शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

भगव्या डाळिंबांच्या रोपांना परराज्यात मागणी

By admin | Updated: April 17, 2016 23:33 IST

दशरथ भोसलेंचा प्रयोग : घाडगेवाडीत शेततळ्यावर सायफनपद्धतीने रोपवाटिका तयार

दशरथ भोसलेंचा प्रयोग : घाडगेवाडीत शेततळ्यावर सायफनपद्धतीने रोपवाटिका तयारफलटण तालुक्याचा पश्चिम भाग दुष्काळी म्हणून कायमच ओळखला जातो; मात्र येथील काही शेतकरी असेही आहेत की, जिद्दीच्या जोरावर नवनवीन प्रयोग करून आदर्श शेती करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यापैकी एकच असलेले घाडगेवाडीतील दशरथ मारुती भोसले यांनी शेततळ्यांवर सायफनपद्धतीने भगवा डाळिंबांची रोपवाटिका तयार केली आहे. या रोपांना राज्याबाहेरून मागणी वाढत आहे. घाडगेवाडी हे पूर्ण दुष्काळी गाव होते. त्यावेळी १९८० मध्ये वडिलोपार्जित तीन-चार ठिकाणची जमीन विकून मुळीकवाडी गावच्या हद्दीत मारुती भोसले यांनी दहा एकर जमीन खरेदी केली. त्याचे सपाटीकरण करून त्यामध्ये विहीर खोदली; पण पाणी कमी असल्याने त्यांनी आंबा, डाळिंब आदी फळबाग घेतली. त्यांचा मुलगा दशरथ याने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यानंतर शेतीमध्ये लक्ष घातले आहे. त्यांनी डाळिंबांच्या झाडापासून कलमे तयार करून त्याची रोपे तयार करण्यास सुरुवात केली. तीन एकर डाळिंबाची लागवड केली. बाकीच्या शेतात ऊस, सीताफळ, डाळिंब, आंबा, मका आदी पिके घेतली आहेत. २००४ मध्ये दुष्काळामुळे पाणी कमी पडू लागले. त्यामुळे टँकर खरेदी करून टँकरने पाणी घालून त्यांनी बाग जगवली.त्यानंतर दशरथ भोसले यांनी डाळिंबाची रोपे तयार करून विक्रीस ठेवले. त्यांनी खात्रीलायक रोपे तयार केल्याने रोपवाटिकेस शासनमान्यता मिळाली. त्यांची डाळिंबाच्या रोपांना महाराष्ट्राबरोबर बाहेरच्या आंध्र आणि कर्नाटक राज्यांतून मागणी होत आहे.कृषी खात्यामार्फत राष्ट्रीय फलोत्पादन कार्यक्रमांतर्गत १३० बाय १३० लांबी रुंदी व सतरा फूट उंचीचे शेततळे काढून ७० ते ८० लिटर क्षमतेचा पाणीसाठा झाला आहे. या शेततळ्यातून सायफनपद्धतीने पिकांना त्यांनी पाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. बारा एकर क्षेत्र ठिबक पद्धतीने ओलिताखाली आणले आहे. त्यांनी चांगल्या प्रतीची रोपे पुरवून रोगमुक्त बागेमुळे त्यांना केंद्रीय कृषी खात्याने प्रमाणपत्र देऊन गौरविले आहे. पॉलिहाउसमध्ये दरवर्षी ८० ते ९० हजार रोपे तयार केली जातात. पाणी उसने मिळत नाहीफलटण दुष्काळी भागात पाणी म्हणजे जीवन आहे. पाण्याचे मोल आम्हा दुष्काळी शेतकऱ्यांनाच ठाऊक. आहे पाणी म्हणून वारेमाप उधळपट्टी करुन चालणार नाही. पैसे उसने वेळेत मिळतात; पण पाणी मिळत नाही. म्हणून पावसाळ्याचे पाणी जपून वापरत असतो. पावसाचे पाणी साठवून ठेवतो. त्यामुळे उन्हाळ्यातील तीन महिने पाणी ठिबकमुळे पुरते. हाच प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांनीही राबवावा. शेतीला जोडधंदा म्हणून रोपवाटिका तयार करून आर्थिक प्रगती साधली आहे. असा अनुभव दशरथ भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितला.