शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

सर्पदंशाच्या मृत्यूचे प्रमाण नगण्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:02 IST

सातारा : जिल्ह्यात महिन्यातून तीन ते चार सर्पदंशाच्या घटना घडत असतात. मात्र, यामध्ये मृत्यूचे प्रमाण अत्यंत कमी असून, गतवर्षी ...

सातारा : जिल्ह्यात महिन्यातून तीन ते चार सर्पदंशाच्या घटना घडत असतात. मात्र, यामध्ये मृत्यूचे प्रमाण अत्यंत कमी असून, गतवर्षी तीन तर यंदा दोघांचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. रुग्णावर तत्काळ उपचार केले जात असल्यामुळे सर्पदंश झालेल्या व्यक्तिचा जीव वाचत असल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यातील बामणोली, महाबळेश्वर, पाटण या परिसरामध्ये सर्वाधिक सर्पदंशाचे प्रकार घडत आहेत. सर्पदंश झाल्यानंतर तेथील नागरिक तत्काळ संबंधिताला रुग्णालयात दाखल करतात. सलग तीन ते चार दिवस उपचार केल्यानंतर रुग्ण बरे होत आहेत. वेळेत रुग्णालयात पोहोचले नाही तर सर्पदंश झालेला रुग्ण दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे घरगुती उपाय न करता रुग्णाला तत्काळ रुग्णालयात दाखल करणे गरजेचे असते. गत पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यात सर्पदंशाने मृत्यू जास्त होत होते. त्यावेळी ही संख्या बारावर होती. मात्र, हळूहळू लोक सतर्क झाल्याने तत्काळ रुग्णालयात येऊ लागले. त्यामुळे सर्पदंशाने मृत्यू होण्याचे प्रमाण घटले. काहीजण भीतीमुळेही उपचाराला प्रतिसाद देत नाहीत.

साप चावताच काय काळजी घ्यावी

साप चावल्याचे निदर्शनास येताच सर्वांत अगोदर अजिबात घाबरून जाऊ नये. वेळ न दवडता तत्काळ दवाखान्यात जावे. साप चावलेल्या वक्तीला इतरांनी धीर द्यावा. रुग्णालयाचे अंतर खूप दूर असेल तर प्रथमोपचार करावे. ज्या ठिकाणी सर्पदंश झाला असेल त्याच्या पाठीमागे काही अंतर रूमालाने बांधावे. जेणेकरून रक्तप्रवाह कमी होऊ शकतो. तसेच शक्य झाल्यास सर्पदंशाच्या ठिकाणी ब्लेडने थोडेसे कापावे जेणेकरून विष रक्ताद्वारे बाहेर पडेल.

जिल्ह्यात आढळणारे साप

जिल्ह्यात मण्यार, फुरसे, घोणस अशाप्रकारचे विषारी साप निघण्याचे प्रमाण जास्त आहे. तर त्यासोबत बिनविषारी असलेले सापदेखील निघण्याचे प्रमाण त्याच पटीत आहे. त्यात पाणघळ, धामण आदी विविध जातींचा समावेश आहे तसेच डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात नाग आढळतात. नागरी वस्तीवर साप आढळून येण्याचे प्रमाण उन्हाळ्यामध्ये सर्वाधिक आहे.

जिल्ह्यात लसींचा साठा किती उपलब्ध?

जिल्हा शासकीय रुग्णालयात ॲन्टी स्नेक व्हेनम नावाची लस आहे. ही लस सर्पदंश झालेल्या रुग्णाला दिली जाते. सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयातही ही लस उपलब्ध असते.