शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

भगव्या डाळिंबांच्या रोपांना परराज्यात मागणी

By admin | Updated: April 17, 2016 23:33 IST

दशरथ भोसलेंचा प्रयोग : घाडगेवाडीत शेततळ्यावर सायफनपद्धतीने रोपवाटिका तयार

दशरथ भोसलेंचा प्रयोग : घाडगेवाडीत शेततळ्यावर सायफनपद्धतीने रोपवाटिका तयारफलटण तालुक्याचा पश्चिम भाग दुष्काळी म्हणून कायमच ओळखला जातो; मात्र येथील काही शेतकरी असेही आहेत की, जिद्दीच्या जोरावर नवनवीन प्रयोग करून आदर्श शेती करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यापैकी एकच असलेले घाडगेवाडीतील दशरथ मारुती भोसले यांनी शेततळ्यांवर सायफनपद्धतीने भगवा डाळिंबांची रोपवाटिका तयार केली आहे. या रोपांना राज्याबाहेरून मागणी वाढत आहे. घाडगेवाडी हे पूर्ण दुष्काळी गाव होते. त्यावेळी १९८० मध्ये वडिलोपार्जित तीन-चार ठिकाणची जमीन विकून मुळीकवाडी गावच्या हद्दीत मारुती भोसले यांनी दहा एकर जमीन खरेदी केली. त्याचे सपाटीकरण करून त्यामध्ये विहीर खोदली; पण पाणी कमी असल्याने त्यांनी आंबा, डाळिंब आदी फळबाग घेतली. त्यांचा मुलगा दशरथ याने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यानंतर शेतीमध्ये लक्ष घातले आहे. त्यांनी डाळिंबांच्या झाडापासून कलमे तयार करून त्याची रोपे तयार करण्यास सुरुवात केली. तीन एकर डाळिंबाची लागवड केली. बाकीच्या शेतात ऊस, सीताफळ, डाळिंब, आंबा, मका आदी पिके घेतली आहेत. २००४ मध्ये दुष्काळामुळे पाणी कमी पडू लागले. त्यामुळे टँकर खरेदी करून टँकरने पाणी घालून त्यांनी बाग जगवली.त्यानंतर दशरथ भोसले यांनी डाळिंबाची रोपे तयार करून विक्रीस ठेवले. त्यांनी खात्रीलायक रोपे तयार केल्याने रोपवाटिकेस शासनमान्यता मिळाली. त्यांची डाळिंबाच्या रोपांना महाराष्ट्राबरोबर बाहेरच्या आंध्र आणि कर्नाटक राज्यांतून मागणी होत आहे.कृषी खात्यामार्फत राष्ट्रीय फलोत्पादन कार्यक्रमांतर्गत १३० बाय १३० लांबी रुंदी व सतरा फूट उंचीचे शेततळे काढून ७० ते ८० लिटर क्षमतेचा पाणीसाठा झाला आहे. या शेततळ्यातून सायफनपद्धतीने पिकांना त्यांनी पाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. बारा एकर क्षेत्र ठिबक पद्धतीने ओलिताखाली आणले आहे. त्यांनी चांगल्या प्रतीची रोपे पुरवून रोगमुक्त बागेमुळे त्यांना केंद्रीय कृषी खात्याने प्रमाणपत्र देऊन गौरविले आहे. पॉलिहाउसमध्ये दरवर्षी ८० ते ९० हजार रोपे तयार केली जातात. पाणी उसने मिळत नाहीफलटण दुष्काळी भागात पाणी म्हणजे जीवन आहे. पाण्याचे मोल आम्हा दुष्काळी शेतकऱ्यांनाच ठाऊक. आहे पाणी म्हणून वारेमाप उधळपट्टी करुन चालणार नाही. पैसे उसने वेळेत मिळतात; पण पाणी मिळत नाही. म्हणून पावसाळ्याचे पाणी जपून वापरत असतो. पावसाचे पाणी साठवून ठेवतो. त्यामुळे उन्हाळ्यातील तीन महिने पाणी ठिबकमुळे पुरते. हाच प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांनीही राबवावा. शेतीला जोडधंदा म्हणून रोपवाटिका तयार करून आर्थिक प्रगती साधली आहे. असा अनुभव दशरथ भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितला.