शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
7
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
8
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
9
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
10
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
11
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
12
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
13
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
14
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
15
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
16
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
17
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
18
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
19
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल

रात्री अकरा नंतर संचारबंदी केवळ नावालाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:15 IST

सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने जिल्ह्यात रात्री ११ ते पहाटे ६ या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ...

सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने जिल्ह्यात रात्री ११ ते पहाटे ६ या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, सातारकरांना या गोष्टीचा विसर पडल्याचे दिसते. रात्री ११ नंतर शहरात पोलीस गस्त नसल्याने नागरिक निर्धास्तपणे वावरतात. वाहतूकही सुरू असते. त्यामुळे संचारबंदी केवळ नावालाच आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्यासह जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य विभागाने ठोस पावले उचलली असून, त्याची अंमलबजावणीही केली आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दि. २२ फेब्रुवारीला जिल्ह्यात रात्री ११ ते पहाटे ६ या कालावधीत जिल्ह्यात संचारबंदी लागू होत असल्याची घोषणा केली होती. या निर्णयाची काटेकोर अंंमलबजावणी करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले. ग्रामीण भागात या आदेशाचे काटेकोर पालन केले जात असले तरी शहरी भागात मात्र संचारबंदी नावालाच असल्याचे दिसते.

रात्री अकरानंतर शहरातील प्रमुख चौकांत पोलीस कर्मचारी नसल्याने रस्त्यावर फेरफटका मारणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अकरानंतरही वाहनधारकांची ये-जा सुरू असते. अकरा वाजले तरी आईस्क्रिम व इतर खाद्यपदार्थांच्या गाड्या सुरूच असतात. पोलीस प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे बनले आहे.

फोटो : १

पोवई नाका

आठ रस्ते एकत्र जोडणाऱ्या पोवई नाका परिसरात रात्री अकरानंतरही वाहनांची ये-जा सुरू होती. यामध्ये प्रामुख्याने दुचाकीस्वारांची संख्या लक्षणीय होती.

फोटो : २

शाहू चौक

पालिकाजवळील शाहू चौकात पोलीस कर्मचारी नसल्याने रात्री अकरानंतरही या ठिकाणाहून वाहनधारकांची रेलचेल सुरू होती. रस्त्याकडेला गप्पा मारणाऱ्यांची संख्याही मोठी होती.

फोटो : ३

मोती चौक

मोती चौक हा नेहमीच गजबजलेला असतो. रात्री अकरा वाजता येथे आईस्क्रिमच्या गाड्यावर नागरिकांची गर्दी होती. राजपथावर शतपावलीसाठी आलेल्यांची संख्याही अधिक होती.

फोटो : ४

राजवाडा : चांदणी चौक

या चौकात अनेक हातगाडीधारकांची रात्री अकरा वाजता हातगाडी बंद करण्याची लगबग सुरू होती. हे चित्र दररोज पाहावयास मिळते. या चौकात चारचाकी वाहने व रिक्षांची ये-जा पहायला मिळाली.

(चौकट)

आतापर्यंत एकावरही

गुन्हा दाखल नाही

१. पालकमंत्र्यांनी संचारबंदीची घोषणा करून आज दहा दिवस झाले. या कालावधीत संचारबंदी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांकडून जिल्ह्यात एकही कारवाई अद्याप झाली नाही.

२. कारवाईची होत नसल्याने शहरी भागातील नागरिक व वाहनधारक निर्धास्त झाले असून, त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नाही.

३. पोलीस प्रशासाने संचारबंदी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

(कोट)

संचारबंदीच्या काळामध्ये रस्त्यावर कोणी आढळून आल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. सर्व नागरिक व वाहनधारकांनी पालकमंत्र्यांच्या आदेशाचे पालन करावे. जे कोणी नियमांचे उल्लंघन करेल त्याच्यावर गुन्हेही दाखल करण्यात येतील.

- अण्णासाहेब मांजरे, पोलीस निरीक्षक