शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
3
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
7
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
8
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
9
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
10
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
11
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
12
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
13
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
14
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
15
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
16
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
18
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
19
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
20
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री

निर्णयप्रक्रिया अडकली; म्हणून आग भडकली

By admin | Updated: December 26, 2014 00:52 IST

खंडाळ्याला लालफितीचा चटका : जमीन संपादन करुनही अग्निशमन यंत्रणेचा पत्ताच नाही

शिरवळ : खंडाळा तालुक्यामध्ये शिरवळ, लोणंद व खंडाळा परिसरात वाढत असलेल्या औद्योगिकीकरणामुळे एकीकडे विकास होत असताना दुसरीकडे मात्र आगीसारख्या दुर्दैवी घटना घडत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी होत आहे. मात्र, खंडाळा तालुक्यामध्ये अग्निशमन यंत्रणेसाठी जागा संपादित होऊनही अद्यापही ही यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे येथील अग्निशमन यंत्रणा कधी कार्यान्वित होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.खंडाळा तालुक्यामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या औद्योगिक धोरणानुसार मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण वाढत आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या कंपन्यांमध्ये आगीसारखे दुर्दैवी प्रकार होऊन नुकसान होऊ नये, याकरिता केसुर्डी टप्पा क्र. १ मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे तत्कालीन प्रादेशिक अधिकारी रवी खेबुडकर यांनी पुढाकार घेऊन महामार्गालगतच अग्निशमन यंत्रणेसाठी जागा संपादित केली होती. खेबुडकर यांच्या बदलीनंतर संबंधित अग्निशमन यंत्रणेचा प्रस्ताव अद्यापही धूळखात पडलेला आहे. औद्योगिकतेचा टप्पा क्र. २ पूर्ण होऊनही अद्यापही अग्निशमन यंत्रणेचा ठावठिकाणा लागलेला दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सध्यातरी गांधारीच्या भूमिकेतून वावरताना दिसत आहे.साधारणपणे शिरवळजवळील गावडेवाडी या ठिकाणी भंगारच्या दुकानाला आग लागून सुदैवाने जीवितहानी न होता वित्तहानी मोठ्या प्रमाणात होऊन लाखो रुपयांचे नुकसान त्याठिकाणी झाले होते. या दुकानाला आग तब्बल दोन वेळा लागली. संबंधिताला मोठ्या प्रमणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. तर राष्ट्रीय महामार्गावरच अचानकपणे मालट्रकने पेट घेऊन वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली होती. अशातच पंधरा दिवसांपूर्वीच शिरवळ याठिकाणी डॉल्बी सिस्टीमला आग लागून सुमारे वीस लाखांचे नुकसान झाले. तर बुधवार, दि. २४ रोजी दुकानांना आग लागून २५ लाखांचे नुकसान झाले.दरम्यान, बुधवारी लागलेल्या आगीवेळी अग्निशमन बंब त्वरित उपलब्ध झाले असते तर वित्तहानी टाळता आली असती. मात्र, नागरिकांनी भुर्इंज येथील किसन वीर कारखाना याठिकाणी संपर्क साधला असता, संबंधितांनी कारखाना सुरू असल्याने बंब पाठविण्यास नकार दिला. तर वाई, महाबळेश्वर येथील अग्निशमन केंद्रांतील दूरध्वनी केवळ खणखणतच राहिले. दरम्यान, पोलिसांनी व नागरिकांनी प्रसंगावधान राखत केलेल्या प्रयत्नामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. नाही तर आगीने रौद्ररूप धारण करून मेनरोडवरील तब्बल १५ ते २० दुकानांना या आगीमुळे नुकसान सोसावे लागले असते.दरम्यान, मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण होऊनही व आगीसारख्या घटना मोठ्या प्रमाणात घडूनही औद्योगिक विकास महामंडळाकडून कानाडोळा करण्यात येत आहे. येथील अग्निशमन केंद्रासाठी संपादित केलेली जमीन केवळ शोपीस ठरली आहे. शिरवळ ग्रामपंचायतीने अग्निशमन केंद्रासाठी सकारात्मकता दाखवूनही तो प्रस्ताव लालफितीच्या कारभारात अडकला आहे. (प्रतिनिधी)खेबुडकर यांची कार्यतत्परताशिरवळ, ता. खंडाळा, येथे आग लागल्याचे वाईचे प्रांताधिकारी रवी खेबुडकर यांना समजताच त्यांनी तातडीने याबाबतची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना दिली. त्यानंतर त्यांनी स्वत: भुर्इंज, वाई, महाबळेश्वर याठिकाणी दूरध्वनीद्वारे अग्निशमन बंब पाठविण्यासंदर्भात सूचना केल्या. मात्र, त्यांनाही येथील भोंगळ कारभाराचा फटका बसला. त्यामुळे त्यांनी थेट मुंबई येथे संपर्क साधत हिंजवडी व सासवड पुणे येथील अग्निशमन यंत्रणा पाठविण्याच्या हालचाली केल्या.