शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटोच्या मुद्दलातच होतोय घाटा!

By admin | Updated: August 19, 2015 21:34 IST

खटाव परिसर : दर कोसळल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत

खटाव : खटावसह परिसरात बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटोचे लागवड केली आहे; परंतु सुरुवातीच्या तोड्याला चांगला दर मिळाल्यानंतर टोमॅटोचे मार्केटमधील दर अचानक कमी आल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. टोमॅटोचे एक रोप एक रुपये या दराने विकत घेऊन शेतकरी या टोमॅटोच्या बागा तयार केल्या आहेत. एकरी दहा हजार रोपे सरासरी लावली जातात. या रोपांना लागणारे खत तसेच वारंवार किडीपासून संरक्षणाकरिता मारावी लागणारी औषधे आदीचा खर्च वीस हजारांपर्यंत येतो. तसेच तर रोपांची वाढ झाल्यानंतर दहा हजार काट्या, सुतळ्या, तारा आदीचा खर्च वेगळाच येतो. मजुरीचा खर्च पाहता या खर्चाचा ताळमेळ शेतकऱ्याला बसेनासा झाला आहे. ज्यावेळी मार्केटमध्ये टोमॅटोला भाव चांगला मिळेल; त्याच वेळी शेतकरी या सर्व गोष्टींचा खर्च वजा जाता हे पीक फायद्याचे ठरते; परंतु सध्या मार्केटमध्ये टोमॅटोचा दर इतका नीचांकी झाला आहे की, शेतकऱ्यांनी पाठवलेल्या कॅरेटच्या वाहतुकीचा खर्च तर सोडाच, ते टोमॅटो तोडण्यासाठी शंभर रुपये हजेरीने लावलेल्या मजुरीचाही खर्च अंगावर येत आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटोचे केलेले प्लॉट तोडीविना तसेच सोडून दिले आहेत. तर बऱ्या शेतातून टोमॅटोचा ढीग पडलेला दिसतो. मी वीस गुठ्यांत टोमॅटोची लागवड केली आहे. सरासरी चार-पाच वेळा तोडा केला जातो. पहिल्या प्रथम काढलेल्या मालाला मार्केटमध्ये दर बऱ्यापैकी मिळाला; परंतु दुसऱ्या तोडीपासून दर अचानक उतरल्यामुळे आम्ही अडचणीत आलो. माझे टोमॅटोचे आठ कॅरेट मार्केटमध्ये पाठवले, त्याचे अवघे ८0 रुपये पट्टी आली. त्यामुळे मलाच कळले नाही की, माझ्या मालाला काय दर लागला ते. मी ते टोमॅटो काढण्यासाठी लावलेल्या मजुरांची मजुरीही त्यातून भागवता आली नाही. त्यामुळे टोमॅटोची बाग जनावरांसाठी सोडून दिली. माझ्यासारख्या बऱ्याच शेतकऱ्यांनी असाच निर्णय घेतला आहे.- राजेंद्र जगदाळे, शेतकरी