शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:26 IST

वाठार स्टेशन : पावसामुळे सातारा - कोंडवे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. ...

वाठार स्टेशन : पावसामुळे सातारा - कोंडवे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. शिवाय रुंदीकरणाच्या कामामुळेदेखील रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. एका बाजूचा रस्ता मोठ्या प्रमाणात उखडला असून, दुसऱ्या बाजूला खोदकाम सुरू आहे. त्यामुळे वाहनधारकांना ये-जा करताना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत आहे. या मार्गाची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांमधून केली जात आहे.

वाहतुकीच्या कोंडीने वाहनधारक हैराण

सातारा : संचारबंदीचे निर्बंध शिथील झाले असून, बाजारपेठ सकाळी नऊ ते सायंकाळी चार यावेळेत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे साताऱ्यात खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. शहरातील तांदूळ आळी, चांदणी चौक व खण आळी या परिसरात वाहतुकीची सातत्याने कोंडी होत आहे. अनेक खासगी तसेच मालवाहतूक करणारी वाहने रस्त्याकडेला लावली जात असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. याचा पादचाऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

नैसर्गिक ओढ्यांत कचऱ्याचे साम्राज्य

सातारा : घंटागाडी दारात येऊनही नागरिकांचे ओढ्यात कचरा टाकण्याचे प्रमाण काही कमी झालेले नाही. ठिकठिकाणच्या नैसर्गिक ओढ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचू लागले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पालिकेच्या आरोग्य विभागाने विशेष मोहीम राबवून शहरातील सर्व नाले, ओढे कचरामुक्त केले होते. मात्र, पावसाने उघडीप देताच बहुंताश ओढे कचऱ्याने पुन्हा भरले आहेत. ओढ्यात कचरा टाकणाऱ्यांवर पालिकेने दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

प्लास्टिक पिशव्यांच्या वापरात पुन्हा वाढ

सातारा : शासनाने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने राज्यात प्लास्टिकबंदी लागू केली. त्यानुसार सातारा पालिकेकडून शहरात प्लास्टिकविरोधी मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात आली. या अनुषंगाने विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांसह तत्सम वस्तू जप्त करून दंडही वसूल करण्यात आला. मात्र, ही मोहीम गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्याने शहरातील छोट्या-मोठ्या विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांच्या वापरात पुन्हा वाढ झाली आहे. पालिकेने प्लास्टिकविरोधी कारवाई सुरू करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

‘मार्निंग वॉक’ला नागरिकांची गर्दी

सातारा : लॉकडाऊन शिथील झाल्याने सातारकर मॉर्निंग वॉकसाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडू लागले आहेत. नागरिकांकडून सोशल डिस्टन्सचे पालन करण्याबरोबरच सुरक्षेची पुरेपूर काळजीदेखील घेतली जात आहे. अजिंक्यतारा किल्ला, मंगळाई देवी मंदिर, चार भिंती, कुरणेश्वर, यवतेश्वर याठिकाणी नागरिक मॉर्निंग वॉकला येत आहेत. सध्या थंडीची तीव्रता वाढल्याने वयोवृद्ध नागरिकांची संंख्या मात्र कमी झाली आहे.