शहरं
Join us  
Trending Stories
1
बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
4
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
5
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
6
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
7
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
8
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
9
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
10
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
11
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
12
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
13
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
14
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
15
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
16
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
17
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
18
महालक्ष्मी योगात नागपंचमी: ८ राशींवर शिव-लक्ष्मी कृपा, अपार धन-धान्य-लाभ; सुबत्ता-कल्याण काळ!
19
Mangalagauri 2025: मंगळागौरीचे सौभाग्यदायी व्रत कसे केले जाते? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी
20
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?

कऱ्हाडात रहिवाशांच्या डोक्यावर ‘धोक्याची’ घंटा!

By admin | Updated: June 15, 2016 00:03 IST

धोकादायक इमारती सर्व्हे : पालिका प्रशासनाकडून धोकादायक इमारतींकडे दुर्लक्ष; वर्षानुवर्षे नुसत्या नोटिसाच, यावर्षीचा सर्व्हे कधी ?

कऱ्हाड : शहरात आजही काही ठिकाणी अनेक वर्षांपासून धोकादायक इमारतींमध्ये लोक आपला जीव मुठीत धरून वास्तव्य करीत आहेत. पावसाळा जवळ आला की, जीर्ण झालेल्या व तडे गेलेल्या इमारती ढासळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता असते. अशा इमारतींचा सर्व्हे करून त्या उतरवून घेणे महत्त्वाचे असते. मात्र, अशा इमारतींचा सर्व्हे पालिकेकडून अद्यापही करण्यात आलेला नसल्याने त्या इमारती सध्या धोकादायक स्थितीत उभ्या आहेत.शहरातील धोकादायक इमारतींचा सर्व्हे पालिकेकडून दरवर्षी पावसाळा तोंडावर आला की केला जातो. त्यानुसार २०१३ मध्ये पालिकेने जेव्हा सर्व्हे केला तेव्हा ५३ धोकादायक इमारती आढळून आल्या. त्यावेळी संबंधितांना नुसत्या नोटिसा देण्यात आल्या. त्यानंतर २०१५ मध्ये पालिकेने केलेल्या सर्व्हेतून ४४ धोकादायक इमारती आढळून आल्या आहेत. त्यातील काहींना नोटिसा देण्यात आल्या तर काही पाडण्यात आल्या. मात्र, यावर्षीचा जून महिना अर्ध्यावर आला तरी धोकादायक इमारतींचा सर्व्हे करण्यात आलेला नाही. किंवा त्या अनुषंगाने काहीच उपाययोजना राबविल्या जात नसल्याचे दिसून येत आहे.पावसाळ्यामध्ये धोकादायक, भेगा पडलेल्या इमारती कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी पालिकेच्या बांधकाम विभागाकडून या इमारतींचे सर्र्वेक्षण करणे गरजेचे असते. पालिकेतील पेठशाखा अभियंत्याकडून इमारती उतरविण्याबाबत इमारत मालकांना अद्याप नोटिसाही देण्यात आलेल्या नसून सर्व्हे देखील करण्यात आलेला नाही. त्यामुळे या धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील धोकादायक इमारतींच्या समस्यांबरोबर अनधिकृत बांधकामे, जागेचे अतिक्रमण, पालिकेचे नियम डावलून बांधण्यात आलेल्या इमारती अशा अनेक समस्या आहेत. त्यावर वेळीच उपाययोजनेची गरज आहे. (प्रतिनिधी)धोकादायक इमारती म्हणजे...पालिकेकडून ठरविण्यात आलेल्या धोकादायक इमारतींमध्ये ४० ते ५० वर्षांपूर्वी बांधकाम केलेल्या व जीर्ण झालेल्या इमारत, तिच्या भिंतीला तडे गेले असल्यास, इमारतींच्या लाकडांना वाळवी लागली असल्यास, पांढऱ्या मातीपासून व बारीक दगडापासून बांधण्यात आलेली कौलारू घरे, वाडे यांचा समावेश धोकादायक इमारतींमध्ये केला जातो.आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून दुर्लक्ष !कऱ्हाड शहरात पावसाच्या अनुषंगाने पालिकेत आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्या कक्षातर्फे शहरात पावसाळ्यात आपत्ती स्थितीत उपाययोजना आखल्या जाणार आहे. मात्र, या आपत्ती व्यवस्थापन कक्षेकडून अद्याप शहरातील धोकादायक इमारतींकडे लक्ष दिले गेलेले नाही.