शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

प्रीतिसंगमावर रंगला दिवसभर राजकीय आखाडा ! घडतंय-बिघडतंय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:18 IST

होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी कºहाडला प्रीतिसंगमावर जणू राजकीय आखाडाच रंगला होता. सातारा, सांगली अन् माढा या तिन्ही मतदार संघांतील राजकीय घडामोडीचे केंद्र कºहाड ठरले होते.साताऱ्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार

ठळक मुद्देघडतंय-बिघडतंय

प्रमोद सुकरे ।कºहाड : होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी कºहाडला प्रीतिसंगमावर जणू राजकीय आखाडाच रंगला होता. सातारा, सांगली अन् माढा या तिन्ही मतदार संघांतील राजकीय घडामोडीचे केंद्र कºहाड ठरले होते.साताऱ्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी कºहाडात बराच वेळ दिला.सकाळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. दुपारी काँग्रेसमधील नाराजांची पृथ्वीबाबांच्या बंगल्यावर मनधरणी केली. नंतर पत्रकारांशी वार्तालाप केला. ते उरकून साताऱ्याला गेले. सायंकाळी पुन्हा सात वाजता कºहाडात येऊन त्यांनी नगरसेवकांची बैठक घेतली.

गत निवडणुकीत कºहाड व मलकापूर शहरात उदयनराजे भोसले सुमारे तीन हजार मतांनी पिछाडीवर होते. पुरुषोत्तम जाधवांच्या किटलीतील चहाचा त्यांना चांगलाच चटका बसला होता. त्यामुळे त्यांनी याठिकाणी चांगलेच लक्ष केंद्रित केले आहे.दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कºहाडात तळ ठोकला असून, पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदार संघातील घडामोडींवर त्यांनी लक्ष ठेवून महागठबंधन बळकट करण्याचे प्रयत्न आहेत.आता जिल्हाध्यक्ष कोण!आमदार आनंदराव पाटील यांना जिल्हाध्यक्षपदावरून हटविण्यासाठी अनेकांनी बºयाच कूरघोड्या केल्या. त्यानंतर पाटलांनी राजीनामा दिल्यावर फलटणच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकरांची येथे वर्णी लागली. मात्र त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त पसरल्यानंतर रिक्त जागेवर आता नवा जिल्हाध्यक्ष कोण? अशी चर्चा दिवसभर काँग्रेस कार्यकर्त्यांच्यात सुरू होती.म्हणे दोन महिन्यांचा पाहुणा...रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दोन महिन्यांपूर्वी जिल्हाध्यक्षपदाचा पद्भार जंगी कार्यक्रम घेऊन स्वीकारला होता. त्यानंतर अनेक ठिकाणी भाषणे करताना त्यांनी राष्ट्रवादीला टार्गेट केले होते. कºहाडच्या काँग्रेस मेळाव्यातही त्यांनी आपला बाणा दाखविला; पण त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर नवा अध्यक्ष दोन महिन्यांचा पाहुणाच ठरल्याची चर्चासुरू झाली.पृथ्वीबाबा-जयकुमारंची कमराबंद चर्चा!सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार जयकुमार गारे यांचे मित्र रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या राजीनाम्याची व भाजप प्रदेशाबाबतची पोस्ट सोशल मीडियावर फिरत होती. याबाबत पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रतिनिधींनी पृथ्वीबाबांना छेडले. मात्र त्यांनी त्यावर न बोलणे पसंत केले. त्यानंतर एका हॉटेलात पृथ्वीबाबा व जयकुमार गोरे यांची सुमारे एक तास कमराबंद चर्चा झाली. बैठक झाल्यावर पृथ्वीबाबा निघून गेले; पण जयभाऊंनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.मोहनशेठ, विश्वजित पृथ्वीबाबांच्या भेटीलासांगली मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवारीचा प्रश्न अद्याप मिटलेला नाही. याबाबत पृथ्वीबाबांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी छेडले असता, तो तिढा लवकरच मिटेल, असे सांगितले. मात्र त्यासाठीच आमदार मोहनराव कदम व आमदार विश्वजित कदम हे दोघेही कºहाडला पृथ्वीबाबांना खास भेटायला आले होते; पण बैठकीचा तपशील समजला नाही. दरम्यान, रात्री उशिरा विरोधी गटातील काँग्रेस नेत्यांची बैठक कºहाडला पृथ्वीबाबांच्या बंगल्यावर होणार होती.