शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

दरवाढीने स्वयंपाकघरात ‘डाळ शिजेना’!

By admin | Updated: October 25, 2015 00:06 IST

महागाईने वाजविले तीनतेरा : तूरडाळ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर; इतर कडधान्यांचा मोठ्या प्रमाणात वापर; तूरडाळीच्या पदार्थांचीही दरवाढ

सातारा : ऐन सणांच्या तोंडावर महिन्यापूर्वी ऐंशी रुपये किलो मिळणाऱ्या तूरडाळीचे दर गगनाला भिडले आहेत. सध्या तूरडाळ २२० रूपये किलोवर जाऊन पोहोचली आहे. डाळ दराच्या तडक्याने गृहिणींसह सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणले आहे. दिवाळीच्या तोंडावर तूरडाळीचे भाव उतरतील, असे सरकार म्हणत असले तरी आयात केलेली डाळ ग्राहकांना १४० ते १५० रूपये किलो दरानेच मिळणार आहे. हा दरही सर्वसामान्यांना न परवडणारा असून यामुळे दर उतरल्याशिवाय स्वयंपाकघरात ‘डाळ काही शिजणार नाही’, असेच चित्र दिसत आहे. तूरडाळ, मसूरडाळ, उडीदडाळ हरभऱ्याची डाळ, मूगडाळ या डाळी सर्वसामान्यांचे जेवणात दररोज दिसतात. पावसाअभावी भाजीपाल्याचे दर तेजीत असल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबात जेवणासाठी डाळींचाच जास्त प्रमाणात वापर केला जातो. अगदी पालेभाजी, फळभाजी करतानाही त्यामध्ये डाळ वापरली जाते. असे एकही घर शोधून सापडणार नाही, जिथे डाळ खाल्ली जात नसेल. एवढं सख्ख्य माणसाचं आणि डाळीचं जमलं आहे. हॉटेल, खाणावळीत डाळींचा जास्त वापर होतो. ‘डाळ तडका’, ‘अख्खा मसूर’ ही डिश तर सर्वांचीच आवडती असते. मात्र दरवाढीमुळे सर्वत्रच डाळ वापराचे प्रमाण कमी झाले आहे. एकूणच माणसाच्या आयुष्यात डाळीचं असणारं महत्त्व आणि डाळीचे वाढते दर याविषयी ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेत बहुतांशी कुटुंबातील स्वयंपाकघरातून तूरडाळ जवळजवळ दुरावली असून ती वापराचे प्रमाण २५ टक्के आहे. तर हॉटेल व्यावसायिकांनी डाळीच्या पदार्थांच्या किमती वाढविल्या असल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)  

महागाईत जनता भरडली भरमसाठ दरामुळे भाजीपाला खाण्याची तर काही सोय राहिली नाही आणि रोज भाजी विकत घेणंही खिशाला परवडत नाही. त्यापेक्षा किलोभर डाळ घेतली की महिनाभराचं काम भागत होतं. पण आता डाळीचेही भाव वधारले आहेत. आता डाळपाण्यावर दिवस काढण्याचे दिवसही आता राहिले नाहीत. - दिनकर देगावकर, नागरिक, सातारा  

मागील दोन महिन्यांपासून तूरडाळीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे डाळीऐवजी कडधान्याचा पर्याय निवडला आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकही तूरडाळीची भूक मूग, मसूर, घेवडा या डाळींवरच भागवितात. दर कमी झाल्याशिवाय तूरडाळ मुखात पडणार नाही. किलोभर लागणारी डाळ आता पावशेरच्या घरात आली आहे. - अनुश्री रजपूत, गृहिणी  

हॉटेल, खाणावळीत वांगी, बटाटा यासोबत डाळही लागते. मात्र आता डाळ महागल्यामुळे ‘डाळ तडका’ सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला परवडत नाही. त्यामुळे आता मिक्स वाटाणा भाजीच जास्त चालते. - मोहनसिंग रजपूत, हॉटेलचालक