शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सातारकरांवर यंदाही पाणीकपातीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:09 IST

सातारा : येणारा उन्हाळा सुसह्य जावा यासाठी सातारकरांना आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. कारण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ...

सातारा : येणारा उन्हाळा सुसह्य जावा यासाठी सातारकरांना आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. कारण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाची पाणीपातळी हळूहळू खालावू लागली असून, तलावात दोन महिने पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. टंचाई दूर करण्यासाठी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून यंदाही पाणीकपातीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

सातारा शहराला कास व शहापूर योजनेच्या माध्यमातून पाणीपुरठा केला जातो. कास ही सातारा शहराची सर्वांत जुनी पाणी योजना आहे. पावसाळ्यात कास तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर तलावात २५ फूट इतका पाणीसाठा होतो. या तलावातून शहराला प्रतिदिन साडेपाच लाख लिटर पाणीपुरवठा केला जातो. पाण्याची दैनंदिन गरज पाहता तलावाची पातळी दररोज एका इंचाने खालावत असते. उन्हाळ्यात बाष्पीभवानाचादेखील जलसाठ्यावर परिणाम होतो. त्यामुळे दरवर्षी एप्रिल महिना उजाडला की पालिकेकडून पाणीकपात सुरू केली जाते. प्रत्येक पेठेचा पाणीपुरवठा आठवड्यात एक दिवस बंद ठेवला जातो व पाण्याची बचत करून ते पाणी पाऊस सुरू होईपर्यंत वापरले जाते.

कास तलावात यंदा १४ फूट पाणीसाठा शिल्लक असून, तो गतवर्षीपेक्षा एक फुटाने कमी आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी अजून तीन महिन्यांचा कालावधी आहे. तोवर पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे पाणीपुरवठा विभागापुढे आव्हान असणार आहे. पाणीपुरवठा विभागाने पाणीकपातीबाबत चाचपणी केली असली तरी याची अंमलबजावणी एप्रिल महिन्यात होऊ शकते. पाण्याची दैनंदिन गरज व उन्हाळ्यातील टंचाई लक्षात घेता नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे बनले आहे.

(चौकट)

.. तर ही शेवटची टंचाई

सातारा शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कास धरणाची उंची वाढीचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. या धरणाचे काम जवळपास ८० टक्के पूर्णत्वास आले असून, मे अखेर उर्वरित काम मार्गी लावले जाणार आहे. जरी काम पूर्णत्वास आले नाही तरी पावसाळ्यात काही प्रमाणात धरणात जलसंचय करण्याचे जलसंपदा विभागाचे नियोजन आहे. जलसंचय केल्यास सातारकरांसाठी ही शेवटची पाणीटंचाई असणार आहे.

(कोट)

कास तलावात सध्या पाणीसाठा टिकून आहे. नागरिकांना पाणीटंचाई भासू नये यासाठी पाणीकपात करावी की न करावी याबाबत प्रशासन स्तरावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल. कास योजनेला शहापूरचे क्रॉस कनेक्शन जोडण्यात आले आहे. त्यामुळे कासचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यास शहापूर योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जाईल.

- सीता हादगे, पाणीपुरवठा सभापती

(चौकट)

पाणीपुरवठ्याचा लेखाजोखा

एकूण नळधारक : १६०००

कासमधून पुरवठा : प्रतिदिन ५.५० लाख लिटर

शहापूरमधून पुरवठा : प्रतिदिन ८ लाख लिटर

प्रतिमाणसी पाणी : ११० लिटर

जीवन प्राधिकरणचा पुरवठा : प्रतिदिन २७ लाख लिटर

जलशुद्धिकरण केंद्र : २

फोटो : ११ कास डॅम फोटो