शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

धोक्याच्या गावांचं सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करावं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:41 IST

सातारा : ‘राज्यात अतिवृष्टीने १०० पेक्षा अधिक लोकांचा जीव गेला आहे. भूस्खलनाच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यामुळे दरडींचा धोका असणाऱ्या ...

सातारा : ‘राज्यात अतिवृष्टीने १०० पेक्षा अधिक लोकांचा जीव गेला आहे. भूस्खलनाच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यामुळे दरडींचा धोका असणाऱ्या गावांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करावे. त्याचबरोबर नदीजोड प्रकल्प कार्यक्रमही राज्याने हाती घ्यावा,’ अशी आग्रही मागणीच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

सातारा येथे शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री आठवले बोलत होते. ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, आप्पा तुपे आदी उपस्थित होते. आठवले यांनी वाई तालुक्यात भूस्खलन झालेल्या देवरुखवाडी, कोंढावळे गावाला भेट दिली. त्यानंतर साताऱ्यात येऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

मंत्री आठवले म्हणाले, ‘आता झालेल्या अतिवृष्टीत सातारा जिल्ह्यातील ४१६ गावे बाधित झाली आहेत. ४० हून अधिक लोकांचा जीव गेला आहे, तर काहीजण बेपत्ता आहेत. राज्य शासनाने मृतांच्या नातेवाइकांना ५ लाख, तर केंद्राने २ लाख देण्याचे जाहीर केले आहे. आमची मागणी अशी आहे की, जखमी असणाऱ्यांनाही ५० हजारांची मदत देण्यात यावी, तसेच दरडीचा धोका असणाऱ्या गावांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करावे. त्यासाठी राज्य शासनाने समिती नेमावी. सद्य:स्थितीत दरड कोसळलेल्या भागात लोकांचे राहणे धोक्याचे आहे. त्यासाठी अशा लोकांचे तात्पुरते पुनर्वसन करण्याची गरज आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करणार आहे.

पूर्वी पावसाची वाट पाहायला लागायची, पण यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. महापुराच्या घटना टाळण्यासाठी नदीजोड प्रकल्प कार्यक्रम हाती घ्यावा. राज्य शासनाने या कार्यक्रमाला महत्त्व देण्याची गरज आहे. त्यासाठी आराखडा तयार करावा. याबाबत केंद्र शासनाशीही चर्चा करणार आहे, असेही केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी स्पष्ट केले.

पाण्याचा विषयही पत्रकार परिषदेत निघाला. यावेळी त्यांनी बारामतीकरांनी सर्वांना न्याय दिला आहे. मलाही त्यांनी न्याय दिला. त्यामुळे खंडाळ्यालाही पाणी मिळावं, असं मंत्री आठवले यांनी सांगितले.

चौकट :

माझ्या गाडीला वातावरण खराब नव्हतं...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाटण दौऱ्यावर येणार होते. हवामान खराब असल्याने हेलिकॉप्टर खाली उतरलं नसल्याने ते माघारी गेल्याचा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर मंत्री आठवलेंनी माझ्या गाडीला वातावरण खराब नव्हते म्हणून मी आलो. तसेच मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात एकदा यावे. त्यांनी हेलिकॉप्टर परत आणावे, असे सांगताच एकच हशशा पिकला.

................................................

मी करणार नाही चारोळी...

पत्रकारांनी मंत्री आठवले यांना चारोळी करण्याबाबत विनंती केली. यावर आठवले यांनी ‘मी देत आहे सगळ्या पहाडांना आरोळी.. मी करणार नाही आता चारोळी’ अशी चारोळी सादर करत वातावरण आणखी हलके करून सोडले.

..............................................................