शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
5
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
6
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
7
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
8
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
9
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
10
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
11
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
12
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
13
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
14
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
15
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
16
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
17
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
18
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
19
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती

गडहिंग्लज पालिका सभेत हंगामा

By admin | Updated: April 12, 2016 00:34 IST

अर्धा तास तहकूब : २६ विषयांना बहुमताने मंजुरी; विरोधकांकडून निषेध

गडहिंग्लज : विरोधी नगरसेवकाकडून झालेला ‘ढपला’ शब्दाचा वापर व सत्ताधाऱ्यांनी केलेली माफीची मागणी, संबंधित नगरसेवकांच्या माफीनाम्याशिवाय सभेचे कामकाज पुढे न चालविण्याची नगराध्यक्षांनी घेतलेली भूमिका यामुळे येथील नगरपालिकेच्या विशेष सभेत जोरदार हंगामा झाला. गोंधळामुळे नगराध्यक्षांनी अर्धा तास सभा तहकूब केली. त्यानंतर अजेंड्यावरील २६ विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली. मात्र, विरोधी नगरसेवकांच्या अधिकारावर गदा आणल्याचा आरोप करून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचा निषेध केला.नगराध्यक्ष राजेश बोरगावे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. प्रारंभी शासनाकडून वितरित होऊन परत घेण्यात आलेला निधी आणि निधी उपलब्ध असूनही रखडलेले श्री महालक्ष्मी व विठ्ठल मंदिरांचे बांधकाम या मुद्द्यावरच सुमारे तासभर खडाजंगी झाली. महालक्ष्मी मंदिर परिसरातील शाळेच्या आरक्षणाच्या ठिकाणी धर्मशाळेचा चुकीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण झाली असून, प्रस्तावात दुरुस्तीची गरज असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. मात्र, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप विरोधकांनी केला. मंदिराच्या ट्रस्टशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षांनी केले.वाहन विभागाकडे मक्ता पद्धतीने चालक पुरविण्याच्या टिप्पणीतील चुकीच्या दरपत्रकाचा मुद्दा कदम यांनी उपस्थित केला. त्यावेळी मुद्रणदोष असल्याचा खुलासा मुख्याधिकाऱ्यांनी केला. मात्र, ही सभागृहाची दिशाभूल असून त्यात ‘ढपला’ असल्याचा आरोप कदम यांनी केला. त्यावेळी माफी मागा, अन्यथा सभागृहातून बाहेर जा, अशी सूचना नगराध्यक्षांनी केली. दोघेही आपआपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे गोंधळात भर पडली.चर्चेत उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, नरेंद्र भद्रापूर, रामदास कुराडे, दादू पाटील, बसवराज खणगावे, उदय पाटील, मंजूषा कदम, लक्ष्मी घुगरे, अरुणा शिंदे, दीपा बरगे यांनीही भाग घेतला. मुख्याधिकारी तानाजी नरळे यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली. (प्रतिनिधी) सर्व ई-निविदा आॅनलाईन पद्धतीनेच मागविण्यात आल्या आहेत. सर्व विषय आरोग्य व पाणी पुरवठ्याशी निगडित असल्यामुळे जनतेच्या हितासाठीच बहुमताने मंजूर केले. केवळ रस्ते सफाईच्या एका टेंडरमध्येच ६ लाख ६५ हजारांची बचत झाली आहे. वैयक्तिक हेवेदावे काढण्यासाठीच विरोधक सभागृहाचा वेळ वाया घालवत होते. त्यांचा विरोध केवळ आकसापोटी असल्यामुळेच सर्व विषय बहुमताने मंजूर केले.- राजेश बोरगावे, नगराध्यक्षभाजप सरकारचा निषेध!सांस्कृतिक सभागृह आणि वाचनालयासाठी पाच कोटींचा निधी वितरित करून परत घेतल्याबद्दल हारुण सय्यद यांनी भाजप सरकारचा निषेध नोंदविला. वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्ह्यातून केवळ गडहिंंग्लज पालिकेनेच प्रस्ताव पाठविला होता. मात्र, राजकीय आकसातून तो निधी परत घेण्यात आल्यामुळे तमाम ‘गडहिंंग्लज’च्या जनतेचा अपमान झाला आहे. त्यामुळे पाच कोटींचा निधी गडहिंग्लजकरांना सन्मानपूर्वक मिळावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. त्यास दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांनी दुजोरा दिला.