शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

भीषण आगीत गादी कारखाना खाक

By admin | Updated: August 15, 2014 00:24 IST

वारुंजी फाट्यानजीक दुर्घटना : लाखोंचे नुकसान, जीवितहानी टळली

मलकापूर : वारुंजी, ता. कऱ्हाड येथे गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत गादी कारखाना जळून खाक झाला. या दुर्घटनेत तयार गाद्यांसह, कापूस, कापड व इतर कच्चा माल, दुचाकी, मशिनरी आदी जळून लाखोंचे नुकसान झाले. कऱ्हाडपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वारुंजी फाट्यानजीक गाद्यांचे कारखाने आहेत. यापैकी दस्तगीर बाळू नदाफ व अन्सार दस्तगीर नदाफ या दोघांच्या भागीदारीत असलेल्या कारखान्याला गुरुवारी दुपारी आग लागली. संबंधित कारखान्यांमध्ये गाद्या तयार करण्याचे काम केले जात होते. तसेच जुन्या गाद्यांचा कापूस पिंजण्याचेही काम कारखान्यात केले जायचे. कापडाच्या चिंध्यांपासून कापूस तयार केला जात असल्याने कारखान्यात जुन्या कापड्यांचे मोठ-मोठे ढीग तयार करण्यात आले होते. कापसाच्याही त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गाठी ठेवण्यात आल्या होत्या. कारखान्यात वीस ते पंचवीस कामगार काम करीत असून, दुपारच्या सुमारास कामगारांनी जेवणासाठी सुटी केली. संबंधित कामगार कारखान्यापासून काही अंतरावरच असलेल्या वसाहतीत राहण्यास असल्याने दुपारी ते आपापल्या घरी निघून गेले. दरम्यान, दोन वाजण्याच्या सुमारास महेश जाधव व विठ्ठल जाधव (दोघेही रा. कालेटेक) हे दोघेजण दुचाकीवरून पाटणकडे निघाले असताना गादी कारखान्याच्या पाठीमागील बाजूस आग लागली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आपली दुचाकी थांबवून आरडाओरडा केला. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेतली.घटनेची माहिती त्वरित अग्निशामक पथकाला देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच पालिकेचे अग्निशामक पथक त्याठिकाणी दाखल झाले. पथकातील कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या. मात्र, काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. आग वाढत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अग्निशामकचे आणखी तीन पथके त्याठिकाणी बोलविण्यात आली. अग्निशामकच्या चार गाड्यांतून पाणी मारण्यात आल्यानंतर पाच-सहा तासांनी आग आटोक्यात आली. आग विझल्यानंतर गादी कारखान्याच्या मालकांसह कुटुंबीयांनी कारखान्यात धाव घेतली. मात्र, कारखान्यातील सर्व साहित्य खाक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे यांच्यासह अधिकारी व कर्मचारीही त्याठिकाणी दाखल झाले. उपअधीक्षक घट्टे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात झाली नव्हती. (प्रतिनिधी)डोळ्यादेखत आपला कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याचे पाहताच नदाफ कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. कुटुंबातील काही महिला घरासमोर भरून ठेवलेल्या पाण्याच्या कळशा नेऊन आग विझविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होत्या. मुलेही बॅरलमधील पाणी लहान भांड्यांनी नेऊन आगीवर टाकत होती. हे दृष्य हृदय हेलावून टाकणारे होते.शॉर्टसर्किटने आग लागल्याचा संशयकारखान्यानजीक वीज खांब असून, या खांबावरून परिसरातील घरांमध्ये कनेक्शन देण्यात आले आहे. कनेक्शनच्या वायरचे खांबावर जाळे तयार झाले आहे. दुपारी दोनच्या सुमारास खांबावर शॉर्टसर्किटने जाळ होऊन ठिणग्या उडाल्याचे व त्यामुळेच कारखान्याला आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बावीस गॅस सिलिंडर रस्त्यावरज्याठिकाणी आगीची ही दुर्घटना घडली त्या परिसरात दाट लोकवस्ती आहे. भीषण आग नजीकच्या घरांपर्यंत पसरण्याची भीती होती. अशातच मोठी दुर्घटना टाळण्यासाठी महेश जाधव, विठ्ठल जाधव यांच्यासह स्थानिक युवकांनी तातडीने परिसरातील बावीस घरांतील गॅस सिलिंडर रस्त्यावर सुरक्षित ठिकाणी ठेवले.