शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
3
Swiggy, Zomato आणि ओला-उबर महागणार? नवीन कायद्यामुळे ग्राहकांना सोसावा लागणार भुर्दंड!
4
Tata Sierra : २२ वर्षांनंतर 'लेजेंड इज बॅक'... Tata नं लाँच केली मोस्ट अवेटेड Sierra; कोणते मिळणार फीचर्स, किंमत किती?
5
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
6
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: मार्गशीर्षातले ४ गुरुवार 'अशी' करा स्वामी उपासना; दुप्पट लाभ होईल!
7
Sheikh Hasina: नऊ किलो सोनं, महागड्या आणि मौल्यवान वस्तू; शेख हसीना यांच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड!
8
'नॅशनल क्रश' गिरीजा ओकला येतायेत विचित्र मेसेज; म्हणाली, "मला रेट विचारला जात आहे..."
9
IND vs SA : टीम इंडियानं घरच्या मैदानात गुडघे टेकल्यावर नेटकऱ्यांना आठवला विराट; गंभीर होतोय ट्रोल
10
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
11
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
12
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
13
Apple नंतर ही कम्प्युटर बनवणारी 'ही' दिग्गज कंपनी ६००० कर्मचाऱ्यांची कपात करणार, का घेतला हा मोठा निर्णय?
14
१० वर्षांत १ कोटींचा टप्पा गाठायचा आहे? SIP द्वारे कोणत्या फंडात आणि किती गुंतवणूक करणे फायदेशीर!
15
महालक्ष्मी व्रतकथा: महालक्ष्मी व्रत कथेशिवाय पूजा अपूर्ण; पती-पत्नीने मिळून वाचल्यास मिळते अधिक फळ!
16
घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट; म्हणाली, "माझी मुलं..."
17
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
18
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
19
मार्गशीर्षातला पहिला गुरुवार, महालक्ष्मी व्रताची तयारी झाली का? वाचा साहित्य आणि पूजाविधी
20
गरिबांसाठीच्या योजनांवर १ लाख कोटी रुपयांचा खर्च; लोककल्याणाचा उदात्त हेतू, पण सरकारी तिजोरीवर वाढता ताण
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्याच्या तोंडावर पिके होरपळली

By admin | Updated: February 26, 2015 00:17 IST

पाण्याअभावी होणार नुकसान : वांग नदीवरील अनेक बंधाऱ्यांत अत्यल्प पाणीसाठा, अनेक ठिकाणी गळती, काही बंधाऱ्यांची कामे अद्याप अपूर्ण

कुसूर : वांग नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या काही बधाऱ्यांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत समाधानकारक पाणीसाठा असला तरी काही बंधाऱ्यात चार दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध असून, ऐन भरात आलेली रब्बी पिके वाया जाण्याची शक्यता आहे. परिणामी, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.वाल्मीक डोंगरावर उगम असलेल्या वांग नदीवर पाटण तालुक्यातील मालदन, साईकडे, मानेगाव आणि काढणे तसेच कऱ्हाड तालुक्यात अंबवडे आणि आणे येथे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. नोव्हेंबर-डिसेंबर अखेरीस या बंधाऱ्यात पाणी अडविण्याची प्रक्रिया पूर्ण होते. या उपलब्ध पाण्यावर रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांसह बागायती फळ-भाज्या, ऊस पिके घेतली जातात. या पाण्यावर संपूर्ण विभागातील शेतकरी अवलंबून असून, अनेक गावांसाठी पिण्याच्या पाण्यासाठीही बंधाऱ्यातील पाण्याचा वापर होत आहे. अंबवडे आणि आणे येथील बंधाऱ्यात गतवर्षीच्या तुलनेत समाधानकारक पाणीसाठा असल्याने काही अंशी रब्बी हंगामातील पिकांची चिंता शेतकऱ्यांसमोर नाही. मात्र काढणे बंधाऱ्यातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊन आठ दिवस पुरेल एवढाच शिल्लक राहिला आहे. या परिसरात रब्बी हंगामातील पिके परिपक्व होण्यास अजून किमान महिन्याचा कालावधी आहे. परिणामी पिके भरात असतानाच पाणीसाठा कमी झाल्याने हाता-तोेंडाशी आलेली पिके पाण्याअभावी वाया जातात की काय? या भीतीने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)अडीच हजार क्षेत्र ओलिताखालीवांग नदीवर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात अडविण्यात आलेल्या पाण्यावर सुमारे दोन ते अडीच हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकेल एवढी साठवण क्षमता आहे. ऊसक्षेत्रात वाढगतवर्षी उसाला चांगला भाव मिळाल्यामुळे पारंपरिक रब्बी पिकांना बगल देऊन अनेक शेतकऱ्यांनी ऊस शतीला प्रथम प्राधान्य दिले. परिसरात उसाचे क्षेत्र लक्षणीय वाढले आहे. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्नवांग नदी पात्राशेजारील बहुतांश गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी नदी पात्राशेजारी आहेत. अडविण्यात आलेले पाणी झपाट्याने कमी होत असल्याने ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. मानेगाव बंधाऱ्यास गळतीवांग नदीवर, मालदन, साईकडे, मानेगाव, काढणे, अंबवडे आणि आणे येथील बंधाऱ्यांत पाणी अडविण्यात आले आहे. मानेगाव येथील बंधाऱ्यांस मोठ्या प्रमाणात गळती असल्याने या बंधाऱ्यात पाणीसाठा होऊ शकला नाही. खळेत काम अपूर्णपाटण तालुक्यातील खळे येथील बंधाऱ्याचे काम अपूर्ण आहे. भोसेगाव आणि मराठवाडी तसेच कऱ्हाड तालुक्यातील येणके येथील बंधाऱ्यांची कामे प्रस्तावित आहेत.