शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

Lok Sabha Election 2019 घराण्यासाठी वाद थांबविण्याचा निर्णय: शिवेंद्रसिंहराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 23:02 IST

शेंद्रे : ‘आजवर पक्ष व गट म्हणून आपण प्रत्येक जण भांडलो. मात्र, ज्या गोष्टी होऊन गेल्या त्या आपण बदलू ...

शेंद्रे : ‘आजवर पक्ष व गट म्हणून आपण प्रत्येक जण भांडलो. मात्र, ज्या गोष्टी होऊन गेल्या त्या आपण बदलू शकत नाहीत. भांडणातून आणि संघर्षातून कोणाचाच विकास होत नाही आणि काहीही साध्य होत नाही. शिवछत्रपतींच्या घराण्याचे वलय आपापसातील वादामुळे मलीन होऊ नये म्हणून हा संघर्ष थांबविण्याचा निर्णय आम्ही घेतला. कार्यकर्त्यांनीही एकत्रित प्रयत्न करून उदयनराजेंना प्रचंड मतांनी विजयी करूया,’ असे आवाहन आमदार शिवेंद्र्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या निवडणूकीच्या प्रचारार्थ सोनगाव, ता. सातारा येथे आयोजित शेंद्र्रे व परळी जिल्हा परिषद गटातील मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर उदयनराजे भोसले, सारंग पाटील, सुनील काटकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. विक्रम पवार, पंचायत समितीचे उपसभापती जितेंद्र सावंत, अरविंद चव्हाण, शिवाजीराव चव्हाण, कमल जाधव, वनिता पोतेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘उरमोडीचे धरण झाले आता कॅनॉल झाले पाहिजे. कारण कॅनॉलमुळेच हरितक्रांती घडेल. मात्र त्यासाठी आघाडीचे सरकार अस्तित्वात यायला हवे. सध्याचे केंद्र व राज्यातील सरकार शेतकऱ्यांबाबत उदासीन आहे. सध्या देशातील कोणताही घटक सरकारच्या कारभारावर खूश नाही. बळीराजा अगोदरच अडचणीत आला आहे. नोटबंदीच्या प्रयोगामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकही अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र देशात हुकूमशाहीचे अवडंबर माजू द्यायचे नसेल तर सध्याचे सरकार हटवा.’हे नाणं ओरिजनल आहे.. उदयनराजे‘निम्म्याहून अधिक लढाई नियोजनावर अवलंबून असते. सर्व बूथ कमिटी सदस्य सक्रिय झाल्याने केवळ माझाच आत्मविश्वास वाढला, असे नाहीतर विधानसभेच्या आगामी निवडणुकीतून शिवेंद्रसिंहराजे पुन्हा आमदार असतील, हे सिद्ध झाले आहे. ज्यांनी जनतेची दिशाभूल केली. केसाने गळा कापला आणि जे सर्वसामान्यांवर रुबाब दाखवतात, त्यांना धडा शिकवणारे खणखणीत नाणं आम्ही आहोत. हे नाणं ओरिजनल आहे. शोले सिनेमातल्यासारखे बनावट नाही. जनता आमचाच विचार करेल, अशी आम्हास खात्री आहे.’

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक