शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

रयत कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:35 IST

ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपाध्यक्ष आप्पासाहेब गरुड, अथणी - रयतचे युनिट प्रमुख रवींद्र देशमुख, कोयना ...

ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपाध्यक्ष आप्पासाहेब गरुड, अथणी - रयतचे युनिट प्रमुख रवींद्र देशमुख, कोयना सहकारी दूध संघाचे अध्यक्ष वसंतराव जगदाळे, कराड तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष रंगराव थोरात, शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव देसाई, कोयना बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील, शामराव पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष ब. ल. पाटील, हणमंतराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

सभेत विषयपत्रिकेचे वाचन चीफ अकौंटंट शैलेश देशमुख यांनी केले. कारखान्याची गाळप क्षमता २५०० मेट्रिक टनावरून ६००० टन करणे यासह सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. कारखान्याचे संस्थापक दिवंगत विलासराव पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा कारखाना कार्यस्थळावर उभा करण्यात यावा, अशी आप्पासाहेब गरुड यांनी ऐनवेळच्या विषयात सूचना मांडली. त्यासही सभेने एकमताने संमती दिली.

सभेत बोलताना ॲड. उदयसिंह पाटील म्हणाले, रयत कारखाना उभारणी पाठीमागे संस्थापक विलासराव पाटील यांचा जो उद्देश होता, तो सफल होताना दिसत आहे. आज आपल्यात काका नाहीत, मात्र त्यांचे विचार जोपासण्याचे काम आम्ही करत आहोत. गेली ५० वर्षे विलासराव पाटील काकांनी सहकार, समाजकारण, राजकारणाला मार्गदर्शन केले. रयत कारखान्यासारख्या संस्था उभारल्या. याचबरोबर जिल्ह्यात जिल्हा बँकेच्या माध्यमातून काम करताना सेवा सोसायटी केंद्रबिंदू मानून शेतकरी बळकट करण्याचे काम केले.

रयत कारखाना अडचणीतून बाहेर पडला आहे. येणाऱ्या वर्षभरात रयत पूर्ण कर्जमुक्त होईल. अथणी व्यवस्थापनाच्या सहकार्याने गाळप क्षमता विस्तारीकरण, सहप्रकल्प उभारणी करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी कटिबद्ध राहील, अशी ग्वाहीही उदयसिंह पाटील यांनी शेवटी दिली.

रवींद्र देशमुख कारखान्याचा आढावा घेताना ते म्हणाले, चालू गळीत हंगामात कारखान्याने ४ लाख ५८ हजार टन गाळप केले आहे. १२.३३ टक्के इतका चांगला साखर उतारा राखत ५ लाख ६० हजार क्विंटल साखर निर्मिती केली आहे. गाळपास आलेल्या उसाचे फेब्रुवारीअखेरपर्यंत प्रति टन २९०० रुपयेप्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोच केले आहे. कराराप्रमाणे बँकांच्या ४७ कोटी देय रकमेपैकी सहा वर्षात ४५ कोटी परतफेड केली आहे. या वर्षात कारखान्याची गाळप क्षमता विस्तारीकरण करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

फोटी ओळी:-

रयत सहकारी साखर कारखान्याच्या २४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, व्यासपीठावर रवींद्र देशमुख, आप्पासाहेब गरुड, वसंतराव जगदाळे व मान्यवर.