शहरं
Join us  
Trending Stories
1
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
2
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
3
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
4
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
5
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
6
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
7
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
8
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
9
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
10
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
11
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
12
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
13
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
14
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
15
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
16
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
17
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
18
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
19
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
20
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'

सातारकरांवर यंदाही पाणीकपातीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:09 IST

सातारा : येणारा उन्हाळा सुसह्य जावा यासाठी सातारकरांना आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. कारण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ...

सातारा : येणारा उन्हाळा सुसह्य जावा यासाठी सातारकरांना आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. कारण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाची पाणीपातळी हळूहळू खालावू लागली असून, तलावात दोन महिने पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. टंचाई दूर करण्यासाठी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून यंदाही पाणीकपातीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

सातारा शहराला कास व शहापूर योजनेच्या माध्यमातून पाणीपुरठा केला जातो. कास ही सातारा शहराची सर्वांत जुनी पाणी योजना आहे. पावसाळ्यात कास तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर तलावात २५ फूट इतका पाणीसाठा होतो. या तलावातून शहराला प्रतिदिन साडेपाच लाख लिटर पाणीपुरवठा केला जातो. पाण्याची दैनंदिन गरज पाहता तलावाची पातळी दररोज एका इंचाने खालावत असते. उन्हाळ्यात बाष्पीभवानाचादेखील जलसाठ्यावर परिणाम होतो. त्यामुळे दरवर्षी एप्रिल महिना उजाडला की पालिकेकडून पाणीकपात सुरू केली जाते. प्रत्येक पेठेचा पाणीपुरवठा आठवड्यात एक दिवस बंद ठेवला जातो व पाण्याची बचत करून ते पाणी पाऊस सुरू होईपर्यंत वापरले जाते.

कास तलावात यंदा १४ फूट पाणीसाठा शिल्लक असून, तो गतवर्षीपेक्षा एक फुटाने कमी आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी अजून तीन महिन्यांचा कालावधी आहे. तोवर पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे पाणीपुरवठा विभागापुढे आव्हान असणार आहे. पाणीपुरवठा विभागाने पाणीकपातीबाबत चाचपणी केली असली तरी याची अंमलबजावणी एप्रिल महिन्यात होऊ शकते. पाण्याची दैनंदिन गरज व उन्हाळ्यातील टंचाई लक्षात घेता नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे बनले आहे.

(चौकट)

.. तर ही शेवटची टंचाई

सातारा शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कास धरणाची उंची वाढीचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. या धरणाचे काम जवळपास ८० टक्के पूर्णत्वास आले असून, मे अखेर उर्वरित काम मार्गी लावले जाणार आहे. जरी काम पूर्णत्वास आले नाही तरी पावसाळ्यात काही प्रमाणात धरणात जलसंचय करण्याचे जलसंपदा विभागाचे नियोजन आहे. जलसंचय केल्यास सातारकरांसाठी ही शेवटची पाणीटंचाई असणार आहे.

(कोट)

कास तलावात सध्या पाणीसाठा टिकून आहे. नागरिकांना पाणीटंचाई भासू नये यासाठी पाणीकपात करावी की न करावी याबाबत प्रशासन स्तरावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल. कास योजनेला शहापूरचे क्रॉस कनेक्शन जोडण्यात आले आहे. त्यामुळे कासचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यास शहापूर योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जाईल.

- सीता हादगे, पाणीपुरवठा सभापती

(चौकट)

पाणीपुरवठ्याचा लेखाजोखा

एकूण नळधारक : १६०००

कासमधून पुरवठा : प्रतिदिन ५.५० लाख लिटर

शहापूरमधून पुरवठा : प्रतिदिन ८ लाख लिटर

प्रतिमाणसी पाणी : ११० लिटर

जीवन प्राधिकरणचा पुरवठा : प्रतिदिन २७ लाख लिटर

जलशुद्धिकरण केंद्र : २

फोटो : ११ कास डॅम फोटो