शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

शेतरस्ता अडविल्याने आंतरपिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुसेसावळी : सरबांधावरील रस्ता अडविल्याने शेतातील मालाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रस्ता अडविणाऱ्या शेतकऱ्यांवर व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुसेसावळी : सरबांधावरील रस्ता अडविल्याने शेतातील मालाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रस्ता अडविणाऱ्या शेतकऱ्यांवर व तक्रारीची दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी अरविंद शिंदे व सुनीता शिंदे या शेतकरी दाम्पत्याने केली आहे. दरम्यान, नुकसानभरपाई व संबंधितावर कोणतीच कारवाई न झाल्यास गुरुवार, दि. २ सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी प्रशासनास दिला आहे.

शिंदे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आमची राजाचे कुर्ले येथे शेतजमीन आहे, परंतु या शेतजमिनीकडे जाणारा रस्ता काही शेतकऱ्यांनी अडविला आहे. याबाबत न्याय मिळण्यासाठी तहसीलदार वडूज यांना विनंती अर्ज केले होते. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. संबंधितांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शेतातील फळबाग व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रस्ता अडविणाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्याच सूचना दिल्या नाहीत. आम्हाला न्याय दिला नाही. केळी, डाळिंब आदी फळबागेचे व कांदा, पावटा, भेंडी अशा आंतरपिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रस्ता अडविल्यामुळे हजारो रुपये खर्चून शेतमजुरामार्फत शेतातील माल बाहेर काढला जात आहे. यामुळे आर्थिक व मानसिक त्रास सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी सरबांध रस्ता खुला करून द्यावा व झालेल्या पिकाची नुकसान भरपाई द्यावी, असे पत्रकात म्हटले आहे.

फोटो- राजाचे कुर्ले येथे सरबांध रस्ता अडविल्याने शेतकऱ्यांच्या फळ मालाचे झालेले नुकसान.