शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
3
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
4
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
7
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
8
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
9
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
10
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
11
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
12
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
13
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
14
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
15
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
16
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
17
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
18
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
19
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
20
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...

रयत कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:35 IST

ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपाध्यक्ष आप्पासाहेब गरुड, अथणी - रयतचे युनिट प्रमुख रवींद्र देशमुख, कोयना ...

ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपाध्यक्ष आप्पासाहेब गरुड, अथणी - रयतचे युनिट प्रमुख रवींद्र देशमुख, कोयना सहकारी दूध संघाचे अध्यक्ष वसंतराव जगदाळे, कराड तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष रंगराव थोरात, शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव देसाई, कोयना बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील, शामराव पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष ब. ल. पाटील, हणमंतराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

सभेत विषयपत्रिकेचे वाचन चीफ अकौंटंट शैलेश देशमुख यांनी केले. कारखान्याची गाळप क्षमता २५०० मेट्रिक टनावरून ६००० टन करणे यासह सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. कारखान्याचे संस्थापक दिवंगत विलासराव पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा कारखाना कार्यस्थळावर उभा करण्यात यावा, अशी आप्पासाहेब गरुड यांनी ऐनवेळच्या विषयात सूचना मांडली. त्यासही सभेने एकमताने संमती दिली.

सभेत बोलताना ॲड. उदयसिंह पाटील म्हणाले, रयत कारखाना उभारणी पाठीमागे संस्थापक विलासराव पाटील यांचा जो उद्देश होता, तो सफल होताना दिसत आहे. आज आपल्यात काका नाहीत, मात्र त्यांचे विचार जोपासण्याचे काम आम्ही करत आहोत. गेली ५० वर्षे विलासराव पाटील काकांनी सहकार, समाजकारण, राजकारणाला मार्गदर्शन केले. रयत कारखान्यासारख्या संस्था उभारल्या. याचबरोबर जिल्ह्यात जिल्हा बँकेच्या माध्यमातून काम करताना सेवा सोसायटी केंद्रबिंदू मानून शेतकरी बळकट करण्याचे काम केले.

रयत कारखाना अडचणीतून बाहेर पडला आहे. येणाऱ्या वर्षभरात रयत पूर्ण कर्जमुक्त होईल. अथणी व्यवस्थापनाच्या सहकार्याने गाळप क्षमता विस्तारीकरण, सहप्रकल्प उभारणी करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी कटिबद्ध राहील, अशी ग्वाहीही उदयसिंह पाटील यांनी शेवटी दिली.

रवींद्र देशमुख कारखान्याचा आढावा घेताना ते म्हणाले, चालू गळीत हंगामात कारखान्याने ४ लाख ५८ हजार टन गाळप केले आहे. १२.३३ टक्के इतका चांगला साखर उतारा राखत ५ लाख ६० हजार क्विंटल साखर निर्मिती केली आहे. गाळपास आलेल्या उसाचे फेब्रुवारीअखेरपर्यंत प्रति टन २९०० रुपयेप्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोच केले आहे. कराराप्रमाणे बँकांच्या ४७ कोटी देय रकमेपैकी सहा वर्षात ४५ कोटी परतफेड केली आहे. या वर्षात कारखान्याची गाळप क्षमता विस्तारीकरण करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

फोटी ओळी:-

रयत सहकारी साखर कारखान्याच्या २४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, व्यासपीठावर रवींद्र देशमुख, आप्पासाहेब गरुड, वसंतराव जगदाळे व मान्यवर.