शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

वारीच्या अखंड परंपरेची वारकऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:27 IST

फलटण : वारीची परंपरा अखंडित सुरु ठेवावी, मंदिरे खुली करावीत, कीर्तन, प्रवचनांना परवानगी द्यावी आणि ह. भ. प. ...

फलटण : वारीची परंपरा अखंडित सुरु ठेवावी, मंदिरे खुली करावीत, कीर्तन, प्रवचनांना परवानगी द्यावी आणि ह. भ. प. बंडा महाराज कराडकर यांना नजरकैदेतून मुक्त करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांचे निवेदन फलटण वारकरी संप्रदायाच्यावतीने प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप व तहसीलदार समीर यादव यांना येथे देण्यात आले.

वारकरी संप्रदाय मंडळ, फलटण तालुका यांच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनावेळी ह. भ. प. दादासाहेब आप्पाजी शेंडे, गणपतराव बाबुराव निकम, नंदकुमार कुमठेकर महाराज, सत्त्यवान महाराज जाधव, विजय महाराज लावंड, दिगंबर गोरे, चंद्रकांत भोसले, सौरभ बिचुकले, आदी वारकरी उपस्थित होते.

गतवर्षी सन २०२०मध्ये सर्व मंदिरे बंद होती, संतांचे पायी वारी सोहळे बंद होते. मात्र, कोणीही वारकऱ्यांनी ते सुरु व्हावेत म्हणून प्रयत्न केले नाहीत, त्यासाठी हट्ट अथवा आग्रही भूमिका घेतली नाही कारण कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होता. लसीकरण व उपचार पद्धती याविषयी पूर्ण माहिती नव्हती. परंतु, चालूवर्षी सन २०२१मध्ये शासन, प्रशासनाने त्यावर पूर्णतः नियंत्रण मिळवले, उपाययोजना सुरु केल्याने पायी वारी, संतांचे सोहळे वगैरे मर्यादित स्वरुपात आणि कोरोनाचे सर्व नियम निकष सांभाळून सुरु करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली. त्याचा विचार होऊन सकारात्मक निर्णय अपेक्षित होता पण तसे घडले नसल्याबद्दल या निवेदनात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

संत तुकाराम महाराज बिजोत्सव कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाविषयक सर्व नियम, निकष सांभाळून केलेल्या सत्याग्रहाच्या निमित्ताने हे सर्व सोहळे, वारी परंपरा मर्यादित स्वरुपात सुरु करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. हवेली प्रांताधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी हे निवेदन स्वीकारुन योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र, प्रत्यक्षात कसलीही चर्चा, कार्यवाही, निर्णय झाला नसल्याचे या निवेदनात म्हणण्यात आले आहे.

त्यानंतर तेच निवेदन व मागण्या विविध ठिकाणच्या वारकरी मंडळांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, महसूल मंत्री यांना पाठविल्या. मात्र, त्याची दखल घेतली गेली नसल्याचे नमूद करत वास्तविक वारकरी मंडळींना बोलावून चर्चा केली असती तर योग्य समन्वयातून चांगला मार्ग निश्चित काढून वारीची परंपरा जपण्याबरोबर अन्य प्रश्नही चर्चेने सहज सोडविता आले असते. पण तसे केले नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.