शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

धोक्याच्या गावांचं सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करावं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:41 IST

सातारा : ‘राज्यात अतिवृष्टीने १०० पेक्षा अधिक लोकांचा जीव गेला आहे. भूस्खलनाच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यामुळे दरडींचा धोका असणाऱ्या ...

सातारा : ‘राज्यात अतिवृष्टीने १०० पेक्षा अधिक लोकांचा जीव गेला आहे. भूस्खलनाच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यामुळे दरडींचा धोका असणाऱ्या गावांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करावे. त्याचबरोबर नदीजोड प्रकल्प कार्यक्रमही राज्याने हाती घ्यावा,’ अशी आग्रही मागणीच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

सातारा येथे शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री आठवले बोलत होते. ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, आप्पा तुपे आदी उपस्थित होते. आठवले यांनी वाई तालुक्यात भूस्खलन झालेल्या देवरुखवाडी, कोंढावळे गावाला भेट दिली. त्यानंतर साताऱ्यात येऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

मंत्री आठवले म्हणाले, ‘आता झालेल्या अतिवृष्टीत सातारा जिल्ह्यातील ४१६ गावे बाधित झाली आहेत. ४० हून अधिक लोकांचा जीव गेला आहे, तर काहीजण बेपत्ता आहेत. राज्य शासनाने मृतांच्या नातेवाइकांना ५ लाख, तर केंद्राने २ लाख देण्याचे जाहीर केले आहे. आमची मागणी अशी आहे की, जखमी असणाऱ्यांनाही ५० हजारांची मदत देण्यात यावी, तसेच दरडीचा धोका असणाऱ्या गावांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करावे. त्यासाठी राज्य शासनाने समिती नेमावी. सद्य:स्थितीत दरड कोसळलेल्या भागात लोकांचे राहणे धोक्याचे आहे. त्यासाठी अशा लोकांचे तात्पुरते पुनर्वसन करण्याची गरज आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करणार आहे.

पूर्वी पावसाची वाट पाहायला लागायची, पण यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. महापुराच्या घटना टाळण्यासाठी नदीजोड प्रकल्प कार्यक्रम हाती घ्यावा. राज्य शासनाने या कार्यक्रमाला महत्त्व देण्याची गरज आहे. त्यासाठी आराखडा तयार करावा. याबाबत केंद्र शासनाशीही चर्चा करणार आहे, असेही केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी स्पष्ट केले.

पाण्याचा विषयही पत्रकार परिषदेत निघाला. यावेळी त्यांनी बारामतीकरांनी सर्वांना न्याय दिला आहे. मलाही त्यांनी न्याय दिला. त्यामुळे खंडाळ्यालाही पाणी मिळावं, असं मंत्री आठवले यांनी सांगितले.

चौकट :

माझ्या गाडीला वातावरण खराब नव्हतं...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाटण दौऱ्यावर येणार होते. हवामान खराब असल्याने हेलिकॉप्टर खाली उतरलं नसल्याने ते माघारी गेल्याचा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर मंत्री आठवलेंनी माझ्या गाडीला वातावरण खराब नव्हते म्हणून मी आलो. तसेच मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात एकदा यावे. त्यांनी हेलिकॉप्टर परत आणावे, असे सांगताच एकच हशशा पिकला.

................................................

मी करणार नाही चारोळी...

पत्रकारांनी मंत्री आठवले यांना चारोळी करण्याबाबत विनंती केली. यावर आठवले यांनी ‘मी देत आहे सगळ्या पहाडांना आरोळी.. मी करणार नाही आता चारोळी’ अशी चारोळी सादर करत वातावरण आणखी हलके करून सोडले.

..............................................................