शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

रयत कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:35 IST

ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपाध्यक्ष आप्पासाहेब गरुड, अथणी - रयतचे युनिट प्रमुख रवींद्र देशमुख, कोयना ...

ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपाध्यक्ष आप्पासाहेब गरुड, अथणी - रयतचे युनिट प्रमुख रवींद्र देशमुख, कोयना सहकारी दूध संघाचे अध्यक्ष वसंतराव जगदाळे, कराड तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष रंगराव थोरात, शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव देसाई, कोयना बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील, शामराव पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष ब. ल. पाटील, हणमंतराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

सभेत विषयपत्रिकेचे वाचन चीफ अकौंटंट शैलेश देशमुख यांनी केले. कारखान्याची गाळप क्षमता २५०० मेट्रिक टनावरून ६००० टन करणे यासह सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. कारखान्याचे संस्थापक दिवंगत विलासराव पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा कारखाना कार्यस्थळावर उभा करण्यात यावा, अशी आप्पासाहेब गरुड यांनी ऐनवेळच्या विषयात सूचना मांडली. त्यासही सभेने एकमताने संमती दिली.

सभेत बोलताना ॲड. उदयसिंह पाटील म्हणाले, रयत कारखाना उभारणी पाठीमागे संस्थापक विलासराव पाटील यांचा जो उद्देश होता, तो सफल होताना दिसत आहे. आज आपल्यात काका नाहीत, मात्र त्यांचे विचार जोपासण्याचे काम आम्ही करत आहोत. गेली ५० वर्षे विलासराव पाटील काकांनी सहकार, समाजकारण, राजकारणाला मार्गदर्शन केले. रयत कारखान्यासारख्या संस्था उभारल्या. याचबरोबर जिल्ह्यात जिल्हा बँकेच्या माध्यमातून काम करताना सेवा सोसायटी केंद्रबिंदू मानून शेतकरी बळकट करण्याचे काम केले.

रयत कारखाना अडचणीतून बाहेर पडला आहे. येणाऱ्या वर्षभरात रयत पूर्ण कर्जमुक्त होईल. अथणी व्यवस्थापनाच्या सहकार्याने गाळप क्षमता विस्तारीकरण, सहप्रकल्प उभारणी करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी कटिबद्ध राहील, अशी ग्वाहीही उदयसिंह पाटील यांनी शेवटी दिली.

रवींद्र देशमुख कारखान्याचा आढावा घेताना ते म्हणाले, चालू गळीत हंगामात कारखान्याने ४ लाख ५८ हजार टन गाळप केले आहे. १२.३३ टक्के इतका चांगला साखर उतारा राखत ५ लाख ६० हजार क्विंटल साखर निर्मिती केली आहे. गाळपास आलेल्या उसाचे फेब्रुवारीअखेरपर्यंत प्रति टन २९०० रुपयेप्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोच केले आहे. कराराप्रमाणे बँकांच्या ४७ कोटी देय रकमेपैकी सहा वर्षात ४५ कोटी परतफेड केली आहे. या वर्षात कारखान्याची गाळप क्षमता विस्तारीकरण करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

फोटी ओळी:-

रयत सहकारी साखर कारखान्याच्या २४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, व्यासपीठावर रवींद्र देशमुख, आप्पासाहेब गरुड, वसंतराव जगदाळे व मान्यवर.