शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
6
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
7
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
8
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
9
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
10
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
12
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
13
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
14
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
15
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
16
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
17
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
18
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
19
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
20
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन

संपर्क तुटलेल्या ८५ गावांत सुविधा पोहोचवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:35 IST

महाबळेश्वर : ‘अतिवृष्टीमुळे संपर्क तुटलेल्या ८५ गावांमधील लोकांपर्यंत सर्व सोयी-सुविधा पोहोचवा, मदतीपासून एकही गाव वंचित राहता कामा नये,’ ...

महाबळेश्वर : ‘अतिवृष्टीमुळे संपर्क तुटलेल्या ८५ गावांमधील लोकांपर्यंत सर्व सोयी-सुविधा पोहोचवा, मदतीपासून एकही गाव वंचित राहता कामा नये,’ अशा सूचना आमदार मकरंद पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

महाबळेश्वर येथील हिरडा विश्रामगृहावर तालुका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित होते. आमदार मकरंद पाटील यांनी प्रशासनातील सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांना संपर्क तुटलेल्या गावांमध्ये सर्वतोपरी मदत पोहोचविण्याची सूचना केली. या बैठकीला प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, बाळासाहेब भिलारे, तहसीलदार सुषमा चैधरी पाटील, राजेंद्र राजपुरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे महेश गोंजारी, उपनगराध्यक्ष अफजल सुतार, गटविकास अधिकारी नारायण घोलप, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, वनक्षेत्रपाल आर. सी. परदेशी, वनरक्षक लहू राऊत आदी मान्यवरांसह विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

अंबेनळी घाट तीन ठिकाणी तुटला आहे तर २ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर दरड कोसळली आहे. महाबळेश्वर - तापोळा रस्त्याचीही अशीच परिस्थिती आहे, त्यामुळे हे दोन्ही प्रमख मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. हे दोन्ही रस्ते बंद असल्याने पर्यायी मार्ग सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाबळेश्वर - तापोळा मार्गावरील वाहतूक लवकर सुरू होईल; परंतु अंबेनळी घाट रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत होण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. महावितरणचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्त्याअभावी वीज सुरळीत करण्यासाठी गावात पोहोचता येत नाही, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.

‘अधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न सांगता गावागावात पोहोचावे. गावात जे-जे नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे तत्काळ सुरू करा, मदतीसाठी लोकांपर्यंत पोहोचा’, अशा सूचना आमदार मकरंद पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना केल्या.

या बैठकीला आगार व्यवस्थापक नामदेव पंतगे, पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडुभैरी, संजय जंगम, दत्तात्रय वाडकर, सुरेश सावंत, तौफिक पटवेकर, रोहित ढेबे, विशाल तोष्णीवाल, संदीप मोरे, शरद बावळेकर, प्रवीण भिलारे, आदी मान्यवर उपस्थित होते.

चौकट...

अनेक गावांमधील वीज गायब...

गेल्या चार दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यावर अस्मानी संकट कोसळले आहे. तालुक्यातील रहदारीचे सर्वच प्रमुख रस्ते तुटले आहेत. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. तालुक्यातील ११३ गावांपैकी पश्चिम भागातील ८५ गावांचा संपर्क तुटला आहे. यापैकी अनेक गावांमधून वीज गायब झाल्याने मोबाईलही बंद पडले आहेत. अनेक ठिकाणी आता संपर्क करणेही अवघड झाले आहे. शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.

२५ महाबळेश्वर

महाबळेश्वर येथील हिरडा विश्रामगृहावर तालुका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील यांच्यासह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.