शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

रयत कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:35 IST

ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपाध्यक्ष आप्पासाहेब गरुड, अथणी - रयतचे युनिट प्रमुख रवींद्र देशमुख, कोयना ...

ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपाध्यक्ष आप्पासाहेब गरुड, अथणी - रयतचे युनिट प्रमुख रवींद्र देशमुख, कोयना सहकारी दूध संघाचे अध्यक्ष वसंतराव जगदाळे, कराड तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष रंगराव थोरात, शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव देसाई, कोयना बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील, शामराव पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष ब. ल. पाटील, हणमंतराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

सभेत विषयपत्रिकेचे वाचन चीफ अकौंटंट शैलेश देशमुख यांनी केले. कारखान्याची गाळप क्षमता २५०० मेट्रिक टनावरून ६००० टन करणे यासह सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. कारखान्याचे संस्थापक दिवंगत विलासराव पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा कारखाना कार्यस्थळावर उभा करण्यात यावा, अशी आप्पासाहेब गरुड यांनी ऐनवेळच्या विषयात सूचना मांडली. त्यासही सभेने एकमताने संमती दिली.

सभेत बोलताना ॲड. उदयसिंह पाटील म्हणाले, रयत कारखाना उभारणी पाठीमागे संस्थापक विलासराव पाटील यांचा जो उद्देश होता, तो सफल होताना दिसत आहे. आज आपल्यात काका नाहीत, मात्र त्यांचे विचार जोपासण्याचे काम आम्ही करत आहोत. गेली ५० वर्षे विलासराव पाटील काकांनी सहकार, समाजकारण, राजकारणाला मार्गदर्शन केले. रयत कारखान्यासारख्या संस्था उभारल्या. याचबरोबर जिल्ह्यात जिल्हा बँकेच्या माध्यमातून काम करताना सेवा सोसायटी केंद्रबिंदू मानून शेतकरी बळकट करण्याचे काम केले.

रयत कारखाना अडचणीतून बाहेर पडला आहे. येणाऱ्या वर्षभरात रयत पूर्ण कर्जमुक्त होईल. अथणी व्यवस्थापनाच्या सहकार्याने गाळप क्षमता विस्तारीकरण, सहप्रकल्प उभारणी करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी कटिबद्ध राहील, अशी ग्वाहीही उदयसिंह पाटील यांनी शेवटी दिली.

रवींद्र देशमुख कारखान्याचा आढावा घेताना ते म्हणाले, चालू गळीत हंगामात कारखान्याने ४ लाख ५८ हजार टन गाळप केले आहे. १२.३३ टक्के इतका चांगला साखर उतारा राखत ५ लाख ६० हजार क्विंटल साखर निर्मिती केली आहे. गाळपास आलेल्या उसाचे फेब्रुवारीअखेरपर्यंत प्रति टन २९०० रुपयेप्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोच केले आहे. कराराप्रमाणे बँकांच्या ४७ कोटी देय रकमेपैकी सहा वर्षात ४५ कोटी परतफेड केली आहे. या वर्षात कारखान्याची गाळप क्षमता विस्तारीकरण करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

फोटी ओळी:-

रयत सहकारी साखर कारखान्याच्या २४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, व्यासपीठावर रवींद्र देशमुख, आप्पासाहेब गरुड, वसंतराव जगदाळे व मान्यवर.