शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
4
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
5
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
6
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
7
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
8
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
9
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
10
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
11
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
12
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
13
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
14
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
15
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
16
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
17
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
20
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?

मंगळवार तळ्यातून दुर्गंधीयुक्त पाण्याचा उपसा सुरू

By admin | Updated: November 25, 2014 23:59 IST

दखल : नाकाचा रुमाल दूर होण्याची चिन्हे; पाणी कमी झाल्यावर स्वच्छता--लोकमतचा दणका

सातारा : मंगळवार तळे परिसरामध्ये अनेक कुटुंबे वास्तव्यास आहेत. गेल्या काही दिवसांपासून तळ्यातील पाण्याची दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याची दखल घेऊन पालिकेने मंगळवार तळे स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली आहे.मंगळवार तळ्याच्या प्रदूषणासंदर्भात ‘लोकमत’ने अनेकवेळा भूमिका मांडली होती. खासदार उदयनराजे भोसले यांच्यापासून पालिकेच्या अनेक पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच यंदा तळ्यात विसर्जन करायचे नाही, असा पवित्रा घेतला होता. परंतु गणेशोत्सव मंडळांच्या आग्रही भूमिकेनंतर मंगळवार तळ्यात अखेर विसर्जन करण्यास परवानगी मिळाली. विसर्जनानंतर महिनाभरात तळे स्वच्छ करून गाळ काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागल्यामुळे हे काम ठप्प झाले होते, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. आता मात्र पालिकेने मंगळवार तळे स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली आहे.तळे स्वच्छ करण्याचे टेंडर एकाला देण्यात आले आहे. तळ्यातील सर्व पाणी कमी झाल्यानंतर तळे स्वच्छ करण्यात येणार आहे. सध्या मंगळवार तळ्यातील मोरी उघडण्यात आली आहे. या मोरीतून राजवाड्याच्या पाठीमागे असणाऱ्या ओढ्यात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. रहिवशांची भांडी, दागिने काळे पडू लागले आहेत. मात्र, पाणी कमी होईपर्यंत नाइलाज आहे, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)मंगळवार तळे स्वच्छ करण्याच्या कामास मंजुरी दिली आहे. यासाठी निधीही उपलब्ध आहे. गेल्या काही दिवसांपासून पाणी सोडण्यात आले असून, पाणी कमी होताच स्वच्छता करण्यात येणार आहे.- अभिजित बापटमुख्याधिकारी, सातारा पालिका