शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

संरक्षण करणाऱ्यांवरच कोसळले संकट!

By admin | Updated: September 2, 2014 00:03 IST

पाचवड : पुणे-बंगळूर महामार्गावरील समस्यांतून पोलीसही सुटले नाहीत

कवठे : गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या एस्कॉर्टसाठी निघालेल्या पोलीस जीपला पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाचवड, ता. वाई येथे भीषण अपघात झाला असून, त्यामध्ये चार पोलीस कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाले असून, पोलीस जीपचा चक्काचूर झाला आहे. महामार्गावरील अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे वाहनचालकांच्या जीवावर कशा प्रकारे उठल्या आहेत? याचेच जिवंत उदाहरण यानिमित्ताने सर्वांसमोर आले आहे.रविवार, दि. ३१ आॅगस्ट रोजी मंत्र्यांच्या एस्कॉटसाठी असल्याने वाठार, ता. कोरेगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी मधुकर सावळाराम जाधव (वय ५६) हे जीप (एमएच ११ ए बी २३८८) आणि वाई पोलीस स्टेशनचे बाळासाहेब धर्मू जाधव (वय ५३) , सोमनाथ बल्लाळ (वय ५३) व अरविंद गावित (वय ३५) या सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन सकाळी सात वाजता पाचवड, ता. वाई या ठिकाणी आली असता महामार्ग ओलांडत असता सातारा दिशेने रोडवर वाहने असल्याने ही पोलीस जीप रस्त्याच्या मध्यावर थांबली. त्याचवेळी सातारावरून पुण्याकडे निघालेला ट्रकने पोलीस जीपला पाठीमागून धडक दिल्याने जीप गोल-गोल फिरून पलटी झाली व चारही कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सातारा येथील खासगी दवाखान्यात दाखल केले आहे. ट्रकचालक नागराज बसनप्पा कुंभार (वय २८, रा. रिटेहळी ताा हेरेगिरी जि. हवेरी कर्नाटक) याला भुर्इंज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे व पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मदने करीत आहेत.दरम्यान, महामार्गाला जागोजागी अपुऱ्या सोयीसुविधा आहे. वास्तविक, ज्याठिकाणी जंक्शन आहे, तिथे महामार्गाला क्रॉसिंगच्या ठिकाणी मोठी जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र, महामार्गावर असे कुठेही दिसत नाही. गेल्या दोन वर्षांपासून महामार्गावरील कामे पूर्णपणे बंद आहेत. कामे अर्धवट असल्याने वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. आवश्यक त्याठिकाणी भुयारी मार्ग गरजेचे आहेत. पाचवडसारख्या जंक्शनमध्ये भुयारी मार्गांचा वापर होणे आवश्यक आहे. महामार्ग प्राधिकरण याबाबत सक्ती करत नाही. वाहने महामार्गाच्या मधूनच रस्ते ओलांडत असतात. दोन मार्गांच्या मधल्या जागेत पुरेसी जागा नाही, एक बसही याठिकाणी बसू शकत नाही. बस आडवी उभी राहिली तर दोन महामार्गांवर ती येते. जोपर्यंत तांत्रिक त्रुटी दूर केल्या जात नाहीत, तोवर हे अपघात टाळता येणार नाहीत, अशी परिस्थिती आहे.महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदारांनी उपाययोजना केल्या नाहीत तर आणखी मोठे अपघात होण्याची शक्यता असल्याने भीती व्यक्त होत आहे. (वार्ताहर)