शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

गव्यांचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:30 IST

पेट्री : कास पठार ते महाबळेश्वर या राज्यमार्गावर गव्यांचे दर्शन वारंवार होत आहे. संचारबंदी असल्याने गेल्या काही दिवसांत सातारकरांची ...

पेट्री : कास पठार ते महाबळेश्वर या राज्यमार्गावर गव्यांचे दर्शन वारंवार होत आहे. संचारबंदी असल्याने गेल्या काही दिवसांत सातारकरांची पावले या रस्त्याकडे वळल्याने वर्दळ वाढली आहे. काही वेळा दुचाकीचालक आणि गव्यांचा कळप आमने-सामने येत असून, गव्यांच्या संवर्धनासाठी या भागात तातडीने उपाय योजण्याची गरज आहे.

जैवसाखळी धोक्यात

सातारा : डोंगराळ भागात वणवे लावण्याचे प्रमाण वाढत असून, लहान-मोठे जीव आगीत होरपळून मृत्यू पावत असल्याने जैवसाखळी धोक्यात आली आहे. निसर्गातील मानवी हस्तक्षेप न रोखल्यास मानव-वन्यजीव संघर्ष होऊ शकत असल्याने वन विभागाने काळजी घ्यावी, अशी मागणी निसर्गप्रेमींमधून होत आहे.

असुरक्षित जलक्रीडा

सातारा : शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी विहिरी, तळी, कालव्यांमध्ये पोहण्यास जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बरेचजण केवळ उकाडा असह्य झाला म्हणून, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरताना दिसत आहेत. विशेषत: कालव्यांच्या पाण्याला ओढ असल्याने व्यक्ती बुडण्याच्या घटना घडत आहेत.

पाण्याच्या वेळा बदला

सातारा : येथील काही पेठांमध्ये रात्री, तर काही पेठांमध्ये पहाटे लवकर पाणी येते. पाण्याचा वापर कमीत कमी व्हावा, या हेतूने या वेळा ठेवण्यात आल्या असल्या तरी, पाणीपट्टी मोजून भरणाऱ्यांना वेळेत पाणी मिळावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

मद्यपींना रोखा

सातारा : कास हे नैसर्गिक जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेले स्थळ असून, केवळ हंगामात पैसे गोळा न करता वन खात्याच्यावतीने वर्षभर त्याची देखभाल केली जावी, तेथे बाटल्या आणून दारू पिणाऱ्यांना अटकाव केला जावा, अशी मागणी निसर्गप्रेमींमधून होत आहे.

गुरांची संख्या रोडावली

बामणोली : पशुपालन हा एकेकाळी प्रमुख व्यवसाय असणाऱ्या कास-बामणोली भागातील गुरांची संख्या वेगाने रोडावत चालली असून, तेथील तरुण शहरांत कामानिमित्त धाव घेत आहे. डेअऱ्या बंद पडणे आणि चराऊ कुरणांमध्ये घट, ही यामागील कारणे असल्याचे पशुपालक सांगतात.

शीतपेयांना मागणी

सातारा : तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे शहरात शीतपेयांना मागणी वाढत चालली आहे. शहरात अनेक ठिकाणी आईस्क्रिमच्या दुकानात गर्दी दिसून येत आहे. बाजारपेठेत शीतलता देणाऱ्या कलिंगडांची आवकही वाढत चालली आहे. संचारबंदीच्या मर्यादेमुळे सकाळीच दुकानातून शीतपेये आणून दुपारी सहकुटुंब याचा आस्वाद घेतला जात आहे.