शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सातारकरांवर यंदाही पाणीकपातीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:09 IST

सातारा : येणारा उन्हाळा सुसह्य जावा यासाठी सातारकरांना आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. कारण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ...

सातारा : येणारा उन्हाळा सुसह्य जावा यासाठी सातारकरांना आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. कारण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाची पाणीपातळी हळूहळू खालावू लागली असून, तलावात दोन महिने पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. टंचाई दूर करण्यासाठी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून यंदाही पाणीकपातीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

सातारा शहराला कास व शहापूर योजनेच्या माध्यमातून पाणीपुरठा केला जातो. कास ही सातारा शहराची सर्वांत जुनी पाणी योजना आहे. पावसाळ्यात कास तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर तलावात २५ फूट इतका पाणीसाठा होतो. या तलावातून शहराला प्रतिदिन साडेपाच लाख लिटर पाणीपुरवठा केला जातो. पाण्याची दैनंदिन गरज पाहता तलावाची पातळी दररोज एका इंचाने खालावत असते. उन्हाळ्यात बाष्पीभवानाचादेखील जलसाठ्यावर परिणाम होतो. त्यामुळे दरवर्षी एप्रिल महिना उजाडला की पालिकेकडून पाणीकपात सुरू केली जाते. प्रत्येक पेठेचा पाणीपुरवठा आठवड्यात एक दिवस बंद ठेवला जातो व पाण्याची बचत करून ते पाणी पाऊस सुरू होईपर्यंत वापरले जाते.

कास तलावात यंदा १४ फूट पाणीसाठा शिल्लक असून, तो गतवर्षीपेक्षा एक फुटाने कमी आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी अजून तीन महिन्यांचा कालावधी आहे. तोवर पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे पाणीपुरवठा विभागापुढे आव्हान असणार आहे. पाणीपुरवठा विभागाने पाणीकपातीबाबत चाचपणी केली असली तरी याची अंमलबजावणी एप्रिल महिन्यात होऊ शकते. पाण्याची दैनंदिन गरज व उन्हाळ्यातील टंचाई लक्षात घेता नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे बनले आहे.

(चौकट)

.. तर ही शेवटची टंचाई

सातारा शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कास धरणाची उंची वाढीचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. या धरणाचे काम जवळपास ८० टक्के पूर्णत्वास आले असून, मे अखेर उर्वरित काम मार्गी लावले जाणार आहे. जरी काम पूर्णत्वास आले नाही तरी पावसाळ्यात काही प्रमाणात धरणात जलसंचय करण्याचे जलसंपदा विभागाचे नियोजन आहे. जलसंचय केल्यास सातारकरांसाठी ही शेवटची पाणीटंचाई असणार आहे.

(कोट)

कास तलावात सध्या पाणीसाठा टिकून आहे. नागरिकांना पाणीटंचाई भासू नये यासाठी पाणीकपात करावी की न करावी याबाबत प्रशासन स्तरावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल. कास योजनेला शहापूरचे क्रॉस कनेक्शन जोडण्यात आले आहे. त्यामुळे कासचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यास शहापूर योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जाईल.

- सीता हादगे, पाणीपुरवठा सभापती

(चौकट)

पाणीपुरवठ्याचा लेखाजोखा

एकूण नळधारक : १६०००

कासमधून पुरवठा : प्रतिदिन ५.५० लाख लिटर

शहापूरमधून पुरवठा : प्रतिदिन ८ लाख लिटर

प्रतिमाणसी पाणी : ११० लिटर

जीवन प्राधिकरणचा पुरवठा : प्रतिदिन २७ लाख लिटर

जलशुद्धिकरण केंद्र : २

फोटो : ११ कास डॅम फोटो