शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

स्वच्छतेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:26 IST

सातारा : शहरातील सदर बझार व परिसरात साथरोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच ...

सातारा : शहरातील सदर बझार व परिसरात साथरोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच सदर बझार परिसरात ठिकठिकाणच्या गटारी कचऱ्याने तुडुंब भरल्या आहेत तर सांडपाणीही रस्त्यावरून वाहत आहे. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, साथरोगाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

वातावरणात बदल

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे तापमानातही सतत चढउतार होत आहे. पावसामुळे सर्वत्र थंडीची तीव्रता वाढली आहे. हवामान विभागाने मंगळवारी साताऱ्याचे कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २१.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. महाबळेश्वरचा पाराही रविवारी १८ अंशांवर स्थिरावला.

कोळशाला मागणी

महाबळेश्वर : सर्वाधिक पर्जन्यवृष्टीचे ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे थंडीचे प्रमाण वाढले असून, या थंडीपासून बचाव करण्यासाठी कोळशाला मागणी वाढू लागली आहे. पावसामुळे घरोघरी कोळशाच्या शेगड्या पेटू लागल्या आहेत. यासाठी लागणारा कोळसा हा परजिल्ह्यातून आयात केला जातो. सध्या २५ ते ३० रुपये किलो या दराने कोळशाची विक्री सुरू आहे.

फांद्या हटविल्या

सातारा : वीज वितरण कंपनीकडून मंगळवारी दिसवभर वीज वाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या धोकादायक फांद्या हटविण्याचे काम करण्यात आले. या फांद्या वाहनधारक तसेच पादचाऱ्यांच्या अंगावर पडण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे वीज वितरण कंपनीने धोकादायक फांद्या हटविण्याचे काम तातडीने हाती घेतले. या कामामुळे शहराच्या काही भागाचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

दुरुस्तीची मागणी

सातारा : अजिंक्यतारा किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळीच रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. सुमारे अर्धा किलोमीटरचा रस्ता ठिकठिकाणी उखडला असून, खडी रस्त्यावरून आली आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणे धोक्याचे ठरू लागले आहे. बांधकाम विभागाने याबाबत तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

रिफ्लेक्टरची मागणी

शेंद्रे : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून काही ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना संभ्रम निर्माण होत आहे. रिफ्लेक्टर नसल्यामुळे महामार्गावर लहान-मोठे अपघात घडू लागले आहेत. प्रामुख्याने वाढे फाटा ते लिंबखिंड या परिसरात दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टरला अभाव जाणवत आहे.

कारवाईला ब्रेक

सातारा : पालिकेकडून मास्कचा वापर न करणाऱ्यांवर सुरू करण्यात आलेली कारवाई मोहीम थंडावली आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक बाजारपेठेत मास्कविना निर्धास्तपणे वावरत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानंतर पालिकेकडून काही दिवस कारवाई करण्यात आली. मात्र, ही मोहीम आता पूर्णपणे थंडावली आहे.

नियमांचे उल्लंघन

सातारा : संचारबंदीच्या नियमांचे नागरिकांकडून वारंवार उल्लंघन केले जात असून, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. संचारबंदीच्या अटी शिथिल केल्या नसताना बाजारपेठेत नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. या गर्दीवर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना संक्रमण वाढीचा धोका निर्माण होऊ शकतो.

झुुडपांचे साम्राज्य

किडगाव : पावसामुळे सातारा-वाई मार्गावर असेल्या वर्ये पुलाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहे. या झुडपांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी या झुडपांचा वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आधीच धोकादायक वळण त्यात झुडुपांचे साम्राज्य वाढल्याने वाहनधारकांची फसगत होत आहे.