शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

कृष्णेला शाप दप्तर दिरंगाईचा !

By admin | Updated: April 3, 2015 23:55 IST

खलित्यांची लढाई : प्रदूषण मंडळाच्या दहा नोटिसा ; पालिकेचा केंद्राला प्रस्ताव

दत्ता यादव - सातारा ‘संत वाहते कृष्णामाई,’ असे म्हणतात. परंतु ती स्वच्छ राखण्यासाठी करण्यात यावयाच्या उपाययोजनांच्या फायली त्याहीपेक्षा संत गतीने प्रवास करत असल्याचे दिसून आले आहे. या दप्तर दिरंगाईमुळे कृष्णा व वेण्णा नदी दिवसेंदिवस प्रदूषण होत असताना सरकारी कार्यालयात मात्र, खलितांची लढाई सुरू आहे. जिल्ह्णातील सातारा व वाई नगर पालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोणत्याच हालचाली न केल्यामुळे कृष्णा व वेण्णा नदीमध्ये प्रदूषण होत असल्याचा ठपका विधानपरिषदेत चर्चेला गेला. एवढ्यावरच न थांबता मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांना तुरुंगात टाकण्याचा इशारा देण्यात आला. यापार्श्वभूमीवर सांडपाण्याच्या प्रकल्पाविषयी प्रदूषण महामंडळ आणि नगर पालिकेमध्ये नेमका काय कागदोपत्री व्यवहार झाला, यासंदर्भात ‘लोकमत’ने माहिती घेतली असता शासकीय दिरंगाईचा नमुना कसा असतो, याची माहिती पुढे आली. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते नदीमध्ये सोडले पाहिजे, असा नियम असल्यामुळे प्रदूषण महामंडळाने सातारा पालिकेला यासंदर्भात अनेकदा नोटिसा बजावल्या. तातडीने सांडपाण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आले. मात्र, पालिकेकडून कसलाच प्रतिसाद मिळाला नसल्याचे प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. करंजे, सदर बझार आणि गोडोली येथील ओढ्याचे पाणी कृष्णा आणि वेण्णा नदीला जात आहे. या सांडपाण्यावर प्रक्रिया करून शेतीसाठीही त्याचा वापर झाला पाहिजे, या दृष्टीने पालिका प्रशासनाने पावले उचलणे गरजेचे आहे. परंतु शासकीय दिरंगाईमुळे हा प्रकल्प रखडल्याचे दिसून येत आहे. शहरामध्ये भूमिगत ड्रेनेज आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी वर्षभरापूर्वीच पालिकेने केंद्राला प्रस्ताव सादर केला आहे. यासाठी लागणारे डिपॉझिटही भरण्यात आले आहे. परंतु हा मोठा प्रकल्प असल्यामुळे या प्रकल्पाला दोन ते तीन एकर जमीन उपलब्ध होणे गरजेचे आहे. परंतु साताऱ्यात एवढी विस्तीर्ण जागा पालिकेला मिळत नसल्यामुळे हा प्रकल्प रखडल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. या विभागांच्या टोलवाटोलवीमुळे कृष्णा व वेण्णा नदी दिवसेंदिवस प्रदूषण होत आहे. त्यामुळे विधानसभेत विचारलेल्या लक्षवेधीमुळे यानिमित्ताने हा विषय चर्चेत आला. परंतु आता यापुढे आणखी किती दिवस वेण्णा आणि कृष्णा नदी स्वच्छ व्हायला वेळ लागणार, याची शाश्वती नाही. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेला अनेकदा नोटिसा पाठविल्या. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. कृष्णा आणि वेण्णा या दोन्ही नद्यांमध्ये सध्या प्रदूषण होत आहे. - इंदिरा गायकवाड, (फिल्ड आॅफिसर, प्रदूषण महामंडळ) सांडपाण्याच्या प्रक्रियासंदर्भात केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. परंतु जागेअभावी हा प्रकल्प रखडला आहे. तरी सुद्धा लवकरच यावर तोडगा काढला जाईल. - अभिजित बापट, (मुख्याधिकारी, सातारा पालिका)