शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संपर्क तुटलेल्या ८५ गावांत सुविधा पोहोचवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:35 IST

महाबळेश्वर : ‘अतिवृष्टीमुळे संपर्क तुटलेल्या ८५ गावांमधील लोकांपर्यंत सर्व सोयी-सुविधा पोहोचवा, मदतीपासून एकही गाव वंचित राहता कामा नये,’ ...

महाबळेश्वर : ‘अतिवृष्टीमुळे संपर्क तुटलेल्या ८५ गावांमधील लोकांपर्यंत सर्व सोयी-सुविधा पोहोचवा, मदतीपासून एकही गाव वंचित राहता कामा नये,’ अशा सूचना आमदार मकरंद पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

महाबळेश्वर येथील हिरडा विश्रामगृहावर तालुका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित होते. आमदार मकरंद पाटील यांनी प्रशासनातील सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांना संपर्क तुटलेल्या गावांमध्ये सर्वतोपरी मदत पोहोचविण्याची सूचना केली. या बैठकीला प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, बाळासाहेब भिलारे, तहसीलदार सुषमा चैधरी पाटील, राजेंद्र राजपुरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे महेश गोंजारी, उपनगराध्यक्ष अफजल सुतार, गटविकास अधिकारी नारायण घोलप, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, वनक्षेत्रपाल आर. सी. परदेशी, वनरक्षक लहू राऊत आदी मान्यवरांसह विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

अंबेनळी घाट तीन ठिकाणी तुटला आहे तर २ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर दरड कोसळली आहे. महाबळेश्वर - तापोळा रस्त्याचीही अशीच परिस्थिती आहे, त्यामुळे हे दोन्ही प्रमख मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. हे दोन्ही रस्ते बंद असल्याने पर्यायी मार्ग सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाबळेश्वर - तापोळा मार्गावरील वाहतूक लवकर सुरू होईल; परंतु अंबेनळी घाट रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत होण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. महावितरणचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्त्याअभावी वीज सुरळीत करण्यासाठी गावात पोहोचता येत नाही, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.

‘अधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न सांगता गावागावात पोहोचावे. गावात जे-जे नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे तत्काळ सुरू करा, मदतीसाठी लोकांपर्यंत पोहोचा’, अशा सूचना आमदार मकरंद पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना केल्या.

या बैठकीला आगार व्यवस्थापक नामदेव पंतगे, पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडुभैरी, संजय जंगम, दत्तात्रय वाडकर, सुरेश सावंत, तौफिक पटवेकर, रोहित ढेबे, विशाल तोष्णीवाल, संदीप मोरे, शरद बावळेकर, प्रवीण भिलारे, आदी मान्यवर उपस्थित होते.

चौकट...

अनेक गावांमधील वीज गायब...

गेल्या चार दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यावर अस्मानी संकट कोसळले आहे. तालुक्यातील रहदारीचे सर्वच प्रमुख रस्ते तुटले आहेत. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. तालुक्यातील ११३ गावांपैकी पश्चिम भागातील ८५ गावांचा संपर्क तुटला आहे. यापैकी अनेक गावांमधून वीज गायब झाल्याने मोबाईलही बंद पडले आहेत. अनेक ठिकाणी आता संपर्क करणेही अवघड झाले आहे. शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.

२५ महाबळेश्वर

महाबळेश्वर येथील हिरडा विश्रामगृहावर तालुका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील यांच्यासह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.