शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:26 IST

सातारा : शहरातील सदर बझार व परिसरात साथरोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच ...

सातारा : शहरातील सदर बझार व परिसरात साथरोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच सदर बझार परिसरात ठिकठिकाणच्या गटारी कचऱ्याने तुडुंब भरल्या आहेत तर सांडपाणीही रस्त्यावरून वाहत आहे. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, साथरोगाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

वातावरणात बदल

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे तापमानातही सतत चढउतार होत आहे. पावसामुळे सर्वत्र थंडीची तीव्रता वाढली आहे. हवामान विभागाने मंगळवारी साताऱ्याचे कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २१.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. महाबळेश्वरचा पाराही रविवारी १८ अंशांवर स्थिरावला.

कोळशाला मागणी

महाबळेश्वर : सर्वाधिक पर्जन्यवृष्टीचे ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे थंडीचे प्रमाण वाढले असून, या थंडीपासून बचाव करण्यासाठी कोळशाला मागणी वाढू लागली आहे. पावसामुळे घरोघरी कोळशाच्या शेगड्या पेटू लागल्या आहेत. यासाठी लागणारा कोळसा हा परजिल्ह्यातून आयात केला जातो. सध्या २५ ते ३० रुपये किलो या दराने कोळशाची विक्री सुरू आहे.

फांद्या हटविल्या

सातारा : वीज वितरण कंपनीकडून मंगळवारी दिसवभर वीज वाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या धोकादायक फांद्या हटविण्याचे काम करण्यात आले. या फांद्या वाहनधारक तसेच पादचाऱ्यांच्या अंगावर पडण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे वीज वितरण कंपनीने धोकादायक फांद्या हटविण्याचे काम तातडीने हाती घेतले. या कामामुळे शहराच्या काही भागाचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

दुरुस्तीची मागणी

सातारा : अजिंक्यतारा किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळीच रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. सुमारे अर्धा किलोमीटरचा रस्ता ठिकठिकाणी उखडला असून, खडी रस्त्यावरून आली आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणे धोक्याचे ठरू लागले आहे. बांधकाम विभागाने याबाबत तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

रिफ्लेक्टरची मागणी

शेंद्रे : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून काही ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना संभ्रम निर्माण होत आहे. रिफ्लेक्टर नसल्यामुळे महामार्गावर लहान-मोठे अपघात घडू लागले आहेत. प्रामुख्याने वाढे फाटा ते लिंबखिंड या परिसरात दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टरला अभाव जाणवत आहे.

कारवाईला ब्रेक

सातारा : पालिकेकडून मास्कचा वापर न करणाऱ्यांवर सुरू करण्यात आलेली कारवाई मोहीम थंडावली आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक बाजारपेठेत मास्कविना निर्धास्तपणे वावरत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानंतर पालिकेकडून काही दिवस कारवाई करण्यात आली. मात्र, ही मोहीम आता पूर्णपणे थंडावली आहे.

नियमांचे उल्लंघन

सातारा : संचारबंदीच्या नियमांचे नागरिकांकडून वारंवार उल्लंघन केले जात असून, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. संचारबंदीच्या अटी शिथिल केल्या नसताना बाजारपेठेत नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. या गर्दीवर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना संक्रमण वाढीचा धोका निर्माण होऊ शकतो.

झुुडपांचे साम्राज्य

किडगाव : पावसामुळे सातारा-वाई मार्गावर असेल्या वर्ये पुलाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहे. या झुडपांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी या झुडपांचा वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आधीच धोकादायक वळण त्यात झुडुपांचे साम्राज्य वाढल्याने वाहनधारकांची फसगत होत आहे.