शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
2
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
3
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
4
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
5
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
6
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
7
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
8
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
9
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
10
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
11
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
12
आता ५९५ कोटींचा घोटाळा? Indusind Bank समोरील समस्या संपेनात; काय आहे प्रकरण?
13
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
14
भाजीपाल्यावरून वाद, तलवार चालवली,आगही लावली; मंदिरासमोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी
15
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...
16
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
17
पत्नी पतीच्या आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओ बनवत राहिली, मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर
18
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
19
शेअर बाजारात यंदाची पहिलीच बंपर लॉटरी लागणार; या IPO ला मिळतोय दणकून GMP
20
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित

महामार्गावरील धोकादायक छेद रस्ते बंद करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:46 IST

वेळे : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुणे ते सातारा महामार्गावरील धोकादायक असलेले व अनावश्यक ठिकाणी बनवलेले छेद रस्ते बंद करण्याची ...

वेळे : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुणे ते सातारा महामार्गावरील धोकादायक असलेले व अनावश्यक ठिकाणी बनवलेले छेद रस्ते बंद करण्याची गरज निर्माण झाली आहे. धोकादायक ठिकाणी बनवलेले छेद रस्ते अपघातांना आयतेच निमंत्रण देत आहेत. याठिकाणी होणारे अपघात रोखण्यासाठी हे छेद रस्ते कायमचे बंद करणे गरजेचे आहे.

पुणे ते सातारा महामार्गावर अनेक ठिकाणी छेद रस्ते आहेत. महामार्गावरील प्रत्येक गावच्या ठिकाणी हे छेद रस्ते बनवले गेले आहेत; परंतु काही ठिकाणी हेच छेद रस्ते अत्यंत धोकादायक तर काही ठिकाणी आवश्यकता नसताना बनवले गेले आहेत. याच ठिकाणी अपघातांची संख्या वाढताना दिसत आहे. विशेषतः सातारा जिल्हा हद्दीतील शिरवळ ते सातारा या महामार्गावरील छेद रस्ते अत्यंत धोकादायक म्हणून समजले जातात. यामध्ये शिरवळ, खंडाळा, कवठे, सुरुर, पाचवड आदी ठिकाणचे काही छेद रस्ते महामार्ग प्राधिकरणाने कायमस्वरूपी बंद केले आहेत. मात्र, अपघातांचे माहेरघर म्हणून ओळख निर्माण केलेल्या वेळे गावच्या हद्दीतील अत्यंत धोकादायक व अनावश्यक ठिकाणी बनवलेले छेद रस्ते बरेच अपघात होऊनदेखील अजूनही बंद करण्यात आले नाहीत. यामागे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा नक्की कोणता उद्देश असेल?

खंबाटकी घाट उतरल्यानंतर तीव्र उतारावरून वाहने सुसाट वेगाने येतात. याच उतारावर असलेल्या वेळे गावच्या हद्दीत पाच ते सहा छेद रस्ते आहेत. हे सर्वच छेद रस्ते अत्यंत धोकादायक आहेत. आजपर्यंत याच छेद रस्त्यावरून जाताना अनेक भीषण अपघात होऊन अनेकांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. त्यामध्ये येथील स्थानिकांचादेखील समावेश आहे. याबाबतच्या अनेक नोंदी भुईंज पोलीस ठाण्यात आढळून येतील. म्हणूनच महामार्गावर सर्वात जास्त अपघात होणारे ठिकाण म्हणून वेळे परिचित आहे. एकीकडे अपघात रोखण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना करत आहे. मात्र त्याला अपवाद म्हणून की काय, महामार्गावरील अनेक धोकादायक छेद रस्ते अजूनही खुले ठेवण्यात आले आहेत.

चौकट..

स्थानिक पोलिसांच्या नोंदीचा आधार घ्यावा...

सुट्टीच्या दिवसात या महामार्गावर वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते. तसेच वेगात असलेली वाहने छेद रस्त्यावरून जाताना वाटेत आडव्या येणाऱ्यांना ठोकर देतात आणि यातूनच अपघातांची मालिका तयार होते. ही अपघातांची मालिका रोखण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने शिरवळ, खंडाळा, पाचवड आदी वर्दळीच्या ठिकाणांप्रमाणेच सर्वच धोकादायक छेद रस्ते तत्काळ कायमस्वरूपी बंद करावेत. यासाठी स्थानिक पोलिसांच्या नोंदीचादेखील आधार घ्यावा. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एवढी तत्परता दाखवली तरी अपघातांच्या संख्येत निश्चितच कमालीची घट होणार असून, पोलीस यंत्रणेवरील ताणदेखील कमी होण्यास मदत होणार आहे.