शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

गव्यांचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:30 IST

पेट्री : कास पठार ते महाबळेश्वर या राज्यमार्गावर गव्यांचे दर्शन वारंवार होत आहे. संचारबंदी असल्याने गेल्या काही दिवसांत सातारकरांची ...

पेट्री : कास पठार ते महाबळेश्वर या राज्यमार्गावर गव्यांचे दर्शन वारंवार होत आहे. संचारबंदी असल्याने गेल्या काही दिवसांत सातारकरांची पावले या रस्त्याकडे वळल्याने वर्दळ वाढली आहे. काही वेळा दुचाकीचालक आणि गव्यांचा कळप आमने-सामने येत असून, गव्यांच्या संवर्धनासाठी या भागात तातडीने उपाय योजण्याची गरज आहे.

जैवसाखळी धोक्यात

सातारा : डोंगराळ भागात वणवे लावण्याचे प्रमाण वाढत असून, लहान-मोठे जीव आगीत होरपळून मृत्यू पावत असल्याने जैवसाखळी धोक्यात आली आहे. निसर्गातील मानवी हस्तक्षेप न रोखल्यास मानव-वन्यजीव संघर्ष होऊ शकत असल्याने वन विभागाने काळजी घ्यावी, अशी मागणी निसर्गप्रेमींमधून होत आहे.

असुरक्षित जलक्रीडा

सातारा : शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी विहिरी, तळी, कालव्यांमध्ये पोहण्यास जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बरेचजण केवळ उकाडा असह्य झाला म्हणून, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरताना दिसत आहेत. विशेषत: कालव्यांच्या पाण्याला ओढ असल्याने व्यक्ती बुडण्याच्या घटना घडत आहेत.

पाण्याच्या वेळा बदला

सातारा : येथील काही पेठांमध्ये रात्री, तर काही पेठांमध्ये पहाटे लवकर पाणी येते. पाण्याचा वापर कमीत कमी व्हावा, या हेतूने या वेळा ठेवण्यात आल्या असल्या तरी, पाणीपट्टी मोजून भरणाऱ्यांना वेळेत पाणी मिळावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

मद्यपींना रोखा

सातारा : कास हे नैसर्गिक जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेले स्थळ असून, केवळ हंगामात पैसे गोळा न करता वन खात्याच्यावतीने वर्षभर त्याची देखभाल केली जावी, तेथे बाटल्या आणून दारू पिणाऱ्यांना अटकाव केला जावा, अशी मागणी निसर्गप्रेमींमधून होत आहे.

गुरांची संख्या रोडावली

बामणोली : पशुपालन हा एकेकाळी प्रमुख व्यवसाय असणाऱ्या कास-बामणोली भागातील गुरांची संख्या वेगाने रोडावत चालली असून, तेथील तरुण शहरांत कामानिमित्त धाव घेत आहे. डेअऱ्या बंद पडणे आणि चराऊ कुरणांमध्ये घट, ही यामागील कारणे असल्याचे पशुपालक सांगतात.

शीतपेयांना मागणी

सातारा : तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे शहरात शीतपेयांना मागणी वाढत चालली आहे. शहरात अनेक ठिकाणी आईस्क्रिमच्या दुकानात गर्दी दिसून येत आहे. बाजारपेठेत शीतलता देणाऱ्या कलिंगडांची आवकही वाढत चालली आहे. संचारबंदीच्या मर्यादेमुळे सकाळीच दुकानातून शीतपेये आणून दुपारी सहकुटुंब याचा आस्वाद घेतला जात आहे.