शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
5
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
6
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
7
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
8
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
9
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
10
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
11
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
12
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
13
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
14
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
15
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
16
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
17
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
18
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
19
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
20
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड

वीज तारेच्या स्पर्शाने दाम्पत्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 23:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्कफलटण : जनावरांना चारा आणण्यासाठी जाताना तुटलेल्या विद्युत तारेच्या स्पर्शाने वाजेगाव-निंबळक येथील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी घडली. दीपक रतनसिंह मतकर (वय ३५) व योगिता दीपक मतकर (३०) अशी मृतांची नावे आहेत. विशेष म्हणजे तुटलेल्या तारेची पूर्वकल्पना वायरमनला देऊनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रसंग ओढावला. ...

लोकमत न्यूज नेटवर्कफलटण : जनावरांना चारा आणण्यासाठी जाताना तुटलेल्या विद्युत तारेच्या स्पर्शाने वाजेगाव-निंबळक येथील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी घडली. दीपक रतनसिंह मतकर (वय ३५) व योगिता दीपक मतकर (३०) अशी मृतांची नावे आहेत. विशेष म्हणजे तुटलेल्या तारेची पूर्वकल्पना वायरमनला देऊनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रसंग ओढावला. यामुळे वीज वितरण अधिकारी व कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.याबाबत माहिती अशी की, फलटण तालुक्यातील वाजेगाव-निंबळक हद्दीतील मतकर मळा येथील शेतात विजेची तार खाली पडली होती. याबाबत सकाळी सहा वाजताच संबंधित वायरमनला माहिती दिली होती. मात्र, नेहमीप्रमाणे वीज वितरणचे अधिकारी व कर्मचाºयांनी याकडे दुर्लक्ष केले. जनावरांना चारा आणण्यासाठी दीपक मतकर हे पत्नी योगितासोबत सकाळी आठच्या सुमारास चालले असताना खाली पडलेल्या विजेच्या तारेचा अंदाज आला नाही. त्यांचा स्पर्श तारेला झाल्याने दोघांनाही जबर धक्का बसला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.त्याचवेळी दीपक यांचे चुलते वैरण घेऊन येत होते. त्यांनाही सौम्य धक्का बसला व दीपक व योगिता निपचित पडल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरड केल्यावर वस्तीवरील सर्वजण पळत आले. काहींनी ट्रान्सफार्मरवरील फ्यूज काढून वीजपुरवठा खंडित केला. दीपक व योगिता यांना हलवून पाहिले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे समजले.दीपक मतकर यांच्या पश्चात मुलगी, मुलगा असून मुलगी दहावीत, तर मुलगा सातवीत शिकत आहेत. त्यांना एक एकर शेती असून, या घटनेने दोन्ही मुले पोरकी झाली आहेत.‘महावितरण’विरोधात संतापघटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी आले. तहसीलदार विजय पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी महावितरणचे संबंधित अधिकारी व कर्मचाºयांवर कडक कारवाई करावी, गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली.यावेळी तहसीलदार पाटील यांनी ग्रामस्थांची समजूत घालून वीज वितरण व शासन स्तरावरून मदत देण्याची ग्वाही दिली. दरम्यान, घटनेनंतरही महावितरणचा कोणताही अधिकारी व कर्मचारी फिरकला नाही. यामुळे संताप व्यक्त होत आहे.