शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
5
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
6
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
7
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
8
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
9
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
10
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
11
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
12
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
13
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
14
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
15
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
16
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
17
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
18
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
19
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
20
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी

रात्री अकरा नंतर संचारबंदी केवळ नावालाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:15 IST

सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने जिल्ह्यात रात्री ११ ते पहाटे ६ या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ...

सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने जिल्ह्यात रात्री ११ ते पहाटे ६ या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, सातारकरांना या गोष्टीचा विसर पडल्याचे दिसते. रात्री ११ नंतर शहरात पोलीस गस्त नसल्याने नागरिक निर्धास्तपणे वावरतात. वाहतूकही सुरू असते. त्यामुळे संचारबंदी केवळ नावालाच आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्यासह जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य विभागाने ठोस पावले उचलली असून, त्याची अंमलबजावणीही केली आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दि. २२ फेब्रुवारीला जिल्ह्यात रात्री ११ ते पहाटे ६ या कालावधीत जिल्ह्यात संचारबंदी लागू होत असल्याची घोषणा केली होती. या निर्णयाची काटेकोर अंंमलबजावणी करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले. ग्रामीण भागात या आदेशाचे काटेकोर पालन केले जात असले तरी शहरी भागात मात्र संचारबंदी नावालाच असल्याचे दिसते.

रात्री अकरानंतर शहरातील प्रमुख चौकांत पोलीस कर्मचारी नसल्याने रस्त्यावर फेरफटका मारणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अकरानंतरही वाहनधारकांची ये-जा सुरू असते. अकरा वाजले तरी आईस्क्रिम व इतर खाद्यपदार्थांच्या गाड्या सुरूच असतात. पोलीस प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे बनले आहे.

फोटो : १

पोवई नाका

आठ रस्ते एकत्र जोडणाऱ्या पोवई नाका परिसरात रात्री अकरानंतरही वाहनांची ये-जा सुरू होती. यामध्ये प्रामुख्याने दुचाकीस्वारांची संख्या लक्षणीय होती.

फोटो : २

शाहू चौक

पालिकाजवळील शाहू चौकात पोलीस कर्मचारी नसल्याने रात्री अकरानंतरही या ठिकाणाहून वाहनधारकांची रेलचेल सुरू होती. रस्त्याकडेला गप्पा मारणाऱ्यांची संख्याही मोठी होती.

फोटो : ३

मोती चौक

मोती चौक हा नेहमीच गजबजलेला असतो. रात्री अकरा वाजता येथे आईस्क्रिमच्या गाड्यावर नागरिकांची गर्दी होती. राजपथावर शतपावलीसाठी आलेल्यांची संख्याही अधिक होती.

फोटो : ४

राजवाडा : चांदणी चौक

या चौकात अनेक हातगाडीधारकांची रात्री अकरा वाजता हातगाडी बंद करण्याची लगबग सुरू होती. हे चित्र दररोज पाहावयास मिळते. या चौकात चारचाकी वाहने व रिक्षांची ये-जा पहायला मिळाली.

(चौकट)

आतापर्यंत एकावरही

गुन्हा दाखल नाही

१. पालकमंत्र्यांनी संचारबंदीची घोषणा करून आज दहा दिवस झाले. या कालावधीत संचारबंदी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांकडून जिल्ह्यात एकही कारवाई अद्याप झाली नाही.

२. कारवाईची होत नसल्याने शहरी भागातील नागरिक व वाहनधारक निर्धास्त झाले असून, त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नाही.

३. पोलीस प्रशासाने संचारबंदी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

(कोट)

संचारबंदीच्या काळामध्ये रस्त्यावर कोणी आढळून आल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. सर्व नागरिक व वाहनधारकांनी पालकमंत्र्यांच्या आदेशाचे पालन करावे. जे कोणी नियमांचे उल्लंघन करेल त्याच्यावर गुन्हेही दाखल करण्यात येतील.

- अण्णासाहेब मांजरे, पोलीस निरीक्षक