शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

अंबेनळी घाटात भगदाड वाहतूक धोक्यात

By admin | Updated: July 8, 2017 18:30 IST

अवघड वळण अन् तिव्र उतारावर खड्डा अडवतोय रस्ता

आॅनलाईन लोकमत

सातार, दि. ८ : महाबळेश्वर, प्रतापगडाला जोडणारा अंबेनळी घाट धोकादायक बनला असून घाटात नव्याने झालेल्या डांबरीकरणाला पहिल्याच पाऊसात प्रचंड खड्डे पडले आहेत. नादुरूस्त संरक्षक कठडे, रस्ताच्या मध्यभागी पडलेले भगदाड अपघातांना निमंत्रण देत आहेत.

महाबळेश्वरला येणारा प्रत्येक पर्यटक प्रतापगडाला भेट देतोच पण या ठिकाणी जाण्यासाठी असलेल्या अंबेनळी घाटातील रस्ता अनेक ठिकाणी उखडला आहे. दरड कोसळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महाबळेश्वर व परिसरात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त पाऊस पडला आहे.

महाबळेश्वर ते प्रतापगड रस्त्यालगत ठिकठिकाणी धबधबे असल्याने परिसर निसर्गरम्य झाला आहे. अनेक पर्यटक घाटात थांबून निसर्गाचा आनंद घेतात. मात्र, कोणत्याही धबधब्याजवळ संबधीत विभागाकडून सावधान तेचे फलक लावलेले दिसत नाहीत. अंबेनळी घाटात मेटतळे गावाजवळच रस्त्याच्या मध्यभागी भगदाड पडल्यामुळे वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संरक्षक कठड्यांची अवस्थांही तशीच अवस्था झाली आहे.

सततच्या दाट धुक्यामुळे रात्री तसेच दिवसाही वाहन चालवताना कसरत करावी लागते. ठिकठिकाणी संरक्षक कठडेच गायब असल्याचे चित्र दिसत आहे या घाटातील अवघड वळणावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अंगाचा थरकाप उडतो. तेथे झाडपाला टाकला आहे. पण अचानक खड्डा समोर आल्यास चुकवणे अवघड जाते.

- नरसिंग जगताप, पुणे.