शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ४९० कोटींची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 23:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत २ लाख ५० हजार शेतकºयांना अंदाजे ४९० कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. दि. २ व ३ आॅक्टोबर रोजी १ हजार १९० गावांमध्ये कर्जमाफी याद्यांचेचावडी वाचन करण्यात आलेले आहे,’ अशी माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेतदिली.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत २ लाख ५० हजार शेतकºयांना अंदाजे ४९० कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. दि. २ व ३ आॅक्टोबर रोजी १ हजार १९० गावांमध्ये कर्जमाफी याद्यांचेचावडी वाचन करण्यात आलेले आहे,’ अशी माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेतदिली.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ शेतकरी कर्जमुक्ती प्रमाणपत्राचे वितरण बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजनभवनात पालकमंत्री शिवतारे यांच्या हस्ते जिल्ह्यातील २२ शेतकºयांना करण्यात आले. यानंतरआयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.याप्रसंगी सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलासशिंदे, निवासी उपजिल्हाधिकारीभारत वाघमारे, जिल्हा उपनिबंधक महेश कदम, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचेराजेंद्र सरकाळे आदी यावेळी उपस्थित होते.या कर्जमाफीमुळे शेतकºयांचे जीवनमान उंचविण्यास मदत होईल, असे सांगून पालकमंत्री शिवतारे म्हणाले, ‘राज्यभरातून ५६ लाख ५९ हजार शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले हाते. आॅनलाईन अर्ज भरल्यामुळे सर्वसामान्य शेतकºयालाही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. केंद्र व राज्य शासन शेतकºयांसाठी विविध योजना राबवत आहे.या योजनांमधून शेतºयांचे जीवनमान उंचविण्यास मदत होत आहे. शासनाने कर्जमाफी देण्यासाठी ३ वर्षे अभ्यास केला व योग्य वेळी कर्जमाफी दिली त्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांचे विशेष कौतुक करतो.आॅनलाईन अर्ज भरलेल्या शेतकºयांची यादी पोर्टलवरही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. शेतकºयांना सक्षम करण्यासाठी व त्यांना शाश्वत पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे.या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ सर्वसामान्य शेतकºयांना झाला आहे. तसेच दुष्काळी भागातही टँकरची संख्या कमी झालेली आहे. भविष्यकाळात या कर्जमाफीचे परिणाम दिसून येणार असून, शेततकºयांचे जीवनमान उंचविण्यास मदत होईल, असा विश्वासही पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.पालकमंत्र्यांकडून काढता पाय...!गेल्या चार महिन्यांपासून यवतेश्वर ते कास रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत आक्रमक झालेल्या पालकमंत्र्यांना यवतेश्वर-कास परिसरातील एकाही बांधकामावर कारवाई झाली नाही. कारवाई होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता पालकमंत्री विजय शिवतारे यांनी चक्क ‘मला कास अतिक्रमण प्रश्नावर बोलायचे नाही,’ असे म्हणत पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला.