शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतरस्ता अडविल्याने आंतरपिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुसेसावळी : सरबांधावरील रस्ता अडविल्याने शेतातील मालाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रस्ता अडविणाऱ्या शेतकऱ्यांवर व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुसेसावळी : सरबांधावरील रस्ता अडविल्याने शेतातील मालाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रस्ता अडविणाऱ्या शेतकऱ्यांवर व तक्रारीची दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी अरविंद शिंदे व सुनीता शिंदे या शेतकरी दाम्पत्याने केली आहे. दरम्यान, नुकसानभरपाई व संबंधितावर कोणतीच कारवाई न झाल्यास गुरुवार, दि. २ सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी प्रशासनास दिला आहे.

शिंदे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आमची राजाचे कुर्ले येथे शेतजमीन आहे, परंतु या शेतजमिनीकडे जाणारा रस्ता काही शेतकऱ्यांनी अडविला आहे. याबाबत न्याय मिळण्यासाठी तहसीलदार वडूज यांना विनंती अर्ज केले होते. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. संबंधितांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शेतातील फळबाग व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रस्ता अडविणाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्याच सूचना दिल्या नाहीत. आम्हाला न्याय दिला नाही. केळी, डाळिंब आदी फळबागेचे व कांदा, पावटा, भेंडी अशा आंतरपिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रस्ता अडविल्यामुळे हजारो रुपये खर्चून शेतमजुरामार्फत शेतातील माल बाहेर काढला जात आहे. यामुळे आर्थिक व मानसिक त्रास सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी सरबांध रस्ता खुला करून द्यावा व झालेल्या पिकाची नुकसान भरपाई द्यावी, असे पत्रकात म्हटले आहे.

फोटो- राजाचे कुर्ले येथे सरबांध रस्ता अडविल्याने शेतकऱ्यांच्या फळ मालाचे झालेले नुकसान.