शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
3
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
4
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या 'फतेह-२'चे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
5
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
6
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
7
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
8
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
9
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
10
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
11
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
12
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
13
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
14
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
15
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
16
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
17
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
18
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
19
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
20
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...

वाईच्या बाजारात मरणाची गर्दी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:41 IST

वाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाई तालुक्यात प्रशासनाने सकाळी सात ते अकरा ही भाजीपाला व इतर घरगुती वस्तू खरेदीसाठीची वेळ ...

वाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाई तालुक्यात प्रशासनाने सकाळी सात ते अकरा ही भाजीपाला व इतर घरगुती वस्तू खरेदीसाठीची वेळ ठरवून दिलेली आहे, गर्दी होऊ नये म्हणून पालिकेने मुख्य भाजी मंडई बंद करून प्रत्येक प्रभागात भाजी विक्रीस परवानगी दिली आहे. या वेळेत शहरातील व ग्रामीण भागातील लोक जीवनावश्यक वस्तू, भाजी व इतर गोष्टी खरेदी करण्यासाठी रस्त्यावर गर्दी करतानाचे चित्र वाई शहरासह ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.

लोक कोरोना आजाराचे गांभीर्य विसरल्यासारखे रस्त्यावर येतायत, खरेदीसाठी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी धावताना दिसत आहेत. पोलीस प्रशासनाने याचे गांभीर्य ओळखून वेळ वाढवावी, अन्यथा घरपोच सेवा द्यावी. वेळ कमी असल्याने लोक रस्त्यावर उतरून कोरोनाला निमंत्रण देत आहेत. प्रशासनाला कोरोना साखळी तोडायची आहे, की तशीच कायम चालू ठेवायची आहे, हे सर्वसामान्य लोकांच्या लक्षात न येणारी गोष्ट आहे, अकरानंतर रस्त्यावर प्रचंड शांतता असते; परंतु आधी दोन तास झालेली गर्दी कोरोनाला टाळू शकत नाही, कोरोना वेळ सांगून समाजात फिरत नाही, हे प्रशासनाने लक्षात घेण्याची बाब आहे. नियम तयार करताना कोणते निकष वापरण्यात येतात, हे समजण्यापलीकडचे आहे. सकाळी नेहमीप्रमाणे नागरिकांनी गर्दी केल्यास प्रशासनाने व पोलिसांनी त्यांना तत्काळ अटकाव करून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देत बाजार बंद करायला हवा, बँका, मेडिकल्स, किराणा मालाची दुकाने, पेट्रोल पंप, दुकानांमधून गर्दी सुरू आहे.

चौकट..

अनेक बँकांमध्ये गर्दी...

बँका सुरू असल्या तरी व्यवहारांच्या नावाखाली बँकांना गर्दीवर अंकुश ठेवता आला नाही. सरकारी बँकेत गर्दी होत आहे. परंतु खासगी बँकांची वेळ कमी केली आहे. बाजार समितीमध्ये शेतकरी माल घेऊन आल्याने गर्दी पाहायला मिळाली. नागरिकांनी भाजी खरेदीच्या बहाण्याने झुंबड उठविली होती. प्रशासनाकडून कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी ठोस पावले उचलताना दिसत नाही.

चौकट..

मुंबई-पुण्याहून आलेल्यांची यादी करणे गरजेचे..

कोरोनाने मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याने प्रशासन गोंधळून गेले आहे. ग्रामीण भागातील नागरिक उन्हाळ्याची सुटी लागल्यासारखे वावरताना दिसत आहेत. पोलीस पाटलाने मुंबई-पुण्याहून आलेल्यांची फक्त यादी तयार करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात लोकांना हटकल्यास वाद होताना दिसत आहेत. शहरातून येणाऱ्या लोकांवर कसलेही बंधन नाही आणि तेच कोरोना वाढीस निमंत्रण देत आहे. कोरोना साखळी तोडायची झाल्यास नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.