शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

दूषित पाण्याने रोगांचे थैमान!

By admin | Updated: October 21, 2014 23:44 IST

वाठार स्टेशनला अस्वच्छता : ग्रामपंचायत सदस्यांकडूनच ग्रामसेवकाच्या हलगर्जीपणाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

वाठार स्टेशन : वाठार स्टेशनमध्ये गेल्या दोन वर्षांपासून तुंबलेल्या गटारांमुळे तसेच सार्वजनिक हातपंप, शौचालये व स्वच्छताग्रहांमध्ये पाणी साठून राहिल्याने ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक लोकांना साथीच्या आजारांनी ग्रासले आहे. याला ग्रामसेवकाचा हलगर्जीपणाच कारणीभूत असल्याचा आरोप करणारे निवेदन ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले असून, याप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. गावात सध्या डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड अशा रोगांमुळे ग्रामस्थ त्रस्त आहेत. आरोग्याबाबतच्या कोणत्याही सुविधांची खबरदारी न घेतल्याने ही परिस्थिती उद््भवल्याचा ग्रामपंचायत सदस्यांचा आरोप आहे. वाठार स्टेशन ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या अनेक ठिकाणची गटारे दोन वर्षांत स्वच्छ केली गेली नाहीत. तसेच सार्वजनिक हातपंपाचा परिसर, कचराकुंड्यांच्या साफसफाईची काळजी घेतली जात नाही. सार्वजनिक पाणीपुरवठा करणारी वाहिनीही अनेक ठिकाणी फुटली आहे. तसेच शाळेच्या बाजूची गटारे तुंबल्याने डेंग्यूच्या डासांचा फैलाव झाला आहे. ग्रामस्थांच्या जीविताशी खेळणाऱ्या या दुर्लक्षाबाबत ग्रामसेवकाला वेळोवेळी सूचना करूनही ग्रामसेवकाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने या प्रकरणात त्याला जबाबदार धरून फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे सहा सदस्यांनी केली आहे.जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर नामदेव जाधव, बळीराम काळोखे, संभाजी दोरके, इरफान पठाण, उपसरपंच भीमाशंकर अहिरेकर, जास्मिन पठाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)ंचार दिवसांत २३९ रुग्णवाठार स्टेशन गावात चार दिवसांत २३९ रुग्णांना तापाचा आजार झाला आहे. त्यांची तपासणी करण्यात आली असून, संबंधित ग्रामपंचायतीला तशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच येणारा ताप मलेरिया, टायफॉइड, की डेंग्यू हे निश्चित करण्यासाठी रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रायबोले यांनी दिली.