शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी नाही तर कर्जमुक्त झाला पाहिजे

By admin | Updated: March 9, 2017 23:12 IST

शंभूराज देसाई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडली परखड भूमिका

पाटण : ‘राज्यातील शेतकरी कर्जमाफीनाही तर कर्जमुक्त झाला पाहिजे, हे सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाजूचे आहे. योग्यवेळी हे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहे. विधिमंडळाचे सदस्य म्हणून तर विधानसभा सभागृहात आम्ही मुख्यमंत्री यांना शेतकऱ्यांना केवळ कर्जमाफी नाही तर कर्जमुक्तीच द्या, यासाठी आग्रही राहणार आहे,’ अशी परखड भूमिका शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई व्यक्त केली.राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, सर्वपक्षीय आमदारांची चर्चा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेनेच्या वतीने आमदार शंभूराज देसाई बोलत होते.आमदार देसाई म्हणाले, ‘शेतकरी कशावर अवलंबून आहे, हे पाहणे महत्त्वाचे आहे. याच शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत पाणी मिळाले पाहिजे, या शेतकऱ्यांना शाश्वत पाणी देण्यासाठी पूर्वीच्या पंधरा वर्षांच्या काळात शेतकऱ्यांच्या बांधावर शाश्वत पाणी आलं का? हे ही पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. या गोष्टी मागील सरकारने केल्या नाहीत आणि दुसऱ्या बाजूला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांनी स्वत: सांगितले होते की, ‘सत्तर हजार कोटींची जलसंपदा विभागाची गुंतवणूक होऊन १ टक्का क्षेत्रही ओलिताखाली आले नाही. सत्तर हजार कोटींची गुंतवणूक करूनदेखील या जुन्या सरकारने त्या शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये त्याच्या बांधापर्यंत जर पाणी नेलं नाही तर हे जुन्या सरकारचे नाही तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल. शेतकरी आत्महत्या करतो म्हणजे त्याने शेतामध्ये घेतलेली मेहनत व शेतीत केललं कष्ट याचा त्याला मोबदला, त्याच उत्पन्न मिळत नाही म्हणून त्यानं आत्महत्येचे धोरण स्वीकारले. शेतकरी कर्जमाफीबरोबर कर्जमुक्त झाला पाहिजे, हीच आमची भूमिका सुरुवातीपासून होती, आम्ही या भूमिकेशी आजही ठाम आहोत. आज एका रात्रीत कर्जमाफी करणे शक्य होणार नाही.’ (प्रतिनिधी)