शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

कर्जमाफी नाही तर कर्जमुक्त झाला पाहिजे

By admin | Updated: March 9, 2017 23:12 IST

शंभूराज देसाई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडली परखड भूमिका

पाटण : ‘राज्यातील शेतकरी कर्जमाफीनाही तर कर्जमुक्त झाला पाहिजे, हे सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाजूचे आहे. योग्यवेळी हे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहे. विधिमंडळाचे सदस्य म्हणून तर विधानसभा सभागृहात आम्ही मुख्यमंत्री यांना शेतकऱ्यांना केवळ कर्जमाफी नाही तर कर्जमुक्तीच द्या, यासाठी आग्रही राहणार आहे,’ अशी परखड भूमिका शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई व्यक्त केली.राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, सर्वपक्षीय आमदारांची चर्चा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेनेच्या वतीने आमदार शंभूराज देसाई बोलत होते.आमदार देसाई म्हणाले, ‘शेतकरी कशावर अवलंबून आहे, हे पाहणे महत्त्वाचे आहे. याच शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत पाणी मिळाले पाहिजे, या शेतकऱ्यांना शाश्वत पाणी देण्यासाठी पूर्वीच्या पंधरा वर्षांच्या काळात शेतकऱ्यांच्या बांधावर शाश्वत पाणी आलं का? हे ही पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. या गोष्टी मागील सरकारने केल्या नाहीत आणि दुसऱ्या बाजूला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांनी स्वत: सांगितले होते की, ‘सत्तर हजार कोटींची जलसंपदा विभागाची गुंतवणूक होऊन १ टक्का क्षेत्रही ओलिताखाली आले नाही. सत्तर हजार कोटींची गुंतवणूक करूनदेखील या जुन्या सरकारने त्या शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये त्याच्या बांधापर्यंत जर पाणी नेलं नाही तर हे जुन्या सरकारचे नाही तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल. शेतकरी आत्महत्या करतो म्हणजे त्याने शेतामध्ये घेतलेली मेहनत व शेतीत केललं कष्ट याचा त्याला मोबदला, त्याच उत्पन्न मिळत नाही म्हणून त्यानं आत्महत्येचे धोरण स्वीकारले. शेतकरी कर्जमाफीबरोबर कर्जमुक्त झाला पाहिजे, हीच आमची भूमिका सुरुवातीपासून होती, आम्ही या भूमिकेशी आजही ठाम आहोत. आज एका रात्रीत कर्जमाफी करणे शक्य होणार नाही.’ (प्रतिनिधी)