शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

कृष्णा नदीचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: February 9, 2015 00:43 IST

राजेंद्रसिंह राणा : आपण आपण नदीची चिंता केली तरच नदी आपली करेल

भुर्इंज : ‘कृष्णामाई धोक्यात आहे. उगमाच्या अवघ्या काही अंतरापासून असणारी ही परिस्थिती चिंताजनक आहे. आपण नदीची चिंता केली, तरच नदी आपली करेल. वेळीच सावध झालो नाही, भूमिका घेतली नाही, तर या नदीला आपण वाचवू शकणार नाही,’ अशी भीती जागतिक जलतजज्ज्ञ तथा रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी पाचवड, ता. वाई येथे बोलताना व्यक्त केली.गेली दोन दिवस डॉ. राजेंद्रसिंह वाई येथे होते. वाईहून पुण्याला जाताना त्यांनी पाचवड येथे येऊन कृष्णानदीची पाहणी केली. त्यांच्यासमवेत मीना राणा, मकरंद शेंडे, मंदार शेंडे उपस्थित होते. चिंधवलीचे माजी सरपंच जयवंत पवार यांच्याकडून त्यांनी नदीच्या सद्य:स्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.डॉ. राजेंद्रसिंह राणा म्हणाले, ‘नदीच्या पात्रात येथे आता जलपर्णी दिसत आहे. ही जलपर्णी म्हणजेच, या नदीसाठी धोक्याची पहिली घंटा आहे. गावांनी जागरूक होऊन आपली नदी वाचवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. ग्रामसेवकच्या धर्तीवर आता जलसेवक गावोगावी निर्माण झाले पाहिजेत. ते म्हणाले, ज्यांच्याकडे पाणीच नाही, ते पाण्यासाठी तडफडतायत. तुमच्यापाशी मुबलक आहे, ते फक्त वाचवण्याची खबरदारी घेतली पाहिजे. यावेळी वसंतराव जाधव, अप्पा मोहिते, विनायक गायकवाड, बबनराव काळे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितहोते. (वार्ताहर)चिंधवलीत जलबिरादरीचे शिबिर जयवंत पवार यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले, ‘तुमच्यासारख्या तरुणांनी या कामात सक्रिय झाले पाहिजे. ज्यांच्या मनात तळमळ आहे त्यांनी कृतिशील सहभाग या कामात घेतला पाहिजे. त्याला जयवंत पवार यांनी होकार देताच डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी चिंधवली येथे जलबिरादरीचे दोन दिवसांचे राज्यव्यापी शिबिर घेण्याची सूचना करून त्यावेळी आपण स्वत: पुन्हा एकदा येथे येऊ, असे सांगितले. त्यावर जलबिरादरीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुनील जोशी यांनी येत्या एक-दोन महिन्यांतच या शिबिराचे आयोजन करण्यात येईल,’ असे जाहीर केले.