शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

सरकारला अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रपती राजवटीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:37 IST

सातारा : महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारचे चांगले काम काही लोकांना पाहवत नाही. सध्या पूर्ण बहुमताचे सरकार असून, लोकमताचा पाठिंबा ...

सातारा : महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारचे चांगले काम काही लोकांना पाहवत नाही. सध्या पूर्ण बहुमताचे सरकार असून, लोकमताचा पाठिंबा या सरकारला आहे. केवळ सरकारला अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे, अशी टीका गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.

ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्र पोलिसांची ही चांगली यंत्रणा असताना आणि महाराष्ट्र पोलिसांचे जगभर नाव घेत असताना त्यांच्यावर गैरविश्वास दाखवून बाहेरच्या यंत्रणेमार्फत तपास करा, असे म्हणायचे. हा महाराष्ट्रात राहून येथील पोलिसांवर गैरविश्वास दाखवण्यासारखे आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत असतात. एखाद्या बाबीचा तपास करताना संबंधित यंत्रणेच्या अधिकृत प्रतिनिधींकडून तपासात काय प्रगती झाली आहे, हे बाहेर येत नाही तोपर्यंत बाहेर केवळ वावड्या उठत असतात, त्यावर बोलणे योग्य नाही.’’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार, मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारची भक्कमपणे वाटचाल सुरू आहे. गृहमंत्र्यांवर गुन्हा दाखल होणार का, या प्रश्नावर मी काही बोलू शकत नाही. गृहमंत्रालयाच्या समोर नेमकी परिस्थिती येईल त्यानुसार निर्णय घेतला जाईल.

सध्या पोलीस खात्याची प्रतिमा मलीन झाल्याचे चित्र आहे. मुंबई पोलिसांची नाचक्की झाली असून, ती भरून काढण्यासाठी काय केले जाईल, या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्र पोलीस दल मोठे आहे. अनेक अधिकारी आहेत. एखादा अधिकारी चुकला म्हणून सगळ्यांना दोषी धरणे योग्य नाही’’; तसेच पोलिसांची प्रतिमा मलीन झाली, असे म्हणणे योग्य नाही. यापुढेही मुंबई पोलीस नावलौकिकाला साजेसे काम करत राहतील, असा विश्वासदेखील देसाई यांनी व्यक्त केला.

वाजे प्रकरणाची मुख्यमंत्र्यांना सर्व माहिती होती, तरी त्यांनी या प्रकरणावर पांघरूण घातले आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे, यावर मंत्री देसाई म्हणाले, ‘‘टीका करणे विरोधकांचे कामच आहे, ते काही बोलतील त्या प्रत्येक गोष्टीला सरकार उत्तर देऊ शकणार नाही.’’ परमबीर सिंग यांच्या संपत्तीची चौकशी करण्याच्या मुद्यावर मंत्री देसाई यांनी हा विषय माझ्यापर्यंत आलेला नाही, तसेच माझ्या कार्यातील विषय नाही, त्यामुळे याबाबत शासन स्तरावर योग्य व्यक्तीला विचारा, असे म्हणत त्यांनी टाळले.