शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

वीज तारेच्या स्पर्शाने दाम्पत्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 23:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्कफलटण : जनावरांना चारा आणण्यासाठी जाताना तुटलेल्या विद्युत तारेच्या स्पर्शाने वाजेगाव-निंबळक येथील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी घडली. दीपक रतनसिंह मतकर (वय ३५) व योगिता दीपक मतकर (३०) अशी मृतांची नावे आहेत. विशेष म्हणजे तुटलेल्या तारेची पूर्वकल्पना वायरमनला देऊनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रसंग ओढावला. ...

लोकमत न्यूज नेटवर्कफलटण : जनावरांना चारा आणण्यासाठी जाताना तुटलेल्या विद्युत तारेच्या स्पर्शाने वाजेगाव-निंबळक येथील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी घडली. दीपक रतनसिंह मतकर (वय ३५) व योगिता दीपक मतकर (३०) अशी मृतांची नावे आहेत. विशेष म्हणजे तुटलेल्या तारेची पूर्वकल्पना वायरमनला देऊनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रसंग ओढावला. यामुळे वीज वितरण अधिकारी व कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.याबाबत माहिती अशी की, फलटण तालुक्यातील वाजेगाव-निंबळक हद्दीतील मतकर मळा येथील शेतात विजेची तार खाली पडली होती. याबाबत सकाळी सहा वाजताच संबंधित वायरमनला माहिती दिली होती. मात्र, नेहमीप्रमाणे वीज वितरणचे अधिकारी व कर्मचाºयांनी याकडे दुर्लक्ष केले. जनावरांना चारा आणण्यासाठी दीपक मतकर हे पत्नी योगितासोबत सकाळी आठच्या सुमारास चालले असताना खाली पडलेल्या विजेच्या तारेचा अंदाज आला नाही. त्यांचा स्पर्श तारेला झाल्याने दोघांनाही जबर धक्का बसला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.त्याचवेळी दीपक यांचे चुलते वैरण घेऊन येत होते. त्यांनाही सौम्य धक्का बसला व दीपक व योगिता निपचित पडल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरड केल्यावर वस्तीवरील सर्वजण पळत आले. काहींनी ट्रान्सफार्मरवरील फ्यूज काढून वीजपुरवठा खंडित केला. दीपक व योगिता यांना हलवून पाहिले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे समजले.दीपक मतकर यांच्या पश्चात मुलगी, मुलगा असून मुलगी दहावीत, तर मुलगा सातवीत शिकत आहेत. त्यांना एक एकर शेती असून, या घटनेने दोन्ही मुले पोरकी झाली आहेत.‘महावितरण’विरोधात संतापघटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी आले. तहसीलदार विजय पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी महावितरणचे संबंधित अधिकारी व कर्मचाºयांवर कडक कारवाई करावी, गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली.यावेळी तहसीलदार पाटील यांनी ग्रामस्थांची समजूत घालून वीज वितरण व शासन स्तरावरून मदत देण्याची ग्वाही दिली. दरम्यान, घटनेनंतरही महावितरणचा कोणताही अधिकारी व कर्मचारी फिरकला नाही. यामुळे संताप व्यक्त होत आहे.