शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

नायगावात मतदानासाठी आलेल्या वृद्धेचा मृत्यू

By admin | Updated: February 21, 2017 23:34 IST

खंडाळा तालुक्यात ७५.३८ टक्के मतदान : गट, गणाच्या ५१ उमेदवारांच्या भवितव्याचा उद्या फैसला

खंडाळा/ शिरवळ : खंडाळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता काही ठिकाणी किरकोळ वादावादी वगळता शांततेने चुरशीने ७५.३८ टक्के मतदान झाले. यावेळी नायगाव गणामध्ये मतदानाकरिता आलेल्या ८३ वर्षीय वृद्धेला अस्वस्थ वाटू लागल्याने तिचा खासगी रुग्णालयात उपचारापूर्वी मृत्यू झाला. दरम्यान, तीन जिल्हा परिषद व सहा पंचायत समितीच्या गणांसाठी ५१ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंद झाले.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या खंडाळा तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गटांसाठी व पंचायत समितीच्या सहा गणांसाठी मंगळवारी मतदान झाले. यामध्ये जिल्हा परिषदेच्या शिरवळ, खेड बुद्रुक, भादे तर पंचायत समितीच्या शिरवळ, पळशी, भादे , बावडा, नायगाव, खेड गणांसाठी मतदारांनी चुरशीने मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. नायगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रावर मतदानाकरिता आलेल्या ठकुबाई एकनाथ नेवसे (वय ८३, रा. नायगाव, ता. खंडाळा) यांना मतदान केंद्रामध्ये अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने नायगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यामुळे नायगाव येथील केंद्रावर काहीकाळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.एकूणच, खंडाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिरवळ गटासाठी ७८.४५ टक्के मतदारांनी , भादे गटासाठी ७४.८६ टक्के मतदारांनी, खेड बुद्रुक गटासाठी ७३.४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.खंडाळा तालुक्यातील ८७ हजार ३२० मतदारांपैकी ६५,८२४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, यामध्ये ३४,७७० पुरुष तर ३१,०५४ महिला मतदारांचा समावेश आहे. दुपारी दोननंतर शिरवळ, भादे, अहिरे, बावडा, विंग, पिंपरे, मिरजे-मिरजेवाडी, नायगाव, धनगरवाडी, लोणी, कन्हेरी तसेच ग्रामीण भागामधील मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. गुरुवार, दि. २३ रोजी सकाळी १० वाजता खंडाळा पंचायत समितीच्या सभागृहात होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीमध्ये मिरजे ता.खंडाळा येथील मतदान केंद्रामधील यंञात तांञिक अडचणी निर्माण झाल्याने काही काळ मतदानप्रक्रियेमध्ये व्यत्यय आला होता. यावेळी मतदान अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलल्याने मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. संपूर्ण तालुक्याचे लक्ष निकालाकडे लागले आहे. (प्रतिनिधी)