शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

दूषित पाण्याने रोगांचे थैमान!

By admin | Updated: October 21, 2014 23:44 IST

वाठार स्टेशनला अस्वच्छता : ग्रामपंचायत सदस्यांकडूनच ग्रामसेवकाच्या हलगर्जीपणाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

वाठार स्टेशन : वाठार स्टेशनमध्ये गेल्या दोन वर्षांपासून तुंबलेल्या गटारांमुळे तसेच सार्वजनिक हातपंप, शौचालये व स्वच्छताग्रहांमध्ये पाणी साठून राहिल्याने ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक लोकांना साथीच्या आजारांनी ग्रासले आहे. याला ग्रामसेवकाचा हलगर्जीपणाच कारणीभूत असल्याचा आरोप करणारे निवेदन ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले असून, याप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. गावात सध्या डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड अशा रोगांमुळे ग्रामस्थ त्रस्त आहेत. आरोग्याबाबतच्या कोणत्याही सुविधांची खबरदारी न घेतल्याने ही परिस्थिती उद््भवल्याचा ग्रामपंचायत सदस्यांचा आरोप आहे. वाठार स्टेशन ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या अनेक ठिकाणची गटारे दोन वर्षांत स्वच्छ केली गेली नाहीत. तसेच सार्वजनिक हातपंपाचा परिसर, कचराकुंड्यांच्या साफसफाईची काळजी घेतली जात नाही. सार्वजनिक पाणीपुरवठा करणारी वाहिनीही अनेक ठिकाणी फुटली आहे. तसेच शाळेच्या बाजूची गटारे तुंबल्याने डेंग्यूच्या डासांचा फैलाव झाला आहे. ग्रामस्थांच्या जीविताशी खेळणाऱ्या या दुर्लक्षाबाबत ग्रामसेवकाला वेळोवेळी सूचना करूनही ग्रामसेवकाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने या प्रकरणात त्याला जबाबदार धरून फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे सहा सदस्यांनी केली आहे.जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर नामदेव जाधव, बळीराम काळोखे, संभाजी दोरके, इरफान पठाण, उपसरपंच भीमाशंकर अहिरेकर, जास्मिन पठाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)ंचार दिवसांत २३९ रुग्णवाठार स्टेशन गावात चार दिवसांत २३९ रुग्णांना तापाचा आजार झाला आहे. त्यांची तपासणी करण्यात आली असून, संबंधित ग्रामपंचायतीला तशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच येणारा ताप मलेरिया, टायफॉइड, की डेंग्यू हे निश्चित करण्यासाठी रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रायबोले यांनी दिली.