शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

जिल्ह्यात दोघांच्या मृत्यूने धडधड वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:06 IST

सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधुन-मधून वाढत असल्याने नागरिकांच्या हृदयाची धडधड वाढू लागली आहे. बुधवारी माण आणि ...

सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधुन-मधून वाढत असल्याने नागरिकांच्या हृदयाची धडधड वाढू लागली आहे. बुधवारी माण आणि खटाव तालुक्यातील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. अचानक बळींची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, रात्री नवे ५६ रुग्ण आढळून आले असून, बाधितांची संख्या ५४ हजार ९९८ इतकी झाली आहे.

जिल्ह्यात गत महिनाभरापासून कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे. त्यामुळे सर्व व्यवहार आता पूर्वपदावर आले असतानाच, बुधवारी दोन बाधितांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सूर्याचीवाडी, (ता. खटाव) येथील ५७ वर्षीय महिला तसेच कासारवाडी, (ता. माण) येथील ७१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. बळींची संख्या आता १ हजार ७९७ वर पोहोचली आहे. गत काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्युसत्र आटोक्यात आले होते. परंतु अधुन-मधून एक-दोघांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून चिंता व्यक्त होऊ लागली आहे.

जिल्ह्यात कोरोनामुक्तीचेही प्रमाण वाढले असून, बुधवारी दिवसभरात ४३ जण, तर आतापर्यंत ५२ हजार ४५४ नागरिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. कोरोना संपला, अशा भाबड्या कल्पनेत न रमता नागरिकांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वारंवार वापर करणे गरजेचे आहे. अनेकजण विनामास्क फिरत असताना दिसून येत आहेत. अशा लोकांवर आता पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

चौकट :

तपासणीसाठी पुन्हा गर्दी..

गत आठ दिवसांपासून रुग्णालयात तपासणीसाठीही गर्दी वाढू लागली आहे. दोन दिवसांत तब्बल ११५२ जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामधून ५६ जण बाधित आढळून आले. काहीजण तपासणी करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. नागरिकांनी अंगावर आजार काढू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.