जपण्याबरोबर अन्य प्रश्नही चर्चेने सहज सोडविता आले असते. पण तसे केले नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.