शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यू गाठतोय ‘खिंडी’त !

By admin | Updated: September 26, 2015 00:40 IST

सातारा : शिवराज तिकाटणं ठरतंय धोक्याचं; आठ वर्षात ३४ जणांचा बळी

सातारा: येथील शिवराज तिकाटण्यावर अपघाताची मालिका संपता संपेनाशी झाली आहे. या ठिकाणी ओव्हर ब्रीज नसल्यामुळे अनेकांना नाहक जीव गमवावा लागला असून गेल्या आठ वर्षात या ‘खिंडी’त तब्बल ३४ जणांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. या ठिकाणी होणारा प्रस्तावित ओव्हर ब्रीज होईपर्यंत आणखी कितीजणांचा बळी जाणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.महामार्ग प्राधिकरणाने ज्यावेळी हायवेचे काम हाती घेतले. त्यावेळी शिवराज पेट्रोलपंपाजवळ उड्डाण पूल उभारण्याची आवश्यकता होती. मात्र, तसे झाले नाही. सध्या महामार्गाचे सहा पदरीकरण सुरू आहे. शिवराज तिकाटण्यावर उड्डाणपूल उभारण्याचे महामार्ग प्राधिकरणाने नियोजन केले आहे. मात्र, तोपर्यंत हा चौक कितीजणांचा बळी घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मंगळवारी रात्री सातारा शहरातील जितेंद्र बहुलेकर या दुचाकीस्वाराला त्याच ठिकाणी ट्रकने उडविले. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. शिवराज तिकाटण्यावर सातत्याने अपघात होत असल्याने गेल्या आठ वर्षांत या ठिकाणी किती जणांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. याची माहिती घेतली असता धक्कादायक आकडेवारी समोर आली.गेल्या आठ वर्षांत या तिकाटण्यावर तब्बल ३४ जणांचा मृत्यू झाल्याचे पोलीस डायरीत नोंद आहे. इतकी भयानक परिस्थिती असताना यावर कोणीच काही बोलत नाही. त्या ठिकाणी तात्पुरत्या उपाययोजनाही करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पादचारी, दुचाकीस्वारांना नाहक जीव गमवावा लागत आहे.शिवराज तिकाटण्यावर आत्तापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. हे ठिकाण अपघात प्रवणक्षेत्र म्हणून ओळखत असताना महामार्ग प्राधिकरणाने कसलेही सूचना फलक लावले नाहीत. त्यामुळे वाहन चालकांची अनेकदा फसगत होत आहे. खिंडवाडीहून साताऱ्यात येत असताना उतार आहे. त्यामुळे वाहने वेगात येत असतात. याचवेळी एखादा पादचारी किंवा दुचाकीस्वार महामार्ग ओलांडत असेल तर त्याचा जीव कासावीस होतो. (प्रतिनिधी)‘त्या’ कुटुंबाला अजूनही धास्ती !दोन वर्षांपूर्वी सत्त्वशीलनगर परिसरात राहणाऱ्या माणिक शिंदे कुटुंबीयाचा एकुलता एक मुलगा याच शिवराज तिकाटण्यावर ठार झाला. त्यानंतर काही महिन्यातच त्याच ठिकाणी त्याच्या मावशीचाही असाच दुर्देवी अंत झाला. सध्या या ठिकाणाहून जाताना शिंदे कुटुंबीय नेहमी धास्तावलेले असते. घरातील दोन व्यक्तींचा त्या ठिकाणी मृत्यू झाल्याने महामार्ग ओलांडून न जाता देगाव फाट्यावरून भुयारी पुलाखालून घरी जाण्याचा शक्यतो शिंदे कुटुंबीय प्रयत्न करत असते. इतकी दहशत त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे.