शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

संरक्षण करणाऱ्यांवरच कोसळले संकट!

By admin | Updated: September 2, 2014 00:03 IST

पाचवड : पुणे-बंगळूर महामार्गावरील समस्यांतून पोलीसही सुटले नाहीत

कवठे : गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या एस्कॉर्टसाठी निघालेल्या पोलीस जीपला पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाचवड, ता. वाई येथे भीषण अपघात झाला असून, त्यामध्ये चार पोलीस कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाले असून, पोलीस जीपचा चक्काचूर झाला आहे. महामार्गावरील अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे वाहनचालकांच्या जीवावर कशा प्रकारे उठल्या आहेत? याचेच जिवंत उदाहरण यानिमित्ताने सर्वांसमोर आले आहे.रविवार, दि. ३१ आॅगस्ट रोजी मंत्र्यांच्या एस्कॉटसाठी असल्याने वाठार, ता. कोरेगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी मधुकर सावळाराम जाधव (वय ५६) हे जीप (एमएच ११ ए बी २३८८) आणि वाई पोलीस स्टेशनचे बाळासाहेब धर्मू जाधव (वय ५३) , सोमनाथ बल्लाळ (वय ५३) व अरविंद गावित (वय ३५) या सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन सकाळी सात वाजता पाचवड, ता. वाई या ठिकाणी आली असता महामार्ग ओलांडत असता सातारा दिशेने रोडवर वाहने असल्याने ही पोलीस जीप रस्त्याच्या मध्यावर थांबली. त्याचवेळी सातारावरून पुण्याकडे निघालेला ट्रकने पोलीस जीपला पाठीमागून धडक दिल्याने जीप गोल-गोल फिरून पलटी झाली व चारही कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सातारा येथील खासगी दवाखान्यात दाखल केले आहे. ट्रकचालक नागराज बसनप्पा कुंभार (वय २८, रा. रिटेहळी ताा हेरेगिरी जि. हवेरी कर्नाटक) याला भुर्इंज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे व पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मदने करीत आहेत.दरम्यान, महामार्गाला जागोजागी अपुऱ्या सोयीसुविधा आहे. वास्तविक, ज्याठिकाणी जंक्शन आहे, तिथे महामार्गाला क्रॉसिंगच्या ठिकाणी मोठी जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र, महामार्गावर असे कुठेही दिसत नाही. गेल्या दोन वर्षांपासून महामार्गावरील कामे पूर्णपणे बंद आहेत. कामे अर्धवट असल्याने वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. आवश्यक त्याठिकाणी भुयारी मार्ग गरजेचे आहेत. पाचवडसारख्या जंक्शनमध्ये भुयारी मार्गांचा वापर होणे आवश्यक आहे. महामार्ग प्राधिकरण याबाबत सक्ती करत नाही. वाहने महामार्गाच्या मधूनच रस्ते ओलांडत असतात. दोन मार्गांच्या मधल्या जागेत पुरेसी जागा नाही, एक बसही याठिकाणी बसू शकत नाही. बस आडवी उभी राहिली तर दोन महामार्गांवर ती येते. जोपर्यंत तांत्रिक त्रुटी दूर केल्या जात नाहीत, तोवर हे अपघात टाळता येणार नाहीत, अशी परिस्थिती आहे.महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदारांनी उपाययोजना केल्या नाहीत तर आणखी मोठे अपघात होण्याची शक्यता असल्याने भीती व्यक्त होत आहे. (वार्ताहर)