शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

गव्यांचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:30 IST

पेट्री : कास पठार ते महाबळेश्वर या राज्यमार्गावर गव्यांचे दर्शन वारंवार होत आहे. संचारबंदी असल्याने गेल्या काही दिवसांत सातारकरांची ...

पेट्री : कास पठार ते महाबळेश्वर या राज्यमार्गावर गव्यांचे दर्शन वारंवार होत आहे. संचारबंदी असल्याने गेल्या काही दिवसांत सातारकरांची पावले या रस्त्याकडे वळल्याने वर्दळ वाढली आहे. काही वेळा दुचाकीचालक आणि गव्यांचा कळप आमने-सामने येत असून, गव्यांच्या संवर्धनासाठी या भागात तातडीने उपाय योजण्याची गरज आहे.

जैवसाखळी धोक्यात

सातारा : डोंगराळ भागात वणवे लावण्याचे प्रमाण वाढत असून, लहान-मोठे जीव आगीत होरपळून मृत्यू पावत असल्याने जैवसाखळी धोक्यात आली आहे. निसर्गातील मानवी हस्तक्षेप न रोखल्यास मानव-वन्यजीव संघर्ष होऊ शकत असल्याने वन विभागाने काळजी घ्यावी, अशी मागणी निसर्गप्रेमींमधून होत आहे.

असुरक्षित जलक्रीडा

सातारा : शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी विहिरी, तळी, कालव्यांमध्ये पोहण्यास जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बरेचजण केवळ उकाडा असह्य झाला म्हणून, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरताना दिसत आहेत. विशेषत: कालव्यांच्या पाण्याला ओढ असल्याने व्यक्ती बुडण्याच्या घटना घडत आहेत.

पाण्याच्या वेळा बदला

सातारा : येथील काही पेठांमध्ये रात्री, तर काही पेठांमध्ये पहाटे लवकर पाणी येते. पाण्याचा वापर कमीत कमी व्हावा, या हेतूने या वेळा ठेवण्यात आल्या असल्या तरी, पाणीपट्टी मोजून भरणाऱ्यांना वेळेत पाणी मिळावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

मद्यपींना रोखा

सातारा : कास हे नैसर्गिक जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेले स्थळ असून, केवळ हंगामात पैसे गोळा न करता वन खात्याच्यावतीने वर्षभर त्याची देखभाल केली जावी, तेथे बाटल्या आणून दारू पिणाऱ्यांना अटकाव केला जावा, अशी मागणी निसर्गप्रेमींमधून होत आहे.

गुरांची संख्या रोडावली

बामणोली : पशुपालन हा एकेकाळी प्रमुख व्यवसाय असणाऱ्या कास-बामणोली भागातील गुरांची संख्या वेगाने रोडावत चालली असून, तेथील तरुण शहरांत कामानिमित्त धाव घेत आहे. डेअऱ्या बंद पडणे आणि चराऊ कुरणांमध्ये घट, ही यामागील कारणे असल्याचे पशुपालक सांगतात.

शीतपेयांना मागणी

सातारा : तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे शहरात शीतपेयांना मागणी वाढत चालली आहे. शहरात अनेक ठिकाणी आईस्क्रिमच्या दुकानात गर्दी दिसून येत आहे. बाजारपेठेत शीतलता देणाऱ्या कलिंगडांची आवकही वाढत चालली आहे. संचारबंदीच्या मर्यादेमुळे सकाळीच दुकानातून शीतपेये आणून दुपारी सहकुटुंब याचा आस्वाद घेतला जात आहे.