शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रिफ्लेक्टर नसल्याने वाहतुकीस धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:09 IST

वाहतुकीस धोका सातारा : सातारा-मेढा-महाबळेश्वर या मार्गावर अनेक ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक नसल्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ होऊ ...

वाहतुकीस धोका

सातारा : सातारा-मेढा-महाबळेश्वर या मार्गावर अनेक ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक नसल्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. प्रामुख्याने केळघर घाटातील धोकादायक वळणांवर कोठेही दिशादर्शक फलक नसल्याने वाहनधारकांंची फसगत होत आहे. बुधवारी रात्री केळघर घाटात झालेल्या अपघाताने वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने अत्यावश्यक ठिकाणी रिफ्लेक्टर लावावेत, घाटातील संरक्षक कठड्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.

सातारा शहरात

पाण्याचा अपव्यय

सातारा : उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने शहर परिसरात पाणी टंचाई भेडसावू लागली आहे. असे असताना काही नागरिकांसह व्यापाऱ्यांकडून पाण्याची नासाडी केली जात आहे. मात्र, अद्यापही पालिकेने कारवाई मोहीम हाती घेतली नाही. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कासचा पाणीसाठा झपाट्याने खालावू लागला आहे. तांत्रिक अडचणींमुळे शहापूर योजनेचा पाणीपुरवठा वारंवार बंद ठेवावा लागतो. या परिस्थितीत पाणी काटकसरीने वापारण्याऐवजी काही नागरिक, व्यापारी नासाडी करीत आहेत. बोगदा परिसर, गुरुवार पेठ, शनिवार पेठ, देवी चौक, केसरकर पेठ व माची पेठेत काही ठिकाणी हे चित्र दररोज पाहावयास मिळत आहे.

कास तलावावरील

साकव पूल नादुरुस्त

पेट्री : कास तलावाचा संपूर्ण परिसर कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी बहुतांशी पर्यटकांचा ओघ तलावाच्या मुख्य व्हॉल्व्हकडे असतो. या मुख्य व्हॉल्व्हकडे जाणारा साकव पूल धोकादायक स्थितीत आहे. असे असताना कित्येक तरुण, तसेच पर्यटक धोका पत्करून या साकव पुलावरून ये-जा करत आहेत. मुख्य व्हॉल्व्हकडे जाणाऱ्या साकव पुलाची दुरवस्था पाहता अपघाताचा धोका वाढला आहे. सातारा पालिकेकडून या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.