शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

कर्जमाफी नाही तर कर्जमुक्त झाला पाहिजे

By admin | Updated: March 9, 2017 23:12 IST

शंभूराज देसाई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडली परखड भूमिका

पाटण : ‘राज्यातील शेतकरी कर्जमाफीनाही तर कर्जमुक्त झाला पाहिजे, हे सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाजूचे आहे. योग्यवेळी हे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहे. विधिमंडळाचे सदस्य म्हणून तर विधानसभा सभागृहात आम्ही मुख्यमंत्री यांना शेतकऱ्यांना केवळ कर्जमाफी नाही तर कर्जमुक्तीच द्या, यासाठी आग्रही राहणार आहे,’ अशी परखड भूमिका शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई व्यक्त केली.राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, सर्वपक्षीय आमदारांची चर्चा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेनेच्या वतीने आमदार शंभूराज देसाई बोलत होते.आमदार देसाई म्हणाले, ‘शेतकरी कशावर अवलंबून आहे, हे पाहणे महत्त्वाचे आहे. याच शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत पाणी मिळाले पाहिजे, या शेतकऱ्यांना शाश्वत पाणी देण्यासाठी पूर्वीच्या पंधरा वर्षांच्या काळात शेतकऱ्यांच्या बांधावर शाश्वत पाणी आलं का? हे ही पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. या गोष्टी मागील सरकारने केल्या नाहीत आणि दुसऱ्या बाजूला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांनी स्वत: सांगितले होते की, ‘सत्तर हजार कोटींची जलसंपदा विभागाची गुंतवणूक होऊन १ टक्का क्षेत्रही ओलिताखाली आले नाही. सत्तर हजार कोटींची गुंतवणूक करूनदेखील या जुन्या सरकारने त्या शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये त्याच्या बांधापर्यंत जर पाणी नेलं नाही तर हे जुन्या सरकारचे नाही तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल. शेतकरी आत्महत्या करतो म्हणजे त्याने शेतामध्ये घेतलेली मेहनत व शेतीत केललं कष्ट याचा त्याला मोबदला, त्याच उत्पन्न मिळत नाही म्हणून त्यानं आत्महत्येचे धोरण स्वीकारले. शेतकरी कर्जमाफीबरोबर कर्जमुक्त झाला पाहिजे, हीच आमची भूमिका सुरुवातीपासून होती, आम्ही या भूमिकेशी आजही ठाम आहोत. आज एका रात्रीत कर्जमाफी करणे शक्य होणार नाही.’ (प्रतिनिधी)