शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

धरणालगत वाळू उपसा...प्रशासनाचा कानाडोळा !

By admin | Updated: March 28, 2017 16:26 IST

पडलेल्या खड्ड्यांमुळे अजून किती जीव जाणार : संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई ची मागणी

आॅनलाईन लोकमतवडूज : बोकाळलेले वाळू माफिया आणि महसूल विभागाची गांधारीच्या भूमिकेने खटाव तालुक्याची वरदान असलेल्या येरळा नदीचे पात्र अक्षरश: कुरतडले असून, ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अजून किती जणांचे जीव जाणार? याकडे बघ्याची भूमिका घेणाऱ्या संबंधितांवर जिल्हाधिकारी काय कारवाई करणार, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

वाकेश्वर ग्रामपंचायतीने गत आठ दिवसांपूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले तरी याबाबत कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. मंडलाधिकारी व तलाठी यांच्यासह सर्वच मिलीभगत आहे का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. वाकेश्वर येथील याच खड्ड्यामुळे एकाला आपला जीव गमवावा लागला होता तर अंबवडे मधील शाळकरी चिमुकल्यांचा दुदेर्वी अंत ही झाला होता. मग अजून प्रशासन किती जणांच्या बलिदानाची वाट बघतेय, अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यांच्या मधून उमटत आहेत.

निर्ढावलेले वाळू माफिया आणि त्यांना साथ देणारे महसूल कर्मचारी यांच्यावर कारवाई न झाल्याने तालुक्यात सध्या उलट-सुलट चर्चा सुरू आहे. धरणालगत बेकायदेशीर वाळू उपसा तर प्रशासनाचा मात्र कायम कानाडोळा का? तर याठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांनाही दमदाटी चे प्रकार घडून देखील सर्वच बाबतीत फक्त सारवासारव प्रकार पाहावयास मिळत आहे. तसेच वाकेश्वर हद्दीतील पात्राची चाळण बघून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे स्पष्ट होत आहे.

कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखणारा खटाव तालुक्यातील बहुतांशी गावांना येरळवाडी मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. तसेच धरणालगतच्या काही गावांना शेतीसाठी पाणीपुरवठा होत असतो. सध्या तर धरणालगतच अवैद्यरीत्या वाळू उपसा करत असल्याने मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला असून, भविष्यात मोठा पाऊस झाल्यास धरणाला धोका संभविण्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत. काही दिवसांपूर्वी धरणालगत असणारी झाडेही अवैद्यरीत्या तोडण्यात आल्याने वाळूमाफियांना वाळू चोरी करण्यास आयते रान मोकळे केल्याचे बोलले जात आहे.