शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

निर्णयप्रक्रिया अडकली; म्हणून आग भडकली

By admin | Updated: December 26, 2014 00:52 IST

खंडाळ्याला लालफितीचा चटका : जमीन संपादन करुनही अग्निशमन यंत्रणेचा पत्ताच नाही

शिरवळ : खंडाळा तालुक्यामध्ये शिरवळ, लोणंद व खंडाळा परिसरात वाढत असलेल्या औद्योगिकीकरणामुळे एकीकडे विकास होत असताना दुसरीकडे मात्र आगीसारख्या दुर्दैवी घटना घडत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी होत आहे. मात्र, खंडाळा तालुक्यामध्ये अग्निशमन यंत्रणेसाठी जागा संपादित होऊनही अद्यापही ही यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे येथील अग्निशमन यंत्रणा कधी कार्यान्वित होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.खंडाळा तालुक्यामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या औद्योगिक धोरणानुसार मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण वाढत आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या कंपन्यांमध्ये आगीसारखे दुर्दैवी प्रकार होऊन नुकसान होऊ नये, याकरिता केसुर्डी टप्पा क्र. १ मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे तत्कालीन प्रादेशिक अधिकारी रवी खेबुडकर यांनी पुढाकार घेऊन महामार्गालगतच अग्निशमन यंत्रणेसाठी जागा संपादित केली होती. खेबुडकर यांच्या बदलीनंतर संबंधित अग्निशमन यंत्रणेचा प्रस्ताव अद्यापही धूळखात पडलेला आहे. औद्योगिकतेचा टप्पा क्र. २ पूर्ण होऊनही अद्यापही अग्निशमन यंत्रणेचा ठावठिकाणा लागलेला दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सध्यातरी गांधारीच्या भूमिकेतून वावरताना दिसत आहे.साधारणपणे शिरवळजवळील गावडेवाडी या ठिकाणी भंगारच्या दुकानाला आग लागून सुदैवाने जीवितहानी न होता वित्तहानी मोठ्या प्रमाणात होऊन लाखो रुपयांचे नुकसान त्याठिकाणी झाले होते. या दुकानाला आग तब्बल दोन वेळा लागली. संबंधिताला मोठ्या प्रमणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. तर राष्ट्रीय महामार्गावरच अचानकपणे मालट्रकने पेट घेऊन वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली होती. अशातच पंधरा दिवसांपूर्वीच शिरवळ याठिकाणी डॉल्बी सिस्टीमला आग लागून सुमारे वीस लाखांचे नुकसान झाले. तर बुधवार, दि. २४ रोजी दुकानांना आग लागून २५ लाखांचे नुकसान झाले.दरम्यान, बुधवारी लागलेल्या आगीवेळी अग्निशमन बंब त्वरित उपलब्ध झाले असते तर वित्तहानी टाळता आली असती. मात्र, नागरिकांनी भुर्इंज येथील किसन वीर कारखाना याठिकाणी संपर्क साधला असता, संबंधितांनी कारखाना सुरू असल्याने बंब पाठविण्यास नकार दिला. तर वाई, महाबळेश्वर येथील अग्निशमन केंद्रांतील दूरध्वनी केवळ खणखणतच राहिले. दरम्यान, पोलिसांनी व नागरिकांनी प्रसंगावधान राखत केलेल्या प्रयत्नामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. नाही तर आगीने रौद्ररूप धारण करून मेनरोडवरील तब्बल १५ ते २० दुकानांना या आगीमुळे नुकसान सोसावे लागले असते.दरम्यान, मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण होऊनही व आगीसारख्या घटना मोठ्या प्रमाणात घडूनही औद्योगिक विकास महामंडळाकडून कानाडोळा करण्यात येत आहे. येथील अग्निशमन केंद्रासाठी संपादित केलेली जमीन केवळ शोपीस ठरली आहे. शिरवळ ग्रामपंचायतीने अग्निशमन केंद्रासाठी सकारात्मकता दाखवूनही तो प्रस्ताव लालफितीच्या कारभारात अडकला आहे. (प्रतिनिधी)खेबुडकर यांची कार्यतत्परताशिरवळ, ता. खंडाळा, येथे आग लागल्याचे वाईचे प्रांताधिकारी रवी खेबुडकर यांना समजताच त्यांनी तातडीने याबाबतची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना दिली. त्यानंतर त्यांनी स्वत: भुर्इंज, वाई, महाबळेश्वर याठिकाणी दूरध्वनीद्वारे अग्निशमन बंब पाठविण्यासंदर्भात सूचना केल्या. मात्र, त्यांनाही येथील भोंगळ कारभाराचा फटका बसला. त्यामुळे त्यांनी थेट मुंबई येथे संपर्क साधत हिंजवडी व सासवड पुणे येथील अग्निशमन यंत्रणा पाठविण्याच्या हालचाली केल्या.