शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

कातरखटावात सामाजिक सलोख्याचे दर्शन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2016 23:52 IST

दोन गटांत धुमश्चक्री : प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर चोवीस तासांत तणाव निवळला

कातरखटाव : कातरखटावातील दोन गटांमध्ये झालेल्या जोरदार धुमश्चक्रीनंतर निर्माण झालेला तणाव अखेर सामाजिक सलोख्यातून मिटला. दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध दिलेल्या तक्रारी गैरसमजातून असल्याचे लेखी पत्र पोलिसांना सुपूर्त केले. त्यामुळे तीनशे जणांविरुद्ध दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. याबाबत माहिती अशी की, कातरखटावमध्ये गेल्या काही दिवसांपासून दोन गटांमध्ये धुसफूस सुरू होती. अधूनमधून भांडणेही होत होती. गावातीलच काही प्रतिष्ठित मंडळींनी दोन्ही गटांतील युवकांची समजूत काढून हा वाद मिटविला होता. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा वाद विकोपाला गेला. गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कातरखटाव ग्रामपंचायत कार्यालयात उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत काळे, पोलिस निरीक्षक यशवंत शिर्के यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. दरम्यान, एका गटाने चर्चेसाठी बाहेरगावच्या व्यक्तीला बोलविल्याने दुसरा गट चिडला. त्यातून तणाव आणखी वाढला. अंधारात जमावाने बाहेरून आलेली जीप (एमएच ११ एडब्ल्यू ६०३२) उलटून टाकली.तणावपूर्ण वातावरण तयार झाल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढविला. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सीमा होळकर, उपविभागीय पोलिस अधिकारी काळे, पोलिस निरीक्षक शिर्के यांनी रात्री घटनास्थळी जाऊन शांतता राखण्याचे आवाहन केले. यावेळी अधिकाऱ्यांसमोर काहींनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. रात्री उशिरापर्यंत प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थांमध्ये वादावादी सुरू होती. शुक्रवारी दिवसभरही गावात वातावरण तंगच होते. दरम्यान, सायंकाळी प्रशासनाने बोलविलेल्या बैठकीत शांततेचे आवाहन करण्यात आल्यानंतर वातावरण निवळले. मात्र, तरीही पोलिसांचा फौजफाटा गावात ठेवण्यात आलेला आहे. दरम्यान, शनिवारचा तालुका बंद मागे घेण्यात आला आहे. (वार्ताहर)पोलिस ठाण्यात जमावशुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास वडूज पोलिस ठाण्यासमोर मोठा जमाव जमला होता. घटनेची माहिती समजताच पंचक्रोशीतील तरुण गोळा होऊ लागले. त्यामुळे पुसेगाव, औंध, दहिवडी आणि मायणी येथील पोलिसांची जादा कुमक तातडीने मागविण्यात आली. दरम्यान, आमदार प्रभाकर घार्गे, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, अशोक गोडसे, नंदकुमार गोडसे, नंदकुमार मोरे आदींनी तहसील कार्यालयात ग्रामस्थांशी चर्चा करून शांतता राखण्याचे आवाहन केले.