शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रात्री अकरा नंतर संचारबंदी केवळ नावालाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:15 IST

सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने जिल्ह्यात रात्री ११ ते पहाटे ६ या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ...

सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने जिल्ह्यात रात्री ११ ते पहाटे ६ या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, सातारकरांना या गोष्टीचा विसर पडल्याचे दिसते. रात्री ११ नंतर शहरात पोलीस गस्त नसल्याने नागरिक निर्धास्तपणे वावरतात. वाहतूकही सुरू असते. त्यामुळे संचारबंदी केवळ नावालाच आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्यासह जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य विभागाने ठोस पावले उचलली असून, त्याची अंमलबजावणीही केली आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दि. २२ फेब्रुवारीला जिल्ह्यात रात्री ११ ते पहाटे ६ या कालावधीत जिल्ह्यात संचारबंदी लागू होत असल्याची घोषणा केली होती. या निर्णयाची काटेकोर अंंमलबजावणी करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले. ग्रामीण भागात या आदेशाचे काटेकोर पालन केले जात असले तरी शहरी भागात मात्र संचारबंदी नावालाच असल्याचे दिसते.

रात्री अकरानंतर शहरातील प्रमुख चौकांत पोलीस कर्मचारी नसल्याने रस्त्यावर फेरफटका मारणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अकरानंतरही वाहनधारकांची ये-जा सुरू असते. अकरा वाजले तरी आईस्क्रिम व इतर खाद्यपदार्थांच्या गाड्या सुरूच असतात. पोलीस प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे बनले आहे.

फोटो : १

पोवई नाका

आठ रस्ते एकत्र जोडणाऱ्या पोवई नाका परिसरात रात्री अकरानंतरही वाहनांची ये-जा सुरू होती. यामध्ये प्रामुख्याने दुचाकीस्वारांची संख्या लक्षणीय होती.

फोटो : २

शाहू चौक

पालिकाजवळील शाहू चौकात पोलीस कर्मचारी नसल्याने रात्री अकरानंतरही या ठिकाणाहून वाहनधारकांची रेलचेल सुरू होती. रस्त्याकडेला गप्पा मारणाऱ्यांची संख्याही मोठी होती.

फोटो : ३

मोती चौक

मोती चौक हा नेहमीच गजबजलेला असतो. रात्री अकरा वाजता येथे आईस्क्रिमच्या गाड्यावर नागरिकांची गर्दी होती. राजपथावर शतपावलीसाठी आलेल्यांची संख्याही अधिक होती.

फोटो : ४

राजवाडा : चांदणी चौक

या चौकात अनेक हातगाडीधारकांची रात्री अकरा वाजता हातगाडी बंद करण्याची लगबग सुरू होती. हे चित्र दररोज पाहावयास मिळते. या चौकात चारचाकी वाहने व रिक्षांची ये-जा पहायला मिळाली.

(चौकट)

आतापर्यंत एकावरही

गुन्हा दाखल नाही

१. पालकमंत्र्यांनी संचारबंदीची घोषणा करून आज दहा दिवस झाले. या कालावधीत संचारबंदी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांकडून जिल्ह्यात एकही कारवाई अद्याप झाली नाही.

२. कारवाईची होत नसल्याने शहरी भागातील नागरिक व वाहनधारक निर्धास्त झाले असून, त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नाही.

३. पोलीस प्रशासाने संचारबंदी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

(कोट)

संचारबंदीच्या काळामध्ये रस्त्यावर कोणी आढळून आल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. सर्व नागरिक व वाहनधारकांनी पालकमंत्र्यांच्या आदेशाचे पालन करावे. जे कोणी नियमांचे उल्लंघन करेल त्याच्यावर गुन्हेही दाखल करण्यात येतील.

- अण्णासाहेब मांजरे, पोलीस निरीक्षक