शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

धोक्याच्या गावांचं सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करावं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:41 IST

सातारा : ‘राज्यात अतिवृष्टीने १०० पेक्षा अधिक लोकांचा जीव गेला आहे. भूस्खलनाच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यामुळे दरडींचा धोका असणाऱ्या ...

सातारा : ‘राज्यात अतिवृष्टीने १०० पेक्षा अधिक लोकांचा जीव गेला आहे. भूस्खलनाच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यामुळे दरडींचा धोका असणाऱ्या गावांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करावे. त्याचबरोबर नदीजोड प्रकल्प कार्यक्रमही राज्याने हाती घ्यावा,’ अशी आग्रही मागणीच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

सातारा येथे शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री आठवले बोलत होते. ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, आप्पा तुपे आदी उपस्थित होते. आठवले यांनी वाई तालुक्यात भूस्खलन झालेल्या देवरुखवाडी, कोंढावळे गावाला भेट दिली. त्यानंतर साताऱ्यात येऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

मंत्री आठवले म्हणाले, ‘आता झालेल्या अतिवृष्टीत सातारा जिल्ह्यातील ४१६ गावे बाधित झाली आहेत. ४० हून अधिक लोकांचा जीव गेला आहे, तर काहीजण बेपत्ता आहेत. राज्य शासनाने मृतांच्या नातेवाइकांना ५ लाख, तर केंद्राने २ लाख देण्याचे जाहीर केले आहे. आमची मागणी अशी आहे की, जखमी असणाऱ्यांनाही ५० हजारांची मदत देण्यात यावी, तसेच दरडीचा धोका असणाऱ्या गावांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करावे. त्यासाठी राज्य शासनाने समिती नेमावी. सद्य:स्थितीत दरड कोसळलेल्या भागात लोकांचे राहणे धोक्याचे आहे. त्यासाठी अशा लोकांचे तात्पुरते पुनर्वसन करण्याची गरज आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करणार आहे.

पूर्वी पावसाची वाट पाहायला लागायची, पण यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. महापुराच्या घटना टाळण्यासाठी नदीजोड प्रकल्प कार्यक्रम हाती घ्यावा. राज्य शासनाने या कार्यक्रमाला महत्त्व देण्याची गरज आहे. त्यासाठी आराखडा तयार करावा. याबाबत केंद्र शासनाशीही चर्चा करणार आहे, असेही केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी स्पष्ट केले.

पाण्याचा विषयही पत्रकार परिषदेत निघाला. यावेळी त्यांनी बारामतीकरांनी सर्वांना न्याय दिला आहे. मलाही त्यांनी न्याय दिला. त्यामुळे खंडाळ्यालाही पाणी मिळावं, असं मंत्री आठवले यांनी सांगितले.

चौकट :

माझ्या गाडीला वातावरण खराब नव्हतं...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाटण दौऱ्यावर येणार होते. हवामान खराब असल्याने हेलिकॉप्टर खाली उतरलं नसल्याने ते माघारी गेल्याचा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर मंत्री आठवलेंनी माझ्या गाडीला वातावरण खराब नव्हते म्हणून मी आलो. तसेच मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात एकदा यावे. त्यांनी हेलिकॉप्टर परत आणावे, असे सांगताच एकच हशशा पिकला.

................................................

मी करणार नाही चारोळी...

पत्रकारांनी मंत्री आठवले यांना चारोळी करण्याबाबत विनंती केली. यावर आठवले यांनी ‘मी देत आहे सगळ्या पहाडांना आरोळी.. मी करणार नाही आता चारोळी’ अशी चारोळी सादर करत वातावरण आणखी हलके करून सोडले.

..............................................................