शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

गावात काळाकुट्ट अंधार अन् पाणीही झाले बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यातील ७० टक्के गावांमध्ये काळाकुट्ट अंधार पसरलाय, तर सार्वजनिक नळांना पाणी यायचेदेखील बंद झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यातील ७० टक्के गावांमध्ये काळाकुट्ट अंधार पसरलाय, तर सार्वजनिक नळांना पाणी यायचेदेखील बंद झाले आहे. रस्त्यावरची वीज कधी येणार अन् नळाला पाणी येणार की नाही? हेच प्रश्न जनता ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना विचारत आहे. वीज कंपनीने थकित वीज बिलापोटी ग्रामपंचायतींची वीज तोडली आहे. कोरोनाच्या काळात ग्रामपंचायतींपुढे हे नवे मोठे संकट उभे ठाकले आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे वीज कंपनीची तब्बल १९० कोटी रुपयांची थकबाकी आहे. रस्त्यावरील खांबांवर जो वीज पुरवठा केला जातो, तसेच पाणी पुरवठा योजनांची बिले यापूर्वी शासन भरत होते. या वीज बिलांची मागणी वीज विभागातर्फे जिल्हा परिषदेकडे केली जात होती, शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानातून हे वीजबिल जिल्हा परिषद भरत होती. मात्र गेल्या तीन वर्षांपासून शासनाचे अनुदान बंद झाले. त्यामुळे जिल्हा परिषदेनेही हे बिल भरलेले नाही. आता बिलांच्या थकबाकीची मागणी ही ग्रामपंचायतींकडे केली जाऊ लागलेली आहे.

दरम्यान, पाणी पुरवठ्याची वीज तोडली जाऊ शकते, ही चिंता असल्याने ग्रामपंचायती पाणी पुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विजेचे बिल भरतात. आता कोरोनाच्या काळात वसूलच होत नसल्याने हे बिलदेखील थकलेले आहे. ऐन संकटाच्या काळात वीज विभागाने ग्रामपंचायतींना खिंडीत पकडले. हा विषय राज्याच्या दृष्टीने चिंतेचा असल्याने राज्याचा ऊर्जा विभाग आणि ग्रामविकास विभाग यांनीच एकत्रितपणे तोडगा काढण्याची मागणी सरपंच परिषदांच्यावतीने करण्यात येत आहे. सध्या तरी बहुतांश गावांतील रस्त्यांवर अंधार पसरला असून, पाणीही बंद झाल्याने जनता नाराज आहे.

पॉईंटर्स

बहुतांश गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य

सार्वजनिक पाणीपुरवठा बंद

कोरोना विलगीकरण कक्षांमध्येही अंधार

चोरट्यांना आयते कोलित

शेतीच्या कामांमध्येही अडचणी

कोट...

कोरोनाच्या संकटात ग्रामपंचायतीच्या करामध्ये वाढ करून शेतकऱ्यांवर बोजा टाकणे चुकीचे ठरणार आहे. आत्तापर्यंत जर शासन वीज बिल भरत होते, तर ते शासनानेच भरावे, ग्रामपंचायतींच्या तुटपुंज्या उत्पन्नातून ही बिले भरणे केवळ अशक्य आहे.

नितीन पाटील, सरपंच, बोपेगाव, ता. कोरेगाव

कोट...

थकीत वीज बिलाचे कारण देऊन वीज विभागाच्यावतीने जिल्ह्यातील अनेक गावांतील वीज तोडली आहे. हा गावावरील अन्याय आहे. लाखो रुपयांचे बिल भरणे ग्रामपंचायतींना अशक्य आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा.

- जितेंद्र भोसले, सरपंच, नागझरी, ता. कोरेगाव

कोट...

आमच्या गावातील रस्त्यावरच्या विजेसह एका पाणीपुरवठा योजनेची वीज तोडण्यात आलेली आहे. दुसऱ्या योजनेची वीज मी तोडू दिली नाही. वीज विभागाचे उपकेंद्र उरुलमध्ये असून, त्याचा घरफाळा थकलेला आहे. तो वीज विभाग भरत नाही अन् आमचीच वीज तोडण्याचे धाडस कसे होते?

वैशाली मोकाशी, सरपंच उरुल, ता. पाटण

का थकले ग्रामपंचायतींचे बिल

ग्रामपंचायतीच्यावतीने रस्त्यावरील वीज तसेच पाणीपुरवठा योजनेला लागणाऱ्या विजेचे बिल अनुदान स्वरूपात राज्य शासनाकडून दिले जात होते; मात्र अनेक वर्षांपासून राज्य शासनाने अनुदान विभागाला दिले नसल्याने मोठ्या रकमेचे वीजबिल थकलेले आहे. राज्य शासनच यातून तोडगा काढू शकते.

सरपंच परिषदांकडून कडाडून विरोध...

ग्रामपंचायतींची वीज तोडली गेल्याने सरपंच परिषदा आक्रमक झाल्या आहेत. सरपंच परिषद महाराष्ट्र पुणेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी शासनाने वीज बिल भरावे, यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला, तर सरपंच परिषद, महाराष्ट्र मुंबईचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी या प्रश्नावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना भेटणार असल्याचे सांगितले.

(वीज तोडल्याचे प्रतिकात्मक चित्र वापरता येईल)