शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

वीजतोडणी तातडीने थांबविण्याची स्वाभिमानीकडून मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:48 IST

सातारा : महावितरण कंपनीतर्फे सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या निवेदनाची दखल घेतात व कुठलेही उत्तर न देता हुकूमशाही पद्धतीने अन्यायकारक वीजबिल ...

सातारा : महावितरण कंपनीतर्फे सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या निवेदनाची दखल घेतात व कुठलेही उत्तर न देता हुकूमशाही पद्धतीने अन्यायकारक वीजबिल वसुलीसाठी वीज कनेक्शन तोडली जात आहेत. ही कारवाई तत्काळ थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

स्वाभिमानीतर्फे जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्य शासनातील जबाबदार मंत्र्यांनी प्रसार माध्यमातून वेळोवेळी वीजबिल माफ करण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे एवढ्या थकबाकीचा डोंगर झालेला आहे. असे असताना अचानक लॉकडाऊन उठल्यानंतर जनतेकडे आर्थिक उत्पन्नाचे कोणतेही साधन नसताना अचानकपणे जबरदस्तीने विद्युत कनेक्शन कट करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. वेळप्रसंगी बेकायदा वसुली सुरू ठेवण्यात आली आहे. ही कारवाई तातडीने थांबवावी. अन्यथा दिनांक २४ फेब्रुवारी रोजी नागठाणे येथे सर्व बाधित ग्राहकांना घेऊन महावितरण व शासनाविरोधात हनुमान मंदिर येथून आक्रोश मोर्चा काढण्यात येईल व नागठाणे सासपडेरोड कमानीजवळ प्रश्न निकाली लागेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, याची संपूर्ण जबाबदारी महावितरणची राहील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुनराव साळुंखे, रमेश पिसाळ, विजय चव्हाण, महादेव डोंगरे, जनार्दन आवारी, हेमंत खरात, दत्तात्रय पाटील यांनी दिला आहे.