शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडात रहिवाशांच्या डोक्यावर ‘धोक्याची’ घंटा!

By admin | Updated: June 15, 2016 00:03 IST

धोकादायक इमारती सर्व्हे : पालिका प्रशासनाकडून धोकादायक इमारतींकडे दुर्लक्ष; वर्षानुवर्षे नुसत्या नोटिसाच, यावर्षीचा सर्व्हे कधी ?

कऱ्हाड : शहरात आजही काही ठिकाणी अनेक वर्षांपासून धोकादायक इमारतींमध्ये लोक आपला जीव मुठीत धरून वास्तव्य करीत आहेत. पावसाळा जवळ आला की, जीर्ण झालेल्या व तडे गेलेल्या इमारती ढासळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता असते. अशा इमारतींचा सर्व्हे करून त्या उतरवून घेणे महत्त्वाचे असते. मात्र, अशा इमारतींचा सर्व्हे पालिकेकडून अद्यापही करण्यात आलेला नसल्याने त्या इमारती सध्या धोकादायक स्थितीत उभ्या आहेत.शहरातील धोकादायक इमारतींचा सर्व्हे पालिकेकडून दरवर्षी पावसाळा तोंडावर आला की केला जातो. त्यानुसार २०१३ मध्ये पालिकेने जेव्हा सर्व्हे केला तेव्हा ५३ धोकादायक इमारती आढळून आल्या. त्यावेळी संबंधितांना नुसत्या नोटिसा देण्यात आल्या. त्यानंतर २०१५ मध्ये पालिकेने केलेल्या सर्व्हेतून ४४ धोकादायक इमारती आढळून आल्या आहेत. त्यातील काहींना नोटिसा देण्यात आल्या तर काही पाडण्यात आल्या. मात्र, यावर्षीचा जून महिना अर्ध्यावर आला तरी धोकादायक इमारतींचा सर्व्हे करण्यात आलेला नाही. किंवा त्या अनुषंगाने काहीच उपाययोजना राबविल्या जात नसल्याचे दिसून येत आहे.पावसाळ्यामध्ये धोकादायक, भेगा पडलेल्या इमारती कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी पालिकेच्या बांधकाम विभागाकडून या इमारतींचे सर्र्वेक्षण करणे गरजेचे असते. पालिकेतील पेठशाखा अभियंत्याकडून इमारती उतरविण्याबाबत इमारत मालकांना अद्याप नोटिसाही देण्यात आलेल्या नसून सर्व्हे देखील करण्यात आलेला नाही. त्यामुळे या धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील धोकादायक इमारतींच्या समस्यांबरोबर अनधिकृत बांधकामे, जागेचे अतिक्रमण, पालिकेचे नियम डावलून बांधण्यात आलेल्या इमारती अशा अनेक समस्या आहेत. त्यावर वेळीच उपाययोजनेची गरज आहे. (प्रतिनिधी)धोकादायक इमारती म्हणजे...पालिकेकडून ठरविण्यात आलेल्या धोकादायक इमारतींमध्ये ४० ते ५० वर्षांपूर्वी बांधकाम केलेल्या व जीर्ण झालेल्या इमारत, तिच्या भिंतीला तडे गेले असल्यास, इमारतींच्या लाकडांना वाळवी लागली असल्यास, पांढऱ्या मातीपासून व बारीक दगडापासून बांधण्यात आलेली कौलारू घरे, वाडे यांचा समावेश धोकादायक इमारतींमध्ये केला जातो.आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून दुर्लक्ष !कऱ्हाड शहरात पावसाच्या अनुषंगाने पालिकेत आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्या कक्षातर्फे शहरात पावसाळ्यात आपत्ती स्थितीत उपाययोजना आखल्या जाणार आहे. मात्र, या आपत्ती व्यवस्थापन कक्षेकडून अद्याप शहरातील धोकादायक इमारतींकडे लक्ष दिले गेलेले नाही.