शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

जिल्ह्यात ४९० कोटींची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 23:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत २ लाख ५० हजार शेतकºयांना अंदाजे ४९० कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. दि. २ व ३ आॅक्टोबर रोजी १ हजार १९० गावांमध्ये कर्जमाफी याद्यांचेचावडी वाचन करण्यात आलेले आहे,’ अशी माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेतदिली.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत २ लाख ५० हजार शेतकºयांना अंदाजे ४९० कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. दि. २ व ३ आॅक्टोबर रोजी १ हजार १९० गावांमध्ये कर्जमाफी याद्यांचेचावडी वाचन करण्यात आलेले आहे,’ अशी माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेतदिली.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ शेतकरी कर्जमुक्ती प्रमाणपत्राचे वितरण बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजनभवनात पालकमंत्री शिवतारे यांच्या हस्ते जिल्ह्यातील २२ शेतकºयांना करण्यात आले. यानंतरआयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.याप्रसंगी सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलासशिंदे, निवासी उपजिल्हाधिकारीभारत वाघमारे, जिल्हा उपनिबंधक महेश कदम, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचेराजेंद्र सरकाळे आदी यावेळी उपस्थित होते.या कर्जमाफीमुळे शेतकºयांचे जीवनमान उंचविण्यास मदत होईल, असे सांगून पालकमंत्री शिवतारे म्हणाले, ‘राज्यभरातून ५६ लाख ५९ हजार शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले हाते. आॅनलाईन अर्ज भरल्यामुळे सर्वसामान्य शेतकºयालाही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. केंद्र व राज्य शासन शेतकºयांसाठी विविध योजना राबवत आहे.या योजनांमधून शेतºयांचे जीवनमान उंचविण्यास मदत होत आहे. शासनाने कर्जमाफी देण्यासाठी ३ वर्षे अभ्यास केला व योग्य वेळी कर्जमाफी दिली त्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांचे विशेष कौतुक करतो.आॅनलाईन अर्ज भरलेल्या शेतकºयांची यादी पोर्टलवरही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. शेतकºयांना सक्षम करण्यासाठी व त्यांना शाश्वत पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे.या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ सर्वसामान्य शेतकºयांना झाला आहे. तसेच दुष्काळी भागातही टँकरची संख्या कमी झालेली आहे. भविष्यकाळात या कर्जमाफीचे परिणाम दिसून येणार असून, शेततकºयांचे जीवनमान उंचविण्यास मदत होईल, असा विश्वासही पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.पालकमंत्र्यांकडून काढता पाय...!गेल्या चार महिन्यांपासून यवतेश्वर ते कास रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत आक्रमक झालेल्या पालकमंत्र्यांना यवतेश्वर-कास परिसरातील एकाही बांधकामावर कारवाई झाली नाही. कारवाई होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता पालकमंत्री विजय शिवतारे यांनी चक्क ‘मला कास अतिक्रमण प्रश्नावर बोलायचे नाही,’ असे म्हणत पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला.