शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

कन्यादानापूर्वीच पित्याचा जीपच्या धडकेत मृत्यू !

By admin | Updated: April 10, 2016 00:10 IST

दोन्ही नियोजित वधू जखमी

वाठार स्टेशन : विवाहासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करून दुचाकीवरून ट्रीपलसीट घरी परतत असताना झालेल्या अपघातात वधूपिता जागीच ठार झाला, तर पाठीमागे बसलेल्या दोन्ही नियोजित वधू जखमी झाल्या. दिलीप धोंडिराम भोईटे (वय ५९, रा. वाघोली, ता. कोरेगाव) असे मृत पित्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिलीप भोईटे यांच्या दोन मुलींचा विवाह येत्या २९ एप्रिलला एकाच मंडपात होणार आहे. त्याची तयारी सध्या सुरू आहे. लग्नासाठी लागणारे कपडे व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी भोईटे शुक्रवारी त्यांच्या दोन्ही मुली शुभांगी आणि रेश्मा यांना घेऊन दुचाकीवरून (एमएच ११ डी ३६०५) साताऱ्याला गेले होते. खरेदी केल्यानंतर ते ट्रीपलसीट वाघोलीकडे यायला निघाले. पाटखळ माथ्यानजीक असलेल्या एका हॉटेलसमोर ते आले असता ट्रकला ओव्हरटेक करणाऱ्या भरधाव जीपने (एमएच १२ पीए २२९०) त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दिलीप भोईटे दूरवर फेकले गेले. त्यानंतर त्यांच्या अंगावरून जीपचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेल्या त्यांच्या दोन्ही मुलींच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांनाही तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुन्हा शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केले गेले. भोईटे यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. शेतात काबाडकष्ट करून त्यांनी दोन मुली व दोन मुले यांचे शिक्षण पूर्ण केले. दोन्ही मुलींचे एकाच मंडपात लग्न होणार असल्याने घरातील वातावरण आनंदी होते. मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने या कुटुंबाचा आधारच हरपला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. भोईटे यांचा मृतदेह शनिवारी सकाळी सात वाजता घरी आणल्यानंतर पत्नी व मुलांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. ग्रामस्थ व नातेवाइकांच्या उपस्थितीत सकाळी दहाच्या सुमारास त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत. (वार्ताहर) त्या दोघी मुली जखमी; वडिलांच्या मृत्यूबाबत अनभिज्ञ ! अपघातात शुभांगी आणि रेश्मा या दोघींचाही पाय फ्रॅक्चर झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, वडिलांचा जागीच मृत्यू झाल्याचे त्यांना अद्याप सांगण्यात आले नाही. नातेवाईक त्यांच्या चौकशीसाठी जवळ आल्यानंतर ‘बाबा कसे आहेत?,’ अशी विचारपूस त्या दोघी करत आहेत.