शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
3
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
4
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
5
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
6
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
7
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
8
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
9
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
10
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
11
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
12
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
13
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
14
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
15
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
16
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
17
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
18
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
19
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
20
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास

कृष्णा नदीचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: February 9, 2015 00:43 IST

राजेंद्रसिंह राणा : आपण आपण नदीची चिंता केली तरच नदी आपली करेल

भुर्इंज : ‘कृष्णामाई धोक्यात आहे. उगमाच्या अवघ्या काही अंतरापासून असणारी ही परिस्थिती चिंताजनक आहे. आपण नदीची चिंता केली, तरच नदी आपली करेल. वेळीच सावध झालो नाही, भूमिका घेतली नाही, तर या नदीला आपण वाचवू शकणार नाही,’ अशी भीती जागतिक जलतजज्ज्ञ तथा रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी पाचवड, ता. वाई येथे बोलताना व्यक्त केली.गेली दोन दिवस डॉ. राजेंद्रसिंह वाई येथे होते. वाईहून पुण्याला जाताना त्यांनी पाचवड येथे येऊन कृष्णानदीची पाहणी केली. त्यांच्यासमवेत मीना राणा, मकरंद शेंडे, मंदार शेंडे उपस्थित होते. चिंधवलीचे माजी सरपंच जयवंत पवार यांच्याकडून त्यांनी नदीच्या सद्य:स्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.डॉ. राजेंद्रसिंह राणा म्हणाले, ‘नदीच्या पात्रात येथे आता जलपर्णी दिसत आहे. ही जलपर्णी म्हणजेच, या नदीसाठी धोक्याची पहिली घंटा आहे. गावांनी जागरूक होऊन आपली नदी वाचवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. ग्रामसेवकच्या धर्तीवर आता जलसेवक गावोगावी निर्माण झाले पाहिजेत. ते म्हणाले, ज्यांच्याकडे पाणीच नाही, ते पाण्यासाठी तडफडतायत. तुमच्यापाशी मुबलक आहे, ते फक्त वाचवण्याची खबरदारी घेतली पाहिजे. यावेळी वसंतराव जाधव, अप्पा मोहिते, विनायक गायकवाड, बबनराव काळे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितहोते. (वार्ताहर)चिंधवलीत जलबिरादरीचे शिबिर जयवंत पवार यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले, ‘तुमच्यासारख्या तरुणांनी या कामात सक्रिय झाले पाहिजे. ज्यांच्या मनात तळमळ आहे त्यांनी कृतिशील सहभाग या कामात घेतला पाहिजे. त्याला जयवंत पवार यांनी होकार देताच डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी चिंधवली येथे जलबिरादरीचे दोन दिवसांचे राज्यव्यापी शिबिर घेण्याची सूचना करून त्यावेळी आपण स्वत: पुन्हा एकदा येथे येऊ, असे सांगितले. त्यावर जलबिरादरीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुनील जोशी यांनी येत्या एक-दोन महिन्यांतच या शिबिराचे आयोजन करण्यात येईल,’ असे जाहीर केले.