शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
3
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
4
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
5
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
6
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
7
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
8
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
9
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
10
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
11
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
12
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
13
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
14
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
15
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
16
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
17
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
18
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
19
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
20
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?

सातारकरांवर यंदाही पाणीकपातीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:09 IST

सातारा : येणारा उन्हाळा सुसह्य जावा यासाठी सातारकरांना आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. कारण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ...

सातारा : येणारा उन्हाळा सुसह्य जावा यासाठी सातारकरांना आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. कारण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाची पाणीपातळी हळूहळू खालावू लागली असून, तलावात दोन महिने पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. टंचाई दूर करण्यासाठी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून यंदाही पाणीकपातीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

सातारा शहराला कास व शहापूर योजनेच्या माध्यमातून पाणीपुरठा केला जातो. कास ही सातारा शहराची सर्वांत जुनी पाणी योजना आहे. पावसाळ्यात कास तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर तलावात २५ फूट इतका पाणीसाठा होतो. या तलावातून शहराला प्रतिदिन साडेपाच लाख लिटर पाणीपुरवठा केला जातो. पाण्याची दैनंदिन गरज पाहता तलावाची पातळी दररोज एका इंचाने खालावत असते. उन्हाळ्यात बाष्पीभवानाचादेखील जलसाठ्यावर परिणाम होतो. त्यामुळे दरवर्षी एप्रिल महिना उजाडला की पालिकेकडून पाणीकपात सुरू केली जाते. प्रत्येक पेठेचा पाणीपुरवठा आठवड्यात एक दिवस बंद ठेवला जातो व पाण्याची बचत करून ते पाणी पाऊस सुरू होईपर्यंत वापरले जाते.

कास तलावात यंदा १४ फूट पाणीसाठा शिल्लक असून, तो गतवर्षीपेक्षा एक फुटाने कमी आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी अजून तीन महिन्यांचा कालावधी आहे. तोवर पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे पाणीपुरवठा विभागापुढे आव्हान असणार आहे. पाणीपुरवठा विभागाने पाणीकपातीबाबत चाचपणी केली असली तरी याची अंमलबजावणी एप्रिल महिन्यात होऊ शकते. पाण्याची दैनंदिन गरज व उन्हाळ्यातील टंचाई लक्षात घेता नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे बनले आहे.

(चौकट)

.. तर ही शेवटची टंचाई

सातारा शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कास धरणाची उंची वाढीचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. या धरणाचे काम जवळपास ८० टक्के पूर्णत्वास आले असून, मे अखेर उर्वरित काम मार्गी लावले जाणार आहे. जरी काम पूर्णत्वास आले नाही तरी पावसाळ्यात काही प्रमाणात धरणात जलसंचय करण्याचे जलसंपदा विभागाचे नियोजन आहे. जलसंचय केल्यास सातारकरांसाठी ही शेवटची पाणीटंचाई असणार आहे.

(कोट)

कास तलावात सध्या पाणीसाठा टिकून आहे. नागरिकांना पाणीटंचाई भासू नये यासाठी पाणीकपात करावी की न करावी याबाबत प्रशासन स्तरावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल. कास योजनेला शहापूरचे क्रॉस कनेक्शन जोडण्यात आले आहे. त्यामुळे कासचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यास शहापूर योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जाईल.

- सीता हादगे, पाणीपुरवठा सभापती

(चौकट)

पाणीपुरवठ्याचा लेखाजोखा

एकूण नळधारक : १६०००

कासमधून पुरवठा : प्रतिदिन ५.५० लाख लिटर

शहापूरमधून पुरवठा : प्रतिदिन ८ लाख लिटर

प्रतिमाणसी पाणी : ११० लिटर

जीवन प्राधिकरणचा पुरवठा : प्रतिदिन २७ लाख लिटर

जलशुद्धिकरण केंद्र : २

फोटो : ११ कास डॅम फोटो