शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

दीनवाणा ठरतोय महिला लोकशाही दिन!

By admin | Updated: March 18, 2015 23:58 IST

दोन महिन्यात तीन तक्रारी : अन्यायग्रस्त महिलांना धाडसाने पुढे येण्याचे आवाहन

प्रदीप यादव - सातारा  -महिलांवर होणाऱ्या अन्यायाला न्याय मिळावा, त्यांच्या तक्रारींचे निवारण व्हावे, या हेतूने प्रशासनाने महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी खास महिलांसाठी ‘महिला लोकशाही दिन’ सुरू केला आहे. मात्र, या लोकशाही दिनात येणाऱ्या तक्रारींची संख्या पाहता खरंच दीनवाणे वाटते. या महिन्यात केवळ दोनच महिलांनी आपला तक्रारी अर्ज दाखल केला आहे. तर गेल्या महिन्यात केवळ एक तक्रार दाखल झाली होती. अधिकाऱ्यांना दुपारपर्यंत तक्रारींची वाट पाहात बसावे लागले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सोमवारी महिला लोकशाही दिन झाला. सकाळी अकरा ते दुपारी एक या कालावधीत या लोकशाही दिनात केवळ दोनच महिलांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे यांच्याजवळ लेखी स्वरूपात आपले गाऱ्हाणे मांडले. यामध्ये एक कौटुंबिक छळाची तक्रार तर दुसरी पतीच्या निधनानंतर त्यांच्या सेवानिवृत्तीची रक्कम खात्यावर जमा होत नसल्याची तक्रार आहे. दोन्ही तक्रारी साताऱ्यातील आहे. तालुकास्तरावर उदासीनतातालुकास्तरावर तहसीलदार कार्यालयात महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन घेतला जातो. याठिकाणी दाखल झालेल्या तक्रारी पुढे जिल्हास्तरावर पाठविल्या जातात. मात्र, आज कोणत्याच तालुक्यातून तक्रार पुढे आलेली नाही. महिलांना आपल्या तक्रारी दाखल करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात सुविधा उपलब्ध आहे. तक्रारींचा निपटारा वेळेत व्हावा, यासाठी अधिकाऱ्यांनी सक्षमपणे काम करायला हवे. असे झाल्यास महिलांचे मनोबल वाढून त्या आपल्या तक्रारी घेऊन पुढे येतील, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.विविध स्तरांवर मागता येते दादमहिन्याच्या दुसऱ्या सोमवारी तालुकास्तरावर महिला लोकशाही दिन घेतला जातो. त्याठिकाणी दाखल केलेल्या तक्रारींचे समाधान झाले नाही तर तक्रारदाराला जिल्हास्तरावर दाद मागता येते. जिल्हास्तरावर न्याय नाही मिळाला तर विभागीय स्तरावर आणि येथे तक्रारींचा निपटारा झाला नाही तर तक्रारदाराला राज्यस्तरावर होणाऱ्या महिला लोकशाही दिनात दाद मागता येते. महिलांवर होणारे अन्याय अत्याचार रोखता यावेत, यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू ठेवले आहेत. मात्र, यासाठी महिलांनी अन्याय सहन न करता धाडसाने पुढे यायला हवे, असे ढवळे यांनी सांगितले.महिन्यात तक्रारींचे निवारणमहिला लोकशाही दिनात तक्रार दाखल झाल्यानंतर एक महिन्यात त्याचे निवारण केले जाते. दाखल झालेल्या तक्रारी ज्या-त्या विभागाकडे पाठविल्या जातात. तक्रारदारांनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. महिलांनी अन्याय सहन करत बसण्यापेक्षा न्यायासाठी धडपड करायला हवी. महिला आपल्या तक्रारी सांगत नाहीत. म्हणूनच त्यांच्यासाठी खास महिला लोकशाही दिन सुरू केला आहे. महिलांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. पण महिलांनी पुढे यायला हवे.- रोहिणी ढवळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी