शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रपती राजवटीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:37 IST

सातारा : महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारचे चांगले काम काही लोकांना पाहवत नाही. सध्या पूर्ण बहुमताचे सरकार असून, लोकमताचा पाठिंबा ...

सातारा : महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारचे चांगले काम काही लोकांना पाहवत नाही. सध्या पूर्ण बहुमताचे सरकार असून, लोकमताचा पाठिंबा या सरकारला आहे. केवळ सरकारला अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे, अशी टीका गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.

ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्र पोलिसांची ही चांगली यंत्रणा असताना आणि महाराष्ट्र पोलिसांचे जगभर नाव घेत असताना त्यांच्यावर गैरविश्वास दाखवून बाहेरच्या यंत्रणेमार्फत तपास करा, असे म्हणायचे. हा महाराष्ट्रात राहून येथील पोलिसांवर गैरविश्वास दाखवण्यासारखे आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत असतात. एखाद्या बाबीचा तपास करताना संबंधित यंत्रणेच्या अधिकृत प्रतिनिधींकडून तपासात काय प्रगती झाली आहे, हे बाहेर येत नाही तोपर्यंत बाहेर केवळ वावड्या उठत असतात, त्यावर बोलणे योग्य नाही.’’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार, मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारची भक्कमपणे वाटचाल सुरू आहे. गृहमंत्र्यांवर गुन्हा दाखल होणार का, या प्रश्नावर मी काही बोलू शकत नाही. गृहमंत्रालयाच्या समोर नेमकी परिस्थिती येईल त्यानुसार निर्णय घेतला जाईल.

सध्या पोलीस खात्याची प्रतिमा मलीन झाल्याचे चित्र आहे. मुंबई पोलिसांची नाचक्की झाली असून, ती भरून काढण्यासाठी काय केले जाईल, या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्र पोलीस दल मोठे आहे. अनेक अधिकारी आहेत. एखादा अधिकारी चुकला म्हणून सगळ्यांना दोषी धरणे योग्य नाही’’; तसेच पोलिसांची प्रतिमा मलीन झाली, असे म्हणणे योग्य नाही. यापुढेही मुंबई पोलीस नावलौकिकाला साजेसे काम करत राहतील, असा विश्वासदेखील देसाई यांनी व्यक्त केला.

वाजे प्रकरणाची मुख्यमंत्र्यांना सर्व माहिती होती, तरी त्यांनी या प्रकरणावर पांघरूण घातले आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे, यावर मंत्री देसाई म्हणाले, ‘‘टीका करणे विरोधकांचे कामच आहे, ते काही बोलतील त्या प्रत्येक गोष्टीला सरकार उत्तर देऊ शकणार नाही.’’ परमबीर सिंग यांच्या संपत्तीची चौकशी करण्याच्या मुद्यावर मंत्री देसाई यांनी हा विषय माझ्यापर्यंत आलेला नाही, तसेच माझ्या कार्यातील विषय नाही, त्यामुळे याबाबत शासन स्तरावर योग्य व्यक्तीला विचारा, असे म्हणत त्यांनी टाळले.